Skip to main content

Full text of "Jagaache Pravaasii Bhaaga 1 Laa"

See other formats


2).810/१(७- 8000९ 


()॥५॥४/८॥२७/१|_ 
(13२, र 


0) 192117 


२०) 7१०0० ही. 
॥४७-/॥५] 


जगाचे भवासी 


भाग १९ ला 


लेखक 


प्रो, श्रीपाद महादेव माटे, एम. ए. 


श्री लेखन वाचन भांडार, 
लक्ष्मी रोड, पुर्ण २. 


आवृत्ति पहिली १९५ १ 


किंमत सव्वा रुपया 


आररभीचे दोन शब्द 


“>/>>” > | व 1 » >» ध्ये 0 2... अ" > 


न्य “ ह “ “* €*./€ “ ह 


मार्का पोला, कोलंबस, आणि कॅप्टन कुक या तीन साहसी लोकानी 
केलेल्या प्रवासाची आणि सफरींची वर्णने या छोट्याशा पुस्तकांत दिलीं 
आहेत. हीं वर्णने करताना त्यांची चरित्रे ही त्यातच सहजासहजी येऊन 
गळी आहित. सषटकिर्त्याने निर्माण केलेली ही प्रथ्वी आहे तरी कसली 
आणि या प्रथ्वीच्या पाठीवर माणसाच्या जातीने उत्पन्न केलेली किमया 
तरी कसली आहि हे पाहण्याची इच्छा या लोकांना झाळेळी होती; आणि 
ती इतकी प्रबल होती की, संकटांचे पर्वेत जरी त्यांच्या मार्गीत उमे राहिल 
तरी ती भागवण्यासाठी त्यांनीं सर्व तऱ्हेची साहसे केली, आधुनिक काळांत 
प्रवासाची साधने अत्यंत सुलभ झाळेळी आहेत आणि तरीही आपल्यापैकी 
फाल्च थोडे लोक पृथ्वीचे स्वरूप पाहण्यासार्ठी घराच्या ब्राहेर पडतात, 
हजार-पाचशे वपापूवी प्रवासाचें मुख्य साधन म्हणज स्वतःचे पाय, घोडी, 
उंट, आणि हा प्रवास समुद्राचा असला तर ज्याना होडगी हेच नांव शोभेल 
अशी तराडी, येवढेच होते. अशा काळीं मार्को पोलो, कोळंबस आणि 
कुक्‌॒ याना केवळ जिज्ञासा म्हणून केलेलीं पर्यटनें पाहिलीं म्हणजे जीव थक्क 
होऊन जातो. याच्या या पर्यटनांमुळेंच प्रथ्वीचा व्याप माणसांच्या ध्यानीं 
आला; आणि निरनिराळ्या प्रदेशातील माणसांनी उत्पन्न केलेल्या विविध 
संस्कृति परस्परांच्या ओळखीच्या झाल्या, या प्रवासार्ची वर्णने विद्याथ्यांना 
मनोरंजक वाटतील व ती बाचलीं असताना त्यांच्या ज्ञानांत भरही पडेल, 
असा बळकट भरंवसा वाटतो. 


माकी पोलोच्या प्रवासाची हकीकत त्याच्या मूळ पुस्तकावरूनच दिली 
आहि. हें मूळ पुस्तक फार मोठें असून तें बार्राक सारीक तपशिलानें तुडुंब 


आरंभीचे दोन शब्द 


४ >/-:-:“>."/“/>/>/:7.*".९”>./2'>“:->.* >. की “९. &%. “र 1 ह ३ '% २ ४४ > //१७ ५ ७७ ०.” क्क 0. क. क ह 


रलेलें आहे, विद्याथ्योनीं मोठेपणी तें वाचार्वे, पण प्रस्तुतच्या पुस्तकांतील 
वर्णनानें त्यांना मार्का पोलोच्या प्रवासाची आणि त्यांच्या चरित्राची पुरेशी 
माहिती होईल, मीं मार्गे एकदां कोलंबसाचें चरित्र लिहिळें होते. पण 
तें जसेच्या तसें या पुस्तकांत घेतलेले नाही. वृत्तान्त तोच असल्यामुळें 
दोम्ही सारखींच वाटावी हें स्वाभाविक आहे. पण एकदोन परिच्छेद 
सोडले तर, या पुस्तकांतील चरित्र भाषारूपार्ने तरी अगदी निराळें आहे 
असे वाटेळ, शिवाय, कोलंबसाच्या मूळ हतूचची सांगता कितपत झाली 
याचें थोडेसे स्वतंत्र विवेचनही या चरित्रांत केलेलें आहे. कॅप्टन कुक 
यानें स्वतःच आपल्या तीन सफरींची हकीकत लिहून ठेवली आहे. त्याने 
केलेली समुद्राची, बेटाची आणि निरनिराळ्या जमातींच्या जीवितांची 
वर्णनें तपशिलाने भरलेली आहेत, कित्येकदां हा तपशील सारखा सार- 
खाच वाटतो; कारण या जमाती निरनिराळ्या बेटांत राहात असल्या तरी 
सगळ्यांचे मानवी मन एकच होतें. एकादी चित्रशाळा पहावयास आलेल्या 
माणसांनी जर विदोषर जिश्ासा दाखविली आणि चित्रांची बारीकसारीक 
सोंदर्येसुद्धां मार्मिकपणानें पाहिली तर चित्रकारांना अतिहय आनंद होतो 
आपल्या कृतीची विविधता आणि तिची सौंदर्य हीं इतक्या साहसाने आणि 
रसिकतेनं पहाणाऱ्या कुकूच्या जिज्ञासकडे पाहूनही सृष्टिकत्यांला खरोखर 
आनंद झाला असेल, त्याच्या आधीं परमेश्वराच्या कृतींचे इतकें सूक्ष्म 
अवलोकन कोर्णीही केलेलें नव्हतें. असो, 


या तिघांच्याही साहसब्रत्तीमुळें आणि जिजञासच्या वापरामुळे परथ्बीचा 
आणि मानवी जीविताचा व्याप तेव्हांच्या माणसांना खरोखरच स्पष्ट हाऊ 
चुकला आणि आपल्या जीविताचची प्रगति सुलळम झाली, हीं चरित्रे विद्या 
थ्योनी चांगलीं मन लावून वाचावी. 


आरंभीचे दोन शब्द 


ह &श ८ “च. कहा १७५ ७ /२./ कि डी /%७ /” 47 /२१ ७ हा 2 “१ “२ //१६ ५७% */7* /73 4.४ १७//%_/ ५_/० 


या सवांच्या प्रवासाचे नकादो ठिकठिकाणीं दिले आहेत. ते मूळ 
मुक्कामा्शी वेळोवेळीं ताडून पाहिल्याने त्याच्या पराक्रमाचे रहस्य विद्या- 
थ्योच्या ध्यानांत येईल; या वर्णनांत आलेला गमतीचा तपशील त्यांनी 
मनांत सांठवून ठेवला तर, त्याना आपलें संभाषण मनोरंजक करता 
येईल; आणि प्रत्येक देखाव्याबरोबर त्यांच्या मना'चा व्यापकपणाही वाढत 


जाईल, 


माझे मित्र श्री. गजाननराव ठोकळ यांनी अशा प्रकारचीं पुस्तके 
प्रसिद्ध करण्याचें काम अंगावर घेतल्यामुळे माझा फायदा असा झाला 
कीं, मूळ पुस्तकें मला बारकाईनें वाचावी लागली, आणि विद्यार्थ्यांचा 
फायदा असा होईल कीं, या वयांतच त्यांना मानवी साहस आणि जिज्ञासा 
यांची ओळख बरोबर होईल. 


पुणें उ र 
ता. ४-६-१९५१ श्रीपाद महादेव माटे 


ण्क्््ळ का (0:अ वकक 


1) 
ग्द्ि 
७७ 


अ.” >» ७०% ५७ » च “« « ळी च र नभा श्र 
“//»//>/“ “> “>> >.-“<>.><.>.“<.>/ >. > न» कु >» शू 


*»“/»- “>> /“£/7//>//“/”/“ /“./_“<“/“//“>न«> र “> >.->-<<><<“ “>> >»“/“//>“//“*४ ८“ «अह 


भार्का पोलो या व्हेनिस शहरच्या प्रवाशाची ओळख विद्यार्थ्यांना 
फार मौजेची वाटेल. व्हेनिसपासून चीनच्या राजधानीपर्यंत, तेथून 
जावा सुमात्रावरून हिंदुस्थानपर्यंत, व तेथून परत व्हानिसकडे त्यानें 
प्रवास केला होता ब पेकिंग नगरांत तो सतरा वर्षे राहिला होता. 
प्रथम त्याचें लहानसे चरित्र देतो. ब मग त्यान दिलेल्या प्रवास 
वणेनांतील कांहीं चुटके देतो. 


सार्क पोलोऱ्याही पूर्वी पोप महाराजानी रुत्रोकी या नावाचा आपला 
एक वकील चीनच्या दरबारात पाठवलेला होता. त्यान केलेले चीन 

देशाचे वर्णन फारच बोधप्रद आहे. तो म्हणतो, ““ आपण या देशाविषयी 
भलत्याच काहीतरी कल्पना करून घेतल्या आहेत, माझा अनुभव असा 
आहे कीं, सामाजिक व्यवहारांत आगि चालचलणुकीत हे लोक फारच सभ्य, 
सुसंस्कृत, आणि आदरयुक्त सलगीने वागणारे अहित. आपल्या युरोपांत 
जिकडे तिकडे भांडणे, मारामाऱ्या, केशाकेशी आगि रक्‍तपात हींच नेहमी 
चालूं असतात, पण त्यांच्या देशांत पहावें तो लोक दारू पिऊन झिंगलेले 
गै असले, तरी भांडणतंट्यांचा मागमूसही तेथें दिसत नाही. कोठेही जा, 


मार्का पोलो 


%८ “१ “०... 559%,/6% यक ७०००... ७००....»न्याळ नो 4" य.४० यक « % “७ ७ 7 29% 27% ७७ ७ ६ ७ / /७. ३” ळक ४ वक “क ह »८ ४-७ ७ च. 7 .हळ २. ७ ४ “0 र ८-2५७ 


लोक सचोटीने वागत आहेत, असे दिसून येईळ, त्याना घराला कुल्पे 
लावावी लागत नाहीत; किवा दारावर पहारेकरीही ठेवावे लागत नाहींत. 
त्याचीं गुरें ढोरे जर चुकून भलतीकडेच कोठे गेलीं, तर तीं परत मिळ- 
ण्याची व्यवस्थाही चांगळी केळेली असते, देशांत धास्याचा दुष्काळ 
पुष्कळदा पडतो. परतु लोक येवढे उदार आहेत की, आपल्या शोरांतले 
पसाभर धान्य तरी, ते भुकेल्या माणसाला दिल्याशिवाय राहाणार नाहीत.'' 
मार्को पोलोच्या मतावरून सुद्धां असें दिसतें की, हे लोक मोठे साहिष्णु असांघेत, 
सव आशियात कोठे कोठें ज्यू लोकांची आणि स्थ्स्त्यार्चांही वस्ती हाती. 
परंतु आपापल्या धर्माप्रमाणे बागावयास त्यांना पूणे मोकळीक असे, आणि 
त्यांच्या देवस्थानावर तेथें कसलेही कर बसावित नसत. 


भाको पोलो तेथे यावयाच्या आधींच, स्थापत्याची दोन प्रचंड कामे या 
छोकांनीं करून टाकलेली होती, चीन देशाची सुप्रसि& विस्तीण॑ मित; 
आणि पेकिग पासून कॅन्टीनपयेत वहात चाललेला प्रचंड कालवा, हीं तीं 
दोन कामे होत, या कालव्याचे शेबटचे सहाशे मेल कुब्लाई खानाच्या 
कारकादींत पुरे झाले. नवलाची गोष्ट हा की, इतकीं वर्षे झालीं तरी, ही 
मिंत आणि हा कालवा अजूनही जशीच्या तशी मजबृत अहित; आणि 
दुसरे म्हणजे येवढी विर्स्ताणे मित, अजून डुसऱ्या कोणी बाधली नाहीं व 
येवढ1 लाब कालबाही कोणी खणला नाही, टपालाची व्यवस्थाही या देशात 
तेन्हा झालेली होती, चिनी लोकाची कलाकुसर तर, माकां पोलो तेथे जाव- 
याच्या आधींही कित्येक सहस्त्र वर्षे प्रसिद्धी पावलेली होती, चित्रकला, 
खोदकाम, पुतळ्यांचे ओतकाम, चिनी मातीची भाडी करणे, आणि भव्य 
ऱहमारती बांधणें, या कामांत विनी लोक पटाईत होते. वाडूमया'चा विकासही 
पुष्कळच झालेला होता, इ, स, १०५ च्या सुमारासच चिनी लोकांनी 
कागदाचा शोध लावला होता; आणि ९३२ त चिनी भार्षेत छापलेले 


४१ १९ ४! 


मार्को पोली 


८८0०५,०५००३७ , ८०% 22 > 0. “५ 29 40% 9 ८0 आळे. 4६% ७०. कै. १७७ ७ ७६ &७ “% & “क ७८ ७ ८ ७ “ह ७ 4७. ८ ४६ ४0... 2 & “ क य की की य क क क क क क स क क क सल्सा स 


पुस्तक आजही पाहावयास सांपडतें, इ. स. सुमारे १००० च्या सुमारास, 
विनी लोकांनीं विश्वकोश रचला. याच्या सहस्त्र शाखा असून, याच्या 
छपाईचे काम प्रत्यक्ष बादशहाच्या देखरेखीखाली झालेलें होते. अर्थशास्त्र, 
तत्त्वज्ञान, धर्म, युद्धकला, शेतकी, चित्रकला, संगीत अशासारख्या विष- 
यावर पुस्तकेही छापून झालीं होतीं, सध्यांच्या छापाबयाच्या खिळ्यासारखे 
भाजलेल्या मातीचे ठसे असत व ते १०४३ च्या सुमारासच प्रचारांतही 
आलेले होते; आणि कागदाच्या चलनी नोटा सर्व साम्राज्यमर सरसह्य 
चाळू असत, नद्यांच्या पुलांवर पाण्याच्या दाबाने चालणारीं घड्याळे 
बसविलेली होतीं. वेधशाळात ग्रहाच्या गति मोजण्याचे काम चाठ्ं होते. 
निरनिराळ्या धातूंच्या आणि कोळशांच्या खाणी खणीत असत, आणि 
ससुद्रांतेन मीठही काढीत, 


१२६० सारली, निकाली पोलो, आणि माफिओ पोलो, असे दोघे बंधु 
बरोबर हरतऱ्हेचा किमतवान्‌ माल घेऊन, जह्ाजावरून कॉनस्टँटिनोपलकडे 
निघाले, इटलींतील व्होनेस हहरचे हे रहिवासी मोठे संभावित आणि 
मारितगार होते, कॉन्स्टेंटिनोपळ येथे गेल्यावर त्यांना वाटूं लागलें की, 
आपण काळ्या समुद्रांत जावे, आणि व्यापार करावा, बरोबर जडजवाहि- 
राचा पुष्कळ भाल घेऊन, ते या समुद्रांत गेळे, आणि पूर्व किनाऱ्यावरील 
बंदरांत उतरून, तातेरी लोकांच्या मुलुखांत शिरले, बका या नांवाचा त्यांचा 
एक अतिदाय संपन्न आणि प्रबल राजा होता. तो मनानेंही मोठा उदार 
आणि सुसंस्कृत होता, पोलो बंध त्याच्या दरबारात गेळ, आणि त्यांनीं 
त्याला चांगली 'चांगलीं रत्ने नजर केली. ओऔदायोत आपण मागें पडतां 
कामा नये असे वाटून बकोनें दुप्पट किमतीची रने त्यांनाही नजर केली, 
पोलो बंधु तेथें वषभर राहिले; आणि घरी परत जाण्याचे त्यांनीं ठरविले, 
परंतु परतीच्या मुलुखांत, य॒द्धांचा धिंगाणा फार माजला आहे असें वर्ते 


$ दै ५ 


मार्का पोलो 
मान आल्यामुळे, तसेच पूवकडे जावे, आगि तातरी मुलखाला वळसा 
घालून, दश्तिणेकडे वळून, कानस्टांथ्नोपलला जावे असे त्यार्नी ठरावेले. 
व्होल्गा नदी ओलांडून ते पुढे गेळे; आणि मग त्याना एक निजेन प्रदेश 
लागला, सतरा दिवसपर्यंत ते या प्रदेशातून रखडत गेठे; आणि शेवटी 
बखारा शहराला पोहोचले. 

ते बुखारा येथे असतांना, एक मोठा बुडिमान्‌ आणि खानदानीचा माणूस 
त्या शहरांत आला, हा कुब्लाईखानाकडे आपल्या देशा'चा वकील म्हणून 
चाललेला हाता, इटली देशातील दोन व्यापारी येथे आले आहेत असें कळल्या- 
वरून, केवळ जिशासा म्हणून तो त्यांना भेटावयास गेला, आतापरयेत पोलो 
बन्धु तातरी भाषा चागली बोलूं लागळे होते. या तिघांची मोठी मैत्री जमली, 
तेव्हा ता त्या पोलाना म्हणाला, “ तुम्ही माझ्या वरोबर कुब्लाइखानाच्या 
राजधानीला चला, तुम्हाला पाहून खानाला अतिदाय आनंद होईल, 
तेथे तुमचा मान मरातत्र होईल; आणि पेकाही पुष्कळ मिळेल.'? आडवाटेने 
कॉनस्टैंटिनोपलला जाण्याऐवजीं तातरी मुलखांतील युद्ध संपेतोपयंत, आपण 
खानाच्या मुलुखांत जाऊन यावें असा हिशेब करून, हे पोलो बन्धु वकिला- 
ग्ररोबर निघाळे, राजधानीत पोहोचचाबयास त्याना तब्बल वर्ष लागले, 

पोळा बंधु जेव्हा कुब्लाईंच्या राजसभत आले, तेव्हा त्या 
खानाचे वय ५९ वर्षांचे होतें. त्याचे तरुणपण झगडण्यात गेले 
हाते व मध्यम बय मुलूखगिरीच्या मोठमोठाल्या योजनांत गळे होतें, 
चीन देशाच्या स्वारींतील एका वेढ्यात त्याचा भाऊ मरण पावबल्या- 
नतर, कुब्लाईखानानें आपल्या नावाची डाही फिरवली, यावेळी तो सुमारे 
४४ वषांचा होता. सेन्याची जमवाजमव करून, तो चीन देशावर चाळून 
गेला; आणि त्या देशातील एका शहरांत त्यानें आपली राजधानाच 
कायम केली. सध्यांचे जें पेकिंग शहर आहि तें तेंच हाय, पोलो बंधु या राज- 


१ ४ ३१ 


मार्का पोलो 


““>“-“/->८2>“.“/“.”/-“-/“>*-< > ऱ्ो ““->.  >“>.“.““-“।.>“/ “ठर 


घानींत आले, तेव्हां या नगरीचे वैभव अगदीं कळसाला पोचले होते 
चीन देश्याच्या सुंग राजवद्यार्शी पत्नास वर्षेपयेत मोगल लोकांची मारामारी 
चाललेली हाती. शेवटी हे घराणें बुडाले, आगि मोगल लोक पूर्वेकडील 
प्रदेशाचे स्वामी झाळे, ते स्वामी झाले खरे पण, तेव्हांपासूनच त्यांच्या 
ऱ्हासाला सुरुवात झाली, चीनसंबंधाने अशी एक म्हण आहि कीं, “हा 
देश म्हणजे एक खारा महासागर आहे; आगि याला येऊन मिळणाऱ्या 
सार्‍या नद्या खाऱ्याचच होऊन जातात. ? मोगल लोक या देशांत वस्ती करू 
लागतांच, त्यांचे गुण मावळू लागले, देसांत असंतोष आगि बंडाळी ही 
सुरूं झाली, वास्तविक पाहता हें साम्राज्य चिनी समुद्रापासून पश्चिमेकडे 
युरोपप्येत, आणि शीतकटिब्रंवापासून, तो दक्षिणिकडे हिंदुस्थान, ब्रह्मदेश 
आणणि सयाम येथपयंत पसरलेले होतें. पण हें आवाढव्य साम्राज्य, मोगल 
लोकांचे वेभमब शिखराला पोचते न पोचते तोंच, मोडकळीला आले. मांत्र 
कुन्लाइखान याच्या डोक्यांत अजूनही नवे प्रदेश जिकण्याची कट्पना 
घोळत'च होती. 

पण हा कुब्लाइखान तरी येवढ्या अफाट साम्राज्याचा स्वामी कसा 
झाळा, हे कळाबयास हवें असलें तर, त्याच्या मोंगल वंद्यची कुळकथा 
नीट पाहिली पाहिजे, कुब्लाशचा आजा हा ११६२ त जन्मला. त्याचा 
बाप एका मेगोलियन जमातीचा नाईक होता, कुब्लाईखानानें जें साम्राज्य 
भोगले, ते त्याच्या या आजानें मिळविलेले होतें, त्याचे नांव जॅंगिझखान असे 
होतें, सबंध आशिया खंड जिंकून त्याच्या फौजा युरोपांतील नीपर नदीच्या 
बाळवंटांत विभान्तीसाठी हुरश करून बसल्या होत्या, तेरा वर्षीचा असतांना 
हा जेंगिझलान आपल्या जमातीचा नाईक बनला; आणि त्यानें एकदमच 
स्वारी शिकारीला सुरवात केली, या पोरार्चे कोण ऐकतो, अशा हिशेबाने 
कित्येक तातरी जमातींनी बंडाळी माजविली, जेंगिझखानाची आईही 


4 4 
श् जी 


मार्का पोलो 


बडी शूर बाई होती. मायलेकांर्नी बळ वांघलें; आणि या बंडखोर जमा- 
तींची चागली हार्डे मोडली, चव्वेचाळीस वर्षाचा झाल्यावर, त्याला बाहू 
लागले कीं, सम्राट ही पदवी घेण्याला आतां हरकत नार्ही, सम्राट-पदाचा 
आसैप्रेक झाल्यावर त्यानें उत्तर चीनवर स्वारी केली, त्या देशाच्या भिंती 
तील बेशेबरील पाहरेकऱ्यांना त्याने पैसे चारले, आगे तो आंत घसला 
ब त्याने आपले साम्राज्य प्रस्थापित केले, 


इ. स, १२२२ त पश्चिमेकडे चाल करून गेलेठें मोगल सेन्य जॉर्जया 
देशांत दिरले, जेगिझनें आपले कांहीं वकीठ रशियांतही पाठवले, बेड्या 
रशियनारनी या लोकाचे खून केळे, आगि मग सूडाच्या बुडीनें वेडे झालेले 
जैंगिझखानाचे लोक साऱ्या मुलखार्‍चा विध्वंस करीत एकीकडे बल्गेरियापर्यत 
पोंचळे ब दुसरीकडे पोलंडपर्यंत गेळे, याचा अर्थ असा कीं, जेंगिझखानाचे 
साम्राज्य पूर्वेकडे चिनी समुद्रापासून तो पश्चिमेकडे पोलंडपर्यंत पसरले, खान 
ळछवकरचन सृत्यू पावला; आणि मोंगल लोकांची लाट आशियाकडे परत 
फिरली, यावेळीं पोपच्या घर्मपीठातील कांही महग्त मोंगळ मुलखांत गेले, 
आणि त्यांना सांगूं लागले का, “' तुम्हांला पश्चाताप होऊं द्या. तुम्ही 
ख्रिस्ती लोकाना मारठेळे आहि, तुम्ही अतःपर परमेश्वराच्या या लोकांना 
सतावू नका,” १२५३ त पोपच्या मठांतून आणखी कांहीं महन्त तिकडे 
गेळे, मोगल सम्राटाला ख्रिस्ती बनवावे, असा त्यांचा मानस होता; यावेळी 
जॅंगिझखानाचा नातू म्हणजे कुब्लाइखानाचा मोठा भाऊ गादीवर होता. 
त्यानें या महग्तांना उत्तर केळे की, ' परमेश्वर एक आहे. असें म्हणणारे 
लोक महामूखे आहेत; अनेक आहेत असें समजणारे लोक मात्र खरेखरे 
शहाणे होत; ' तो येवढ्यावरच थांबला नाहीं, त्याने पश्चिमेकडील देशांची 
चवकशी केली; आणि मग तो या महम्तांना म्हणाला, “ तुमचे देश जर 
येवढे संपन आहेत तर ते आम्हाला लटलेचच पाहिजेत, !? पण असें बोल- 


मार्को पोलो 


7-2”... >>/-"»**/> >.“ .*.*-.*>. -*:< 7 > 7. 


णारा हा मंगु नांवाचा सम्राट १२५९ त मरण पावला; आणि त्याप्वा 
भाकटा भाऊ कुब्लाई हा गादीवर आला, 

या कुन्लाइखानाला मोंगल वेश्याचा पूवज समजतात, कारण, चीन 
देशाच्या सुंग राजघराण्याचे पुरते निसंतान यानेंच केलें. पण खरी गोष्ट अश्ली 
आहि की एकीकडे यांचा पराक्रम शिगेला पोचत असतांना, दुसरीकडे 
त्याच्या साम्राज्यांत अनेक अनर्थ-परंपरा सुरूं झाल्या, उत्तरेकडील रानटी 
जमाती बंडे करून उठल्या; सेन्यांत दुफळी उत्पन्न झाली; अंमलाखाली 
आणलेल्या निरनिराळ्या लोकात असंतोष फेलावला; आगि जपानी समुद्रांत 
मुरू केलेल्या लढ्यात त्याचे अनेक पराभव झाले, कुब्लाईखानाच्या हें 
“यानांत आलें की, एकद्र लक्षण काहीं ठीक नाहीं; आणि जर साम्राज्य 
सावरून'च भरावयाचें असेल, तर शिक्षणाचा प्रसार करावयास हवा; आणि 
मग शिक्षणाच्या मागोमाग देशांत शांतताही प्रस्थापेत होईल. 

वर सांगितलेल्या त्या प्रवाशांना सेवकांनी कुन्लाईखानाच्या समोर नेऊन 
उभें केलें, खान मोठा प्रेमळ आणि विनयशील माणूस होता. लॅटिन देशांतील 
असली माणसें त्यानें पूर्वी कधीं पाहिली नव्हतीं, त्यांना पाहून कुब्लाईला 
फारच आनद झाला, त्यानें त्यांच मनापासून स्वारात केले, आणि आपल्या 
दजीला शोभेल, अशी त्यांची बडदास्त ठेवली. विश्रास्तींत कांहीं दिवस 
जाऊं दिल्यावर कुब्लाईनें त्यांची विचारपूस केली; आणि मग, उभय- 
तांचा संवाद सुरूं झाला, रोमन सप्राट कोण आहे, त्याचे राज्य केवटें 
आहे, त्यांचा धम कोणचा आहे, त्यांच्या देशांत न्यायाच्या पद्धति 
कोणच्या आहेत, त्यांची युद्धन्रीति कसली आहे, या'्ची त्याने चौकशी 
केली; आणि मुख्य म्हणजे पोपचा अधिकार काय, धर्मपीठाचा अधि- 
कार कसा चालतो, आणि खिरस्ती घर्मार्ची तत्वें कोणची, याचीही 
चौकशी त्यानें केली, यावेळेपरयेत हे रोमन प्रबासी तातरी भाषा चांगले बोलूं 


मार्का पोलो 


लागले हाते आगि ते चांगले माहततिगारही झाले होते. कुब्लाईनें विचार- 
लेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यानी अश्या रीतीनें दिलीं की, कुब्लाई अगदीं 
संतुष्ट होऊन गेला, प्रवाशांच्या संबंधाने त्याला फार आदर उत्पन्न झाला, 
मग एके दिवर्शी तो त्याना म्हणाला, ' आपण फार थोर ग्रहस्थ आहा; 
आम्ही आमचा एक सरदार आपल्या बरोबर देतो. त्याला घेऊन आपण 
आपल्या देशांत जावे व पाप महाराजांची वब त्याची भेट करबावी. पोप 
महाराजांना आमची विनंति येवढींच आहे का, ख्रिस्ती धमाची मूलतत्वे, 
वक्तृत्व, न्यायशास्त्र, व्याकरण, गणित, ज्योतिष, सगीत, आणि भूमिति, 
या कलांत आणि शास्त्रात प्रवीण असलेले दभर पंडीत त्यांनीं आमच्याकडे 
धाडावे. हे पंडित 'चागळे बादकुराल असावित, लांनीं आमच्या विद्वानांना 
सरळपणे पटवून द्यावें की, ख्रिस्ती घर्म हा दुसऱ्या कोणत्याही धमापेक्षा 
श्रेष्ठ आहे; आणि ज्या सत्यावर तो आधारलेला आहे, तै सत्य जगाला इतर 
सत्यापेक्षा जवळचे वाटण्यासारखे आहे, तातरी लोकाचे जे देव आहेत, 
आणि ज्यांच्या मूर्ति त्यांनीं आपल्या घरात बसविलेल्या असतात, ते सारे 
देव नसून भुतेखते आहेत; आणि एकंदर प्राची दिशेकडील लोक अशा 
देवताना भजण्यात मोठा प्रमाद करीत आहित, असे त्यांनी पटवून द्रावे,! 
याशिवाय, कुब्लाईने या प्रवाशाना आणखीही एक काम सागितले. तो 
म्हणाला, ' येशू ख्रिस्ताला मी अतिराय मानतो आणि त्याला खरा देव 
समजतो, म्हणून, आपल्या देर्शी जाऊन तुम्ही जेव्हां परत इकडे याल, 
तेव्हा येतांना, येशूच्या समाधीपाद्यीं तेवत असलेल्या नंदादीपांतील थोडेसें 
तेलही इकडे घेऊन या, ' कुन्लाईखानाचें हे बोलणें ऐकून, प्रवाशांनी 
त्याच्यापुढे दंडवत घातळे; आणि ते म्हणाळे कीं, आपण सांगितलेली 
सर्व कामे आम्हीं चांगलीं झदून करूं, हें ऐकतांच कुब्लाईखानानें 
तातरी भाषेंत पोपच्या नांवाची पत्रे लिहविलीं, आणि तीं त्यांच्या 


$ & $ 


माकी पोलो 


हवाली केली, आणि आपल्या सहीशिक्‍्याचे प्रवास-परवांनेह्दी त्याने 
या प्रवाशाना दिले, हे जवळ असले म्हणजे प्रवाशाची सर्व तऱ्हेची 
सोय होत असे. प्रत्येक मुक्कामाचे अधिकारी, परवाना पाहिल्याबरोबर 
प्रवाशांची विचारपूस करीत, त्यांना शिघासामग्री देत, आणि त्यांच्या 
सुखसोयांकडे पहात. 

परवाने घेऊन हे दोघे पोलो बंधु स्वदेशाकडे परत वळले. कुब्लाई- 
खानाने नेमलेला वकील खोगातल हा अ्थोतःच त्यांच्या बरोबर होता. 
बीस दिवस वाट चाल होते न होते, तोःच स्वोगातलळ आजारी पडला; 
इतका की, ता जगतो कीं मारतो, असे झाले, रोबटीं तो म्हणाला कीं, 
माझ्याच्यानें पुढें येववत नाहीं, बरीच भवति न भवति होऊन पोलो 
बेधूर्नी त्याचा निरोप घेतला, आणि ते आपल्या मार्गाला लागले, खानाचे 
परवानेचच बरोबर असल्यामुळे गावोगावच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चांगली 
व्यवस्था ठेवली; वाटग्ःचीला त्याना पैसे दिळे; आणि प्रसंगविशेषीं वाट 
दाखविण्यासाठीं बरोबर माणसेंही दिली, इतकी सोय होऊनही या पोलोंचा 
परतीचा प्रवास अतिदाय जिकीरीचा झाला, येता येता, तीन वषानंतर ते 
आर्मिनियांत येऊन पोहोचले. १२६९ च्या एप्रिल महिन्यांत, ते एकर 
येथें आले, तो त्याना कळलें की, पाप चवथा %मंट हा मरण पाबला 
आहे. गांवच्या धमोधिकाऱ्यांकडे हे दोघे गेले, आणि कुब्लाइखानानें 
सांगितलेल्या निरापाचे आतां काय करावें, असें त्यांनी त्याला विचारलें, 
तो म्हणाला, “ नव्या पोपची निवडणूक लवकरच होईल. तोंपर्यंत तम्ही 
थांबा, आणि मग रोमला जा. ) ह्या सल्ला पोलो बंधूना पटला; आणि 
दरम्यानच्या काळांत, आपल्या घरी एकदा जाऊन यावे, असें त्यांनी 
ठरावैर्ले, घरी आल्यावर, त्यांना एक नवाच प्रकार दिसून आला, 
निकोला पोलोऱची बायको मरण पावली हाती. तो चीन देशाकडे निघाला 


१ ९ $ 


मार्को पोलो 
तेव्हां त्याची ती पत्नी गरोदर होती, त्याच्या पश्चात्‌ ती प्रसूत शोऊन तिला 
मार्को नांवाचा मुलगा झाला होता. आणि तो आतां पंघरा वर्षांचा होता. 
हाच मार्को पुढें मार्को पोलो या नांवाने प्रसिद्द झाला, 

नव्या पोपची निवडणूक लाबत*च चाळली, दोन वर्षे ते व्हनिस येथे 
राहिले, परंतु महाराजांच्या निवडणुकीचा योगच येईना, शेवटी, कुन्लाई- 
स्वान आपल्याला दोष देईल, यांनी आपला निरोप नेलाच नाहीं, असे 
म्हणेल असे वाटून, ते दोघे चीन देञाकडे जावयास पुन्हा निघाले. 
जातांना त्यार्नी मार्काला बरोबर घेतले, येद्रू ख्रिस्ताच्या नेदादीपांतील तेल 
बरोबर न्यावयार्चे होतें, म्हणून ते जरुदालळेमला आले आणि तेल घेऊन, 
तडक पूर्व दिशेला निघाले, दरम्यान इकडे नव्या पोपची निवड झाली, 
याये नांव दहावा ग्रेगरी असे हाते. पोलो बंधूनी आणलेला कुब्लाई- 
खानाचा निरोप त्याच्या कानावर आलिल| होता, परंतू, हे त्रंधु, निवडणूक 
होत नाहीं असे पाहून, आचार्य-्पाठांत निरोप न पोहाचवितांच परत 
गेलेले आहेत, असंही त्यानें ऐकले. म्हणून त्यानें आपले दोन दूत त्वरेने 
पोलो बंधूंच्याकडे पिटाळले, आणि त्यांना परत रोमला आणाविलें, ग्रेगरीने 
त्यांचे चांगळें स्वागत केळे, आणि निकोलस आणि विल्यम असे दोन 
महम्त त्याने पोलोच्या बरोबर दिले. कुब्लाईखानासारठी, त्यानें कांही 
स्फटिकाची भांडीं दिलीं; आणि तिघांचा प्रवास सुखाने व्हावा म्हणून 
गांवोगांवच्या मठपतींना आशापन्नें दिलीं, तिघे पोलो, आणि हे दोघे महन्त 
असे पांच लोक कुब्लाईखानाकडे जावयास निघाले, 

आर्मेनियापयेत पोहोचताच, वर्तमान आठे कीं, बाबिलोनच्या राजानें 
अर्मैनियाबर स्वारी केलेली आहे; आणि तो सारा मुलूख बेचिराख करीत 
चालला आहि. हॅ वतमान ऐकतांच ते दोघे महस्त अगदीं गडबडून गेले, 
पोर्लोनीं त्यांना परोपरीने समजावून सांगितलें, पण ते म्हणाले, * आम्हांला 


4 १० १ 


मार्का पोलो 


७५४४४९०७५० >.” कॉ क? व” &0 व्य ७ जा क “” कॉ ककीचळ आळी क 28 आ ळल कक खण प], ]ि.€ बालू इ॒डडु ्ा्ार्र््तल््सलाखसाख््यबा्ख्गबयहा हि हबया ््रगयवाबडेशेशह्खिबिडडखाडम्म 


आ न्कन्डयकलक 


दम निघत नाहीं.' महाराजांनीं कब्लाईखानाला , दिलेलीं पत्रे आणि स्फटि 
काँग्चीं पार्त्रे त्यांनीं पोलोंच्या स्वाधीन केली आणि आपण घराकडे परत 
वळले, पोलो मंडळी मात्र, कसलीही दरद न बाळगतां, पूर्वेच्या रोखाने 
नाळ लागली, तीन वर्षे प्रवास केल्यानंतर, त्याना वतमान कळलें की, 
कुब्लाइखान शांगटु शहरी आहे. खानालाही कळलें की, ते ख्रिस्ती प्रवासी 
परत आले आहेत. अजन ते बरेच लाब होते, म्हणून खानाने आपली 
माणसें त्यांना भेटावयास धाडली, थरडीची बाधा होऊ नये म्हणून, त्याने 
त्यांच्या वस्त्रश्रावरणाचीही व्यवस्था केली. होतां होतां कुब्लाईसानाच्या 
दरबारांत ही मंडळीं एकदाची येऊन पोहोचली, 


1 /१ 


द क - च््ड कशी. 


/ँ ख्य 
हर र भे ह, 
र्न ती 


हक नह र ऱ्र 
११॥॥॥/. > - टर 
॥ 11 त 
ह: :१ न :-.५< “न 
च दे क न्या ---रवन्यळळी,, | | तै 


राजसभा, भरल्यावर हे तिघे पाहुणे मोठ्या नम्र भावनेनें समा-मदिरांत 
शोरले; आणि त्यांनीं कुब्लाईला साष्टांग प्राणिपात केला. पोलोंनीं झाळेली 


११ ! 


मार्का पोलो 


स्व हकीकत खानाला सांगितली, आणि प्रवासाचे , वतमानही अनुक्रमाने 
कथन केले, ग्रेगरीनें पाठवलेली पात्रे आणि जेरुसलेमहून पोलोंनीं आणलेले 
नेदादीपांतील तेल, हीं पाहुन राजा अगर्दी खृष हाऊन गेला. माकीकडे 
वळून तो म्हणाला, “ हा कोण ? निकोलोने उत्तर केळे, ' हा आपला 
सेवक-माझा मुलगा आहे.' अठरा वषीचा माको यावेळीं अतिशय 
तरतरीत दिसत होता. स्वानाने त्याला आपल्या परिचारकामध्येच्च दाखल 
करून घेतले, आणि पोलो वेधूना मानकऱ्यांच्या जागा देऊन त्यानें 
त्यांचा बहुमान केला, तथापि, मार्कावर त्याची मर्जी फारच बसली, आणि 
दरबारांतील लोकही त्याला चाह लागले. 

मार्का अतिदाय बुद्दिमान हाता. थोड्याच दिवसांत चार निरनिराळ्या 
भाषा तो बोळू लागला, ही त्याची चलाखी पाहून, खानाने त्याच्या 
गुणांचा उपयोग करून व्यावयाचे ठरवले, काराझान हें एक फार दूरचे 
ठाहर होते. तेथें कांही सरकारी काम निघालेले होते, राजाने ही कामगिरी 
मार्कोंवर सोपविली, सहा महिने प्रवास केल्यावर मार्को तेथे पोहचला ! 
त्याने आपलें सांगितलेले काम फ(र शहाणपणाने आणि मागचा पुढचा 
विचार करून तडीस नेळे, आणि तो कुब्लाईखानाकडे परत आला. 
काम फत्ते झाल्यामुळे खान खूष झालाच पण शिवाय, मार्कोने केलेल 
प्रवासाचे वर्णन ऐकून, त्याची मोठीच करमणूक झाली; आणि 
निरनिराळ्या प्रदेशांतील लोकांच्या चालीरैतीची माहिती टिपून घेण्याची 
माकोची आस्था पाहून त्याला त्याच्याविषयी फारच आपुलकी उत्पन्न 
झाली. सतरा वर्षेपयेत मार्का कुब्लाईखानाच्या पदर्री रीहला, आपल्या 
अफाट साम्राज्यांतील दूरदूरच्या ठिकाणी सुद्धां कांहीं महत्वाची आणि 
नाजूक कामें उत्पन्न झालीं, तर कुब्लाईने मार्कोला धाडावें, असं ठरून 
गेले, मार्को साम्राज्याच्या चारही दिशांना हिंडला आणि या भ्रमन्तीत 


१ १२ १ 


क्ल ७. २ २७.७४. ०. ७ २७. ७ 


माक पोलो 


र 
“>> 7४४२७ ॥ी १४४ “ही “> “ळू “७ >” न 


त्याला ज स्थलविशेष दिसले, त्याने ज्या 'चालीरीती पाहिल्या, त्या साऱ्या 
त्याने आपल्या टिपणव्हीत नोंदून ठेवल्या, सतरा वषे गेल्यावर, पोलो 
मंडळीना वाटले की, आता आपल्या देशाला परत जावे. आतापयत 
त्यांनी पष्कळ जडजवाहीर आणि सोने नाणे कमावलेले होते. तें बरोबर 
घेऊन घरी जावे असे त्यांना वाटू लागळे, दुसराही एक विच्चार त्यांच्या 
मनाला चाढून गेला, खान आता म्हातारा होऊं लागला होता. तो जिवत 
आहे तोंच आपल्या परतीच्या प्रवासाची सोय होईल, हे हीं त्याना माहीत 
होतें; म्हणून त्यांनीं घरीं जाण्याचा निश्चय कायम केला, एके दिवशीं बोलतां 
बोलतां, ते राजाच्या पायां पडले आणि आपला मनोदय त्यानीं त्याला 
कळविला, राजा म्हणाला, ' ठम्ही हे काय मनांत आणले आहि १ 
हवेच असले तर, सध्याच्या दुप्पट घन मी उुम्हाला मी देईन. पण घुम्ही 
येथून जाऊं नका, ' पण पोलोना घराच्ची ओढ लागलेली हाती, आणि 
याचच वेळीं दुसरा एक अकल्पित प्रकार घडून आला, 


हिदुस्थानचा (१) राजा अरगान याची राणी बोल्गाना ही याच सुमारास 
मरण पावली, मरताना तिने नवऱ्याला सागितले की, तुम्हांला पुन्हां ळग्न 
कर]वयाचे तर वरा, पण नवरी मुलगी मात्र मी ज्या कुळांतील आहें, त्याच 
कुळांतून तुम्हीं निवडली पाहिजे, दुसऱ्या कोठच्याही मुलीला तुमच्या 
मनोमदरात आणि सिंहासनावर स्थान मिळता उपयोगाचे नाही, माझ्या 
माहेरचे कूळ चीन देशात आहे; आणि तेथे कब्लाईखानांचे राज्य आहि. 
राजाला अर्थातच लग्न कराबयाचे होते ! मात्र राणीच्या मनाप्रमाणे 
बागावयाऱचे त्याने ठराविळे, मग आपल्य! दरबारांतील तीन चांगले 
शहाणे मानकरी, मोठा लवाजमा बराबर देऊन, त्याने कुन्लाईखानाकडे 
धाडले; आणि त्याला बिनॅतिपत्र लिहिळे कौ, आमच्या दिवेगत पत्नीच्या 
माहेरच्या कुळांतील एक नवरी मुलगी आमच्यासाठी रवाना करावी, कुब्लाई- 


४१ १३ :! 


मार्का पोळा 


अहि,” / /-५./-”/०/- >> >? >>.-< > २“ न“ ५. >>> >> -“.. “. “>> -“ >> «4 ८५«< -*<*« “० ८ ८ “1 ““ 7“ टार. < “ह 


खानाने, पत्र वाचताच, चोकशी सुरूं केली; आणि कोगाटिन या नावाची 
सतरा वर्षीची एक अत्यंत सुस्वरूप आणि नागर चालीरितीची त्या घराण्या- 
तील मुलगी पसंत करून, या मानकऱ्याच्याकडे धाडली, ही सर्व मंडळी 
आपल्या वाटेला लागली, तों वर्तमान आलें कीं, तातरा राजांचे युद्ध जुपलेले 
अहि आणि म्हणून नेहमीची पश्चिमेकडली वाट बेद झालेली आहि. 
इतक्यांत, ईस्ट इंडियाकडीळ समुद्रांतील बेटांवर खानाच्या कांहीं कामासाठी 
गेलेला मार्को पोलो परत आला; आणि तिकडे कोणकोणचे देश आहेत, 
जलप्रवास कसा सुखाचा आहे, इत्यादी हाकिकती त्यानें खानांला सांगितल्या, 
मानकऱ्यांनींही त्या ऐकल्या; आणि त्यांना वाटू लागलें कीं, नेहमीची 
वाट जरी बंद झालेली असली तरी, मार्को पोलो ज्या समुद्रातून सफर 
करून आला आहे, त्या समुद्रांतून, हिंदुस्थानला अथवा इराणला 
आपल्याला जातां येण्यासारखे आहे, तिकडून येऊन त्यांना आतां तीन 
वर्षे होऊन गेलीं हाती, आणि म्हणून घरीं परत जाण्याची त्यांची उत्कंठा 
प्रबल झालेली हाती, पोलो मंडळीही स्वतःच्या देशाला जावयास अतिदाय 
उत्सुक झालेली आहित, हें त्यांना माहीत होतें, म्हणून त्यांनीं पोलोशी 
संघान बाधले; आणि कुब्लाईखानाला विर्मात केली कीं, या समुद्रांतील 
बाट दाखविण्यासाठी पाोलोना जर आमच्या बरोबर टिळे तर आम्ही 
नवरी मुलगी घेऊन स्बदेशात परत जाऊं, पोलो मंडळींनी तर स्वदेशी 
जाण्याची इच्छा मार्गेच दर्दित केली होती, कुब्लाईला ' नाहीं ! म्हणवेना 
आणि म्हणून त्याने सवोची तयारी करून दिली, पण तो पोलोंना म्हणाला 
की, घरीं थोडे दिवस राहून, तुम्ही आमच्याकडे पुन्हां परत या, ते तान 
मानकरी, नवरी मुलगी, मार्को पोलो, त्याचा बाप, व त्याचा चुलता, 
आणि मानकऱ्यांच्या बरोबरचा लवाजमा, तसेच नवऱ्या मुर्लावरोबर 
स्थानाने दिलेली माणसे, आणि सामानसुमान, व दोन चाररॉ खलाशी, 


४१ १४ ! 


मार्का पोलो 


येबढ्यानी चवदा जहाजे भरली, आणि मानकरी हिदुस्थानाकडे आणि 
पोलो व्हेनिसकडे जावयास निघाले, 


“»//&0/_ 40,849” 


स्नो व / 


तीन महिन्यांनी ते जावा ब्रेटांत आले ब तेथून पढे ते हिंदुस्थानात येऊन 
पोहांचले, येवढ्या काळांत त्याच्या बरोबरची बहुतेक माणसें दगावली होती ! 


१ १५ ! 


मार्का पोळो 
बैदरांत उतरतात, तोच त्यांना कळलें की, राजे अरगान म्हणजे नवे 
नवरेदेव हे मरण पावले अहित; आणि कासान या नांवाचा त्यांचा मुलगा 
लवकरच गादीवर बसणार आहि, मानकऱ्यांनीं बापासार्ठी आणलेली नवरी 
मुलाला अपण केली ! येथे मानकऱ्यांचें काम संपले, 

पोलो मंडळी आपल्या देशाकडे चाळू लागली तेव्हां त्यांना वर्तमान 
कळलें की, कुब्लाईखान मरण पावलेला आहे, अर्थात्‌ पुन्हां त्या राजासाठी 
चीन देशाला परत येण्याचे कारणच उरलें नाहीं. ते पश्चिमेकडे निघाले, 
आणि त्रिविझोग्द वरून कॉन्स्टॉख्नोपलला गेले, व तेथून आपल्या गांवीं 
म्हणजे व्हिनिसला १२९५ साली सुखरूप जाऊन पोहोचले, 
घरी परत आल्यानंतर, तिघा पोलोनीं थोडीशी विश्रास्ती घेतली. 


* 7 /७ २ % | रतीय 


क्र 


आणि भग मोठा मेजवानीचा बेत केला, मेजवानीला आपले सगळे 
१ १६ $ 


अभिनयससम्राज्ञी १७ 


४%५.८४८/०./०,/९०९2७ ०८/०८/९७११ 47% ८0७ 0 हनक ७ ७४७ &”७ "७ & ७ ७ /0 0७ 470 &७ ०७ 7७ ७0७ ७ &% /% “७ % ७ ८७ ७७ ७ फे &0% 4” ल को “८१ /<% /७ »7% 7 77७ 4७ ९ (ही हच ह प. ४” ७ ०१ &.. ७” ७. ० ७ “ हक 


पहातां तिला शूटिंगच्या वेळची आठवण झाली हाती, त्यावेळीं ती शेतांत 
बांकून कांहींतरी खुडीत असते असा सान होता. तिनं स्वाभाविकपणे 
वक्षस्थळ झांकून जाईल असा पदर घेतला होता, पण कृष्णमूर्तीना तो 
पसंत पडला नाहीं ! “ पदर जरा नीट ठेवा हं! ” असं उद्वारून ते 
झटकन्‌ तिच्याजवळ आले होते व त्यांनीं सहुजच केल्यासारखं दाखवून 
तिच्या वक्षःस्थळावर हात दाबून तिचा पदर सरकवला होता. तेव्हां तिला 
त्याचं विशेष वाटलं नव्हतं, पण आतां त्या मोठ्या रुंद गळ्याच्या 
चोळींतून तिचचा उरोभाग किती स्पष्टपणं दिसत होता हें पाहून ती अत्यंत 
शरमली. 


तसंच दुसऱ्या एका प्रसंगांत तिला पेहूण्याच्या ड्रेसांत पडद्यावर आणलं 
गेलं होतं ! पोहण्याचा सीन घेतां येईल असा प्रसंग त्या कर्थेत कुठं नव्ह- 
ताच पण देठ नबलराम व दिग्दशक कृष्णमूर्ति या दोघांचंहि म्हणणं पडलं 
कीं, जयश्रीदेवी पोहण्याच्या पोषाखांत फार सुंदर दिसतील, तेव्हां तसा एक 
तरी सीन जरूर हवाच !| त्या बिचाऱ्या कथाळेखकाच्या म्हणण्याकड कुणीहि 
लक्ष दिल नाहीं ! त्या'चं म्हणणं की, खेडेगांवांतील ही आशक्षित तरुणी 
पोहण्याच्या आधुनिक वेषांत पडद्यावर आणणं, वास्तवतेला धरून होणार 
नाही ? पण त्याचं कोण ऐकणार ? जयश्रीला मुळींच पोहूतां येत नव्हतं | 
तिने तसं म्हटलं तेव्हां दोघेहि खदखदून हसले ! “' अडवा, तुम्हांला पोहा - 
यला सांगतेय कोण ! नुसता हा पोषाख घालून पाण्यांत पाय सोडून बसा 
इथे । ?' त्या प्रसंगाला साजेसं गाणे रचलं गेलं : म्हटलंहि गेल | गळ्या- 
इतक्या पाण्यांत उभं राहून तिने हात हालवल हेते. आतां तो प्रसंग 
पडद्यावर प्रत्यक्ष पाहतां पहाता ती विलक्षण कुन्ध झाली ! तिनं पोहण्याचा 
पोषाख पूर्वी कधीं घातला नव्हता पण तरीसुद्धा तो इतका खोल गळ्याचा 
ब विरविरीत असतो, असं तिला वाटेना | द्दा मुद्दामच इतका रुंद गळ्याचा 

अ..«२ 


१८ अभिनयससम्राज्ञी 


तर केला नाहीना, कीं ज्यांमधून ती किंचित्‌ वांकली असतां तिच्या अना- 
वृत उरोजांचं अर्धवट लाडिक दीन प्रेक्षकांना स्पष्टपण व्हावं ! पाण्यांतून 
बाहेर आल्याबर तर त्या तंग व अत्यंत विरविरीत ओल्या आच्छादनांतून 
दिसणाऱ्या तिच्या उठावदार वक्षभागाकडे दृष्टी जातांच आत्यंतिक 
दारमेनं तिने डोळे मिट्टून घेतले ! पण तिनं डोळे मिटून घेतले, 
तरी थिएटरमधील शेॅकर्डो लोलुप धुंद डोळे त्याच इद्याचं 
आधाशपिणानं पान करीत होते ! तों मधांचा प्रेक्षक मिटक्या मारून 
ते हृद्य पहात हाता व जवळच्या आपल्या सोबत्याला डिवचून 
म्हणत होता “' पाहिलेस ना ! काय मस्त दिसते ! आहे कीं नाहीं अस्मा- 
नची परी ! कालेजा फाटून जातोय नुसता ! एवढ्या एका रसॉनसाठांच 
लोकं घांब घेतात नुसती ! ?” जयश्रींनं कानांत बोटं घातली | समोरचं ते 
पडद्यावरचे ₹दय, आपली ती अरधेनग्न मूर्ति तिळा पहावेना ! त्या हृलक्या 
दर्जाच्या लोकांचे ते कामुक उद्गार तिला सहन होईनात ! हजारों लाखो 
लोकांच्या विषयवासना जागत करण्यापर्लाकडे दुसर काय साधतं या 
दुश्यांनी ! विरविरीत वस्त्राचं ते आवरण फाडून त्या हजारों धद कामुक 
नजरा आपल्या नग्न देहावर खिळल्या आहेत असा तिला भास होऊं 
लागला | स्वतःची तिला शिसारी आली. स्ट्रडेिओंत असतांना, पडद्यावर 
आपण इतक्या उत्तान, मादक अवस्थेंत दिसत असू असं तिला वाटलं 
नव्हतं ! आतां मात्र पडद्यावर दिसणारी स्वतःची ती अधनग्न मूर्ति-- 
तिला किळस आली ! 


पडद्यावर दुव्यं सरकत होती. पण जयश्रीला आतां कांहीं दिसत नव्हत 
कीं ऐकूंही येत नव्हतं ! तिनं डोळे मिटून घेतले होते. तरी ते मधांचंच 
दृश्य तिच्या अंतःचक्षूसमोर दिसत होतं | पैश्याच्या नादानं आपण शेवटी 
ह्या हीन अवस्थेला येऊन पोंचर्ला ना ! पैशासाठी शरीरविक्रय करणारी 
वेश्या व पैशासाठी शरिराचं असं उत्तान हिडीस प्रददीन करणारी नटी 


अभिनयसस्राज्ञी १९ 


आरळ डकना हक आटी दाला जमी प आटी चक क जी आश काककी कीक कक, होऊ फक आयी हा ही ही “लीक्लोनो- टी८ णा टी“ >>>“ “>>>. 


यांत काय फरक राहिला ! ही काय कला म्हणायची ? कला |! कुठं आहे 
कला ? दोरीराच्या अवयवांचं असं उघडं प्रदान मांडणे हीच कला होती 
कां १ आणि प्रेक्षक तरी सिनेमा पहायला येतात, ते अभिनय पहायला, कीं 
स्वतःच्या क्षुद्र विषयवासनांचा घंद प्रश्षाभकारी उन्माद अनुभवायला ! 

आणि हया स्वतःच्या सोंदर्यांचे असं उघडं प्रदशन मांडण्यासाठीच काँ 
तिला “अभिनयसप्राशी' ह्या किताब मिळाला होता ! 

छेः ! यापुढं हे सगळं बंद झालं पाहिजे, यापुढं असल्या हीन दजाच्या 
चित्रपटांत काम करायचं नाहीं ! झाला एवढा अधःपात पुरे झाला ! 

६ काम करायचं नाहीं ! मग काय करायचं !'' तिच्या आईचे उद्गार तिला 
आठवले. 'हे वेभव सोडून मिकारीण हो ! '' होय ! चित्रपटांत काम 
करायचं नसेल तर हे वैभव सोडलंच पाहिजे | काय मिळालं ह्या वैभवाने १ 
आनेलकुमारांच्या बरोबर नाटकांत काम करीत होतो, तेव्हां जे अंतःकर- 
णाचं समाधान मिळत होतं, त्याच्या शतांशानं तरी समाधान ह्या चित्रप- 
टांत काम करण्यानं मिळालें आहे कां ! सारखी हुरहूर, कांहींतरी गमावलं 
असल्याची जाणीव ! शेटजी व कृष्णमूर्ती सारख्या माणसांची पापी लगट 
सहून करून घेण्याइतका मानसिक अधःपात ! छे ! हॅ वैभव दूर केलंच 
पाहिजे ! 

पण कसं करायचं ! हा काय आपला एकटीचा प्रश्न आहे ? अजून 
दोटजींचं आपण देणे लागता आहो | पेसा पुष्कळ मिळतो खरा पण 
तसाच खर्चेद्दी होऊन जातो | भावंडं कॉलेजांतून शिकतांदेत ! पाठचा भाऊ 
तर अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेला आहे ! आपण चित्रपटांत काम 
केळं नाहीं तर पूर्वीसारखी गरिबरींत हदी सर्व रहातील का ! आई आजारीच 
असते हल्लीं ! आपण हाल काढूं पण ह्या सर्वांचे काय होणार ! 

तिला अनिलकुमारांची आठवण झाली |! तिचे कॉँट्रट झाल्यानंतर 
ते तिला भेटले होते, त्यानंतर पुन्हां कधीद्दी ते तिला भेटले नव्हते ! आपला 


२० अभिनयसप्राज्ञी 


५५ /% ८७ शच ४ & हाच /£ ५» ४ ४7 ४१ /१* /"% /% »/% /७ £0 /५ / »/ &£१£ *£ ४१% /१ % '* /९ /७ /७ /%७ /%७ /७ 79 /२ /७./% ७ ४ कॅरी 


हा चित्रपट त्यांनीं नक्कीच पाहिला असेल ! अररे ! आपला हा अधःपात 
पाहून काय मत झालं असेल त्यांचं आपल्याब्रद्दल १ ते पुन्हां कधीही तिला 
भेटले नव्हते, यांतच सर्वे आले ! 


एकदां रोटजीबरोबर ती मोटारीतून कुठेतरी जात असतांना तिने त्याना 
पाहिलं होतं व हांक मारली होती ! पण हांक न ऐकतांच ते दूर निघून 
गेले होते ! 

हाय ! ते दूर गेले हाते |! आणि जयश्री एकटीच ह्या जाळ्यांत रंतून 
पडली होती ! तिला दुसरा मार्गे नव्हता ! कुणाच्या, कशाच्या आघारावर 
ब्राहिर पडणार होती ती ! सगळीकडून जखडून गेली होती ती! आतां 
मरेपर्यंत असंच, ह्या गुलामागेरींत पिचत रह्वाण्याशिवाय कोणता मार्ग 
मोकळा होता तिला ! 


एक सुस्कारा टाकून ती उठली ! डोळ्यांत आलेले अश्र पुसून तिनं 
आरक्षांत पाहिलं ब शेटजीबरोबर पार्टीला जाण्यासाठी म्हणून केषभूषा कर- 
ण्य़ास सुरुवात केली ! 


खाळून तिच्या आईची हाक ऐकं आली, ' जया, आटपलं कीं नाही 
अजून ! ? 


सारजा 


& ० 10 काय सांगू तुम्हांला ? मोठ्या शिताफीने आज पकडली 
हिल ! बरेच दिवसांपासून संशय होता मला, पण बोलणार कसं ? 
द्दी सारजा म्हणजे मोठी अन्रूदार, खानदानी, नेकीची बाई ! पुराव्यावांचून 
हिचं नांव घेणार कसं ! आज बाकी अगदीं डोळ्यांत तेळ घाडून बसलो होतों 
हिच्या पाळतीवर ! कोठींतून लपत छपत बाहेर आली मात्र, तोंच पकडली 
ताबडतोब ! मुद्देमाल च सांपडला जवळ, मग काय करते १ बाकी माझ्या 
विनवण्या खूप केल्यान्‌ मात्र * सोडून द्या, घरी पोर फार आजारी आहे, 
पोरासाठीं नेत होते, एकदा सोडून द्या. बाईसाहेबांपर्यंत नेऊं नका म्हणून !! 
पण सोडून देणार कशी १? आपल्या मालकांश्ी बेदवमान व्हायचं ! त्यांचं 
मीठ खालळेय आपण ! खाल्या अन्नाला जागायला नको का ? काय 
जगोबा १? ' शिरवाडीच्या जमीनदारांच्या वाड्यांतला सदोबा पाणकक्‍्या 
सर्भावतालीं जमलेल्या घोळक्याकडे मोठ्या दिमाखाने पहात म्हणाला. 


जगोबांनीं तोंडांतठी विड्याची पिचकारी दूर उडवली ब मालकाच्या 
खिश्यांतल्या खास सिगारेटचा धूर सोडीत *“" व्हय्‌ व्हय्‌ ! असंच नव्ह 
का |! खाल्या मिठाला जागायाठा व्होव ! अनदात्या्शी बेइमान व्हऊन 
कुठल्या नरकांत जावं बाबा १ ' असे मोठ्या गंभीरपणे उद्गार काढले, 


वाड्यांतील सर्व नोकरांच्या दृष्टींचा व उपहासाचा विषय झालेली ती 
दुदैवी बाई--सारजा-त्याच वाड्यांत नोकर होती ! खालीं मान घाढून 


५२ सारजा 


र्ड 


४» ८.» ८»८/” //.>3 .,”%/ %. .” ७. २४ के. ७.४ ९७.४७. ७,४%./४ २.५ २७/१%*/ //४ « /४४..४ %/४ १७७४ ४७४ य. क क. य. अ. 


एका कोपऱ्यांत बसली होती बिचारी ! चोरीचा मुहेमाल म्हणजे सुमारें 
शेरभर तांदूळ तिच्या पुढ्यांतच एका लह्वानह्या फडक्यांत बांधलेले पडले 
होते. ज्या सदोबाला आजवर नजरेच्या जरब्रेंत दोन हात दूर ठेवले, 
त्याच्याच विनवण्या करणें तिच्या अगदी जिवावर आले होते. पण ही 
लाचारी केवळ पोटच्या पोरासाठीं करणें तिला भाग पडलं, लाडक्या 
राजाची आठवण होताच सारजेचं हृदय भरून आले ! आपल्या फाटक्या 
गोधडीवर पडून तिच्या वाटेकड पोर दृष्टि लावून तळमळत पडलं असेल ! 
आई रोज दुपारी येते त्याप्रमाणें आज न आलेली पाहून मुकाट्यानं आसवं 
ढाळिळी असतील त्यानं | आतां दोन तीन महिन्यांपासून त्याची 
प्रकृति मुळीच बरी नव्हती | एरव्ही राजा म्हणजे किती गोड व अवखळ 
पोर | त्याच्या तोंडाकडं पाहूनच धनाजीच्या मृत्यूचं दु:ख सारजा थोडं- 
तरी विसरू शकत होती, पूर्वीच्या आपल्या सुखी संसाराची आठवण 
येऊन सारजेला दुःखाचा हुंदका आला |! धनाजी, सारजा व चिमुकला 
राजा ! गरिब्रींत सुद्धा किती समाधानी व आनंदी कुटुंब होतं ! सत्तेचं 
घरकूल व जमिनीचा तुकडा ! अगदीं दृष्ट लागण्यासारखा संसार होता 
सारजेचा ! आणि खरंच कुणा पापी चांडाळाची दृष्ट लागली कोण जाणे ! 
आगि नाहीतरी सारजा होतीच तशी दृष्ट लागण्यासारखी । साऱ्या गांबांतच 
काय पण आजूबाजूच्या गांवांत तिच्या रूपाला तोड नव्हती; आगि पुन्हां 
कुणाकडं डोळा वर करून बघायची नाहीं कधीं |! तिच्या रूपाची व 
जवानीची धुंदी गांबगुंडांच्या डोळ्यांवर येई पण दुरून जिभल्या 
वाटण्यापालिकडं कुणाची डाळ शिजणें शक्‍य नव्हतें. धनाजीची जरब 
तशीच जबरदस्त होती. बिशाद काय कुणी त्याची अगर-त्याच्या सारजेची 
खोडी काढेल ? संध्याकाळी सोन्याहिऱ्याला घेऊन धनाजी शेतावरून 
परत येई तेव्हां राजाला कडेवर घेऊन सारजा उभी असे ! धनाजीच्या 
त्या रुबाबदार मूर्तीकडे पाहून सारजेला आभाळ ठेंगणं होई ! 


सारजा २३ 


२.४२ ३७/८४/७४७७ ७७.४४. ७.५७ ./ ७.४७ *१.५/४०१ ७४४४ / २.४ %./” क २..»४._/ २ /'७.//०.. ० २.४ २.” .» २.७ ७ ७.७ क १ %_४"४७ .€% / %./७ 


पण हं सुख लवकरच संपलं | केवळ ४ दिवस ताप येऊन धनाजीसारखा 
चौघांना भारी असलेला गडी, एकाएकी आटोंपेल हे कुणाला सांगूनसुद्धा 
खरं वाटलं नसतं ! दैवाचा हा निष्ठ आघात इतका अकल्पित होता कीं 
त्याची सत्यता पटायलासद्धा सारजला बराच वेळ लागला ! धनाजी काय- 
मचा गेला, संध्याकाळीं आपल्या आवडत्या भब्रेलजोडीला घेऊन, गाणे 
गातगात, धनाजी पुन्हां पूर्वीप्रमाणे कधींच येणार नाही हें खरंच वाटेना 
तिला ! सारजेला आकारा फाटल्याप्रमारणें झाले. 


पण काळ काय कुणाकरतां थांबून रद्दाता १ सगळं दुःख आवरून पुढच 
विचार करणं सारजेला भागच होतं! आजवर धनाजीच्या जिवावर जगाची 
पर्वा केली नव्हती तिने पण त्याच जगाच्या दयेवर जगावं लागू लागलं 
तिला ! शेत खंडाने देऊन व परसांतला भाजीपाला विकून कसंबसं वर्ष 
ढकललं तिने ! पण पुढच्या वर्षी धनाजी असतांना येई, त्याच्या अर्ध्यांनंच 
जमतेम पीक आलं ! खंडकऱ्याने खंड वेळेवर दिला नाहीं. अर्थातच 
ज्या जमीनदाराच्या वाड्याची ती पायरी कधीं चढली नव्हती, त्याच्याकडे 
जाऊन, दुपटीच्या भाताची कबुली देऊन, खायला भात आणाव लागलं 
तिला ! 

पुढच्या वर्षी सगळ्याची फेड करून टाकू अशी आशा होती तिला 
पण त्यावर्षी निसगीचा कोप झाला व पाऊस वेळेवर न पडल्यामुळें सगळं 
पीक करपून गेलं | त्यावर्षींही कर्जाची फेड झाली नाही. आणि दरवषी 
कांद्दीनाकांदह्दी कारण होऊन कर्जाच्या डोंगरांत सारजा बुड्टडून गेली ! जमीन- 
दाराने तगादा सुरू केला व अखेर त्या त्रासांतून सटण्यासाठी जमीन 
कायमची त्याच्या हवाली करणं हाच एक उपाय तिला दिसला ! वास्तविक 
पहातां जमीनदाराळा तिच्या जमिनीची एवढी तहान लागली नव्हती ! 
त्याचा डोळा कशावर आहे हें ती जाणून होती ! तिला जास्तीजास्ती 
अगतिक करावं व शेवर्टी तिनं आपल्याला शरण यावं द्दीच त्याची इच्छा 


२४ सारजा 


/%./ -“*./ -“€ २.२ / ९. /£ -» *€% ७४0७ ४ ७ 


होती व शेवटीं त्याच्या इच्छेप्रमाणच घडलं | दिवसेंदिवस किरकोळ भाजी 
पाला विकून निवाह हाईनासा झाल्यामुळें तिला जमीनदाराच्या वाड्यावर 
नोकरी धरणं भाग पडलं ! आणि तेव्हांपासूनच तिच्या खऱ्या दुर्दैवाला 
सरुवात झाली |! सारा दिवस मरमर मरावे आणि सवोची कुजकट बोलणी 
ऐकून घ्यावी ! त्यांतून तिचे असामान्य रूपही तिचं वेरी झालं होतं ! 
आचारीपाणक्यापासून तो खुद्द मालकाच्या स्वारीपयेत सर्वजण तिच्या शीलाचा 
बळी घेण्यासाठी टपून बसले होते, ह्या जाचाला ती फार कंटाळली होती. 
आणि इतकंह्रि करून पंधरा रुपयांवर दोघांचं पोट भरतांना कोण मारामार 
पडे ! आपल्या लाड्क्याच्या तोंडाकडं पाहून हें सर्व हाळ ती सहून 
करीत होती. पण कठोर देवाला तिचं एवढेही सुख पहावलं नाहीं. 
तिचा राजा आजारी पडला, गुलाबाच्या ताज्या फुलाप्रमाणं असणारा 
राजा, दिवसेदिवस बकुळीच्या फुलाप्रमाणं कोमेजू लागला, गांबांतल्या 
वैद्ययुवांना दाखवून औपध सुरू केलं तिनं, पण गुण येईना ! हे पाहून 
मात्र अगदीं धीर खचला तिचा, आतां त्याला नुसती कण्हेरी, पेज द्यायला 
सांगितलं होतं त्यांनीं ! लढाई संपून २-२ वर्षे झाली तरी रेशनिंग होतेच ! 
उलट अधिकाधिक धान्य कमीच होत चाललं होत ! आठवड्याला माणशी 
पावशेर तांदूळ मिळत ! त्यांत पेज कण्हेरी कशी करणार ती ! शाजाऱ्यानांच 
पुरत नव्हतं तर ते उसनं तरी कुठून देणार ! स्वतः उपास काढून ती 
राजाला कण्हेरी करून देई! पण असं कुठपर्यंत चालणार ! वाड्यांतली 
कोठी तांदळांनीं भरली होती पण त्याचा काय उपयोग ! देवटी लाचारी 
पतकरून तिने बाईसहिबांकडे थोड्या तांदळाची मागणी केली ! पण त्या 
दगडी दिलाच्या मूख श्रांमंत ज्रीन ती झिडकारून लाविली ! वाड्यांतलं 
कोठार तांदळानं भरलेलं असतांना, पावशेर तांदळांत, आठवडा, माणसं 
कसा काढतात हें कुठून तिला कळणार | त्यांतून स्वरूपवान सारजेवर 
त्यांचा मनांतून रागच होता ! त्यांनी तांदूळ दिले तर नाहीतच पण वर 


सारजा २५ 


एक व्याख्यान ऐकवलं तिला ! सारजा निराश झाली ! भुकेमुळं मळूल 
झालेल्या राजाकडे पाहून भडभडून येई तिला ! आज ४ दिवस तांदूळ 
मुळींच घरांत नव्हते ! “आई भूक लागलीं, कांहींतरी खायला देग' हे 
राजाचे करुण शब्द ऐकून तिची आंतडी तुहू लागली, दोवटीं आज तांदूळ 
आणायचेच---सरळ मार्गीन मिळाळे नाहीत तर चोरी करून आणायचे-- 
असा निश्चय करून ती घरून निघाली. व त्या निश्चयाचं पर्यवसान काय 
झालं तें वर सांगितलेच ! 

बाईसाहेबांची वामकुक्षी पुरी होईपर्यंत सदोबाच्या पहाऱ्यांत सारजेला 
बसावं लागलं व त्या हलकट माणसाचची गालेच्छ कुचकट ब्रोलणी ऐकून 
घ्यावी लागली ! तिचा देहू वाड्यांत होता पण मन केव्हांच राजाकडं 
जाऊन पोौःचळं होतं ! आजतरी आई तांदूळ आणून पोटभर पेज करून 
देईल या आशेवर पोर आपल्या वाटेकड दोन्ही डोळे लावून पडलं 
असेल! 

पण आतां पुढे होणार तरी काय ! आपल्या नशिबांत काय वाढून 
ठेवलय आतां 

विचार करतां करतां सारजेचं मन थकून गेल ! अखेर बाईसाहेबांचा 
चद्दा झाल्यावर तिचा खटला दोघा मालकांच्या पुढं उभा राहिला ! 

“कायग सारजे, मी आजवर तुला मोठी प्रामाणिक, अत्रूदार, खान- 
दानीचची बाई समजत होते ! आणि आज तूं तांदूळ चोरलेस म्हणे ! आतां 
ह्या सदोबानं आज पकडलं म्हणून बरं ! आजपर्यंत किती चोऱ्या केल्या 
असशील कुणास ठाऊक !”' बाईसाहेब तिरस्काराने म्हणाल्या, 

६ नाहीहो ! बाईवाहेब, मी आजपयेत सुतळीच्या तोड्यालासुद्धां बोट 
लावलं नाहीं ! आतां मात्र पोराच्यासाठी ह्या गुन्हा घडला ! मोठे आह़ांत, 
दयावंत आहांत मालक तुम्ही ! एकवार माफ करा ! माझं पोर घरीं भाजारी, 
उपाशी आहे हो ! सोडून द्या मला ! '' सारजा काकुळतीने म्हणाली, 


२६ सारजा 


हू ! एकवार तुला सोडून दिलं म्हणजे दुसऱ्या नोकरांनां चांगलंच 
फावेल कीं ! ते कांहीं नाही | अपराध्याला शिक्षा ही झाली पाहिजेच ! तुम्हां 
लोकांनां चांगळी जरब बसेळ अश्लीच शिक्षा केली पाहिजे '!--- बाइसाहेबर 
पुढं कांहीं बोलणार तोच साखरवाडीच्या जमीनदारीणबाई बसायला 
आल्याची वर्दी आली. शिरवाडीच्या मानाने साखरवाडीच्या जमीनदारांची 
खूप इस्टेट होती बव त्यांच्या एकुलत्या एक विजयेश्ी आपल्या बाळासाहेबाचं 
लयन जमावं अशी बाईसाहेबाची मनिषा हाती. अथात्‌ त्या ताबडतोब निघून 
गेल्या, जातांना “असली चोरटी बाइ माझ्या घरांत नको'' असा हुकूम 
देऊन गेल्या. आतों जमीनदाराच्या तावडीत सारजा एकटी सांपडली. 
मनांतला पुष्कळ दिवतांचा हेतु आतां साध्य होणार अशा अपेक्षेने त्यांनां 
आनंदाच्या उकळ्या फुटूं लागल्या ! तावडीत सांपडलेल्या भक्ष्याकडे वाघाने 
क्रूर दृष्टीनें पहावें तसे ते सारजेकडे भुकेलेल्या अतृप्त दृष्टीनें पाहूं लागले. 
त्यांची ती दृष्टी पाहून सारजेच्या काळजार्चे पाणी पाणी झालें, 


हू | मग काय सारजे ? काय तुझा विचार आहे !”' जमीनदार घोगऱ्या, 
जड स्वरांत म्हणाले. दारूची धुंदी चांगलीच चढली होती स्वार्राला ! 
सगळ्या नोकरांना तेथून हांकळून देऊन, एकटी सारजा आतां आपल्या 
तडाक्यांत सांपडलीच अशा आनंदानें ते अगदीं खूब झाले होते, सारजा 
मांत्र आंतून अगदीं मिऊन गेली होती. शेवटचा एक निकराचा प्रयत्न 
करून पद्दाण्याचं ठरविले तिन | 

५माळक, आपण मोठी माणस | गरिबाकडं जरा दयेनं पह्या |! माझं पोर 
खरोखरच घरीं आजारी आहि | भुकेने तडफडतं आहि ! वाटलं तर कुणा- 
लांतरी पाठवून खात्री करून घ्या | त्याच्यासाठी मी हँ पाप केलं ! त्याच्या 
कडे पाहून सोडून द्या मला | माझ्याशिवाय त्याला कुणी नाहींहम !? 

६हा; हा हाः? जमीनदार विकटपणें हसले |! ““सारजे काय त्या मरतुकड्या 
पोरासाठी एवढा जीव टाकतेस ? माझं ऐकलेस तर एक सोडून 


सारजा २७ 


“८7/97/7222: 02/2/:/:/2///”»! 2272222“ >>“ “>टा2टीटी2 री क्ली“ “ली“्ळीटीारा“ र्/ीं»्*ग»2// र?” /2/४”०-///५१०८०००० 


“ह| मालक ! पुढें बोलूं नका |! आईच्या मायेची कल्पना नाहीं आपल्याला | 
माझ्या पोरांुढं दुनियेची किंमत नाही मला ! आणि गरीबांना पण अन्रू 
असते, अत्रू घालवून--! 

“अग कसली अन्रू घेऊन बसली आहेस ! सोग्यामोत्यांनीं मढवून काढीन 
तुला ! ह्या मूठमर तादळाची काय कथा ! पोती रिचिवीन तुझ्या घरांत | 
नीट समजून घे ! जर माझ्या मर्जीप्रमाणे वागळीस तर बरं आहे ! नाहीतर 
पोलिसच्या हवाली करीन तुला ,?' जमीनदार निश्चयाने म्हणाले, 

सारजेच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. हा दुष्ट बोलल्याप्रमाणे करण्यास 
चुकणार नाही ही खात्री होती तिला |! पण---पण ती-- काय करणार 
हाती ! पोराचा बळी की शीलार्‍चा बळी ? सारजेला कांहीं सुचेना ! पोरा- 
साठीं चोरीचा गुन्हा केला तो केला. आतां निदान अनत्रू विकण्याचा तरी 
नको ! धनाजीच्या मागे इतके दिवस जी अत्रू ब जें शील प्राणापर्लीकडं 
संभाळलं, त्याचा असा उघड्या डोळ्यानी बळी देण्याचं तिच्या जिवावर 
आलं. तिने जमीनदाराच्या खूप विनवण्या केल्या, पण तो नराधम आपल्या 
निश्चयापासून काडीमात्र पराव्रत्त झाला नाही, दोवटीं आपला पापी हेतु 
साव्य हात नाहीं, हॅ पाहून तिचा सूड घेण्याचे बुद्धीने, त्याने खरोखरच फोज- 
दाराला बोलावून त्याच्या स्वाधीन केळे तिला, 

आठ दिवस कोठडींत राहिल्यावर तिचा खटला उभा राहिला, चोरीचा 
मुद्देमाल पाहून सारजा थक्कच झाली ! पंचनाम्यांत शेरभर तादूळ नव्हते, 
तर बाईसाहेबांचे २-३ किरकाळ दागिने, जरीची लुगडी हा माळ नमूद 
केलेला हाता. साक्षीदार तयारच होते. 

सारेजला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. 
आणि तिचा लाडका राजा ! 

पैजणांचा मंजुळ छुम्‌ छुम्‌ आवाज, सारंगी तबल्याची साथ, जमलेल्या 
समुदायांतून 'वह्दावा'चा गजर व सिगारेटचा धूर यांनीं वातावरण भरून गेले 


र्ट सारजा 


होते, चद्रावळ कलावंतीण ठृत्य करीत होती ! चंद्राच्या कंठाची माधुरी 
जितकी अप्रतिम होती तितकीच निसर्गदत्त सौंदर्याची देणगीही तिला 
लाभली होती. 


तिच्या गायनापेक्षा तिच्या दृत्यावरच प्रेक्षक जास्ती खष होते ! कारण 
नृत्याच्या निमित्ताने होणाऱ्या तिच्या विविध अंगप्रत्यंगांचें दर्शन त्यांना 
जास्ती लोभनीय वाटे ! वंद्राची नाजुक परंतु सोष्टवपूर्ण देहयष्टि, चंद्राचा 
लाडिका नखरा, तिचे वेड लावून सोडणारे हाव भाव ! शिरवाडीकर 
नुसते बेहोष होऊन गेले होते. 


मध्यभागीं प्रमुख बैठकीवर लोडाला टेकून--टेकून म्हणण्यापेक्षा निजून 
-र्‍शिरबाडीचे जमीनदार, चंद्राकडे लोलप नजरेनें पहात द्दोते. श्रोत्यां- 
पैकी शुद्धीवर---फारच थोडेजण होते. अशाच एकदोघा जणा*ची कुजबूज 
एका कोपऱ्यांत चालली होती. 


काय रे पांखरू आलं तरी कुठून ! नुसती ब्रिजली आहे. नाचते 
आहे तर दिल अगर्दी फाटून जातोय ! सहाच महिने झाले इथं येऊन पण 
गांवाला नुसत वेड लावलय, 


£ अरे, गांबाला लागून फायदा काय १ बडं प्रस्थ आहे तें! हा आपला 
जमीनदार पद्दा ! रोज येता इथं ! दागिने काय, कपडे काय जे म्हणेल ते 
ओततोय पायाशी ! सगळ्या इस्टेटांच वाटोळं होण्याची वेळ आलीय, पण 
इष्कापुढं कशाची पवा नाहीं स्वारीला ! कुठून आली आहे कुणास ठाऊक! 
बाकी आली तेव्हां अगदी एकटी अन्‌ एका वस्त्रानिशी आली होती, पण 
आतां रुबाब पहाल तर राणीचा ! ” 


चंद्रावळीचा नाच संपला, पायांतळे धुगुर सोडून ती बेठकीवर बसली, 
नेहमीप्रमाणे श्रम परिहाराकरतां मद्याचे चपक आले ! नंतर चंद्राच्या ह्यातची 
नाजुक, मसालेदार पट्टी घेऊन एकेकजण उठून जाऊं लागला. साजिंदेही 


सारजा २९ 
आपापल्या वाद्यांची आवराआ[वर करून निघून गेले. जमीनदारांची स्वारी 
तेवढी एकटी राहिली ! चंद्राने मार्डीरचें दार बद केलें. 

चंद्रा, चंदर तूं माझ्या जिवाचा कलिजा आहेस! आतां किती 
दिवस माझा अंत पहाणार आहेस ? तूं माझी झाल्याशेवाय माझ्या संप- 
त्तीला शोभा नाहीं. तू. माझी राणी आहेस, महाराणी आहेस, मी तुझा 
बेंदा गुलाम आहे. *' 

जमीनदार, पोटांत गेलेल्या अमृताचा परिणाम होऊन, बरळू लागले, 
अर्धवट धडपडत उठून त्यांनीं चंद्राला जवळ ओढली. 

ड्यू, राणी, राणी म्हणून तोंडानं म्हणायचं ! राणी शोभलीतर 
पाहिजे ना ह्या माझ्या राजाजवळ १ ”' लडिवाळपणें त्याच्या गळ्प्रांत हात 
घालीत चंद्रा म्हणाली, 

मग ह्या माझ्या राणीला पाहिजे तरी काय ! बोल, तूं मागशील तें 
देता ह 9) 

6 पुष्कळ ऐकल्या तुमच्या फुकाच्या गप्पा आजपर्यंत !'' चंद्रा त्याचा 
हात झिडकारून म्हणाली, ““ आज पुन्हां एकदा ब्रजावून सांगते, उद्यां 
रात्री जर तुमच्या त्रायकोच्या गळ्यांतलं ते हिऱ्याचं मंगळसूत्र, माझ्या 
गळ्यांत दिसल नाही तर पुन्हा इथं यायची तसदी आपण घेऊं नका. 

चंद्रा झणकाऱ्यारने आंत निघून गेली. 

जमीनदार आज मोठ्या पेन्चांत पडेल होते. रात्र जसजसी अधिक होऊं 
लागली, तसतसे ते अधिकच ब्रेचेन होऊ लागले, चेद्राकडं जाण्यासाठी 
त्यांचे मन अधीर होऊ लागल पण---आजतरी तिची मागणी पुरी केल्या- 
शिवाय तिच्याकडं जाणं शक्‍य नव्हत ! आणि ती मागणी पुरी न होण्याला 
एकटी आपली बायकोच कारण ! जमीनदारांना तिचा विलक्षण संताप 
आला ! ज्या हिऱ्याच्या मंगळतूत्रासाठी चंद्राने इतका हृद्ट घरला होता तो 
त्यांच्या घराण्यांत पिढ्यानपिढ्यांचा जुना, अमूल्य अलंकार होता. ते 


मंगळसूत्र फार झुभदायक समजलं गेल होतं ! थोरल्या सुनेकडे वंशपरंपरा ते 
रहायचं ! आगि अलंकार होताही मोठा सुंदर ! टपोऱ्या पाणीदार मोत्याच्या 
दुपदरांमर्ध्ये डाळिंबाच्या रंगाची माणकं मधूनमधून बसविली असून मध्य- 
भागीं अतिशय पाणिदार हिऱ्याचे पदक होतं ! त्याला सर्भोवती हिरवेगार 
पाचू जडवले होते ! जमीनदारीण बाईंना फार आभिमान होता हृया 
अलंकाराचा |! प्राणांतीहदी ते दृर करावयास त्या तयार होणे शक्‍य नव्हते ! 
इकडे चंद्रानेही त्याच दागिम्याकरतां हट्ट घरला होता, तुला दुसरं तसंच 
मंगळतूत्र नव देतो असं सांगितलें तरी तिची समजूत पटेना ! तिला तोच 
पिढीजाद अलंकार हृवा होता ! 

कुणाचा हृट्ट परवावा तें त्यांना समजेना ! शेवटी चेद्राबळीचंच पारडे 
जड ठरलं | जमीनदारांनी बायकाकडून तें मंगळसूत्र घेऊन लाडक्या चेद्राचा 
हट्ट पुरविण्याचे ठरविले, 

रात्री ११ चे सुमारास जमीनदार नेहमीप्रमाणे बाहेर जाण्याचें सोडून 
अंतर्गह्वांत आलेले पाहून बाईसाहेब चाकित झाल्या ! आणि त्यांची मागणी 
ऐकूनतर त्या फार संतत्त झाल्या ! यःकाश्वेत एका वेश्येच्या नादानं, आपल्या 
पातिराजानीं,खुद्द आपल्या गळ्यांतील पिढीजात वशपरंपरा वापरला बहुमोल 
अलंकार मागावा, हया घटनेनं त्यांच्या अगाचा तिळपापड झाला ! आज- 
पर्यंत घरांतील बहुतेक अलंकारांची वासलात लागलेली होती ! चंद्रांच्या 
पायी त्यांच्या जामिनी गह्वाण पडलेल्या होत्या, अवाढव्य खर्च चालवण्या- 
पार्यी काढलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस जास्तीच उच होत होता ! पण 
आज मात्र कळस झाला |! 


६ मी तें मंगळसूत्र देणार नाहीं | बाळासाहेत्राच्या बायकोच्या गळ्यांत 
माझ्या हाताने बांधणार आहि मी ते ! त्या सटबीच्या पायी सगळ्याची 
धूळदाण झाली तरी अजून तिचा नाद सुटत नाहीं !” त्या रागाने फणकारल्या | 

6 देणार नाहींस म्हणजे ? दिल्च पाहिजे तुला ! मी मालक आहि माझ्या 


सारजा ह 


/* //.//१% 77. 4“. 7९...” /% /”% 7) /0७ “70% १७ “७ व “0१ “”* “९ ६ १७ “२ २. २ 7२ /”"१७..५०..५”१७.../ १७ &७ €०४ ./ ९. ५” ४४ %.&० ९७ ४२ ../०” ७.७४ “09. जे &” के, “क 


इस्टेटीचा ! मळा वटिल त्याला देईन मी ! मुकाऱ्यानें काढून दे.'"' जमीन- 
दारांच्या अंगांत मूर्तिमंत हुकूमशाही संचारली हे!ती. 

पतिपत्नींची बरीच बोलाचाली झाली ! शोवटी जमीनदारानीं करूं नये 
ती गोष्ट केली, नोकरचाकरांच्या देखत त्यांनी पत्नीवर हात टाकला व 
मंगळसूत्र हिसकावून घेऊन तडक चद्राचें घर गांठलें ! पण सवांच्या देखत 
झालेला हया अपमान त्या अभिमानी बाइला सहन झाला नाहीं. भर मध्य- 
रात्री मागील दारच्या विहीरींत त्यानीं उडी घेतली ! पण जमीनदारांना 
त्याचें काय होय ? त्यांची प्यारी चद्रावळ त्या रात्री त्यांच्यावर बेहद्द खूष 
झाली होती ! चंद्राच्या कोमल देहाच्या लुसठ॒शीत मिठींत, तिच्या अधरा- 
मृताचे पान करीत, ते जगू स्वगलोकीं विहार करीत होते. 


“आतां का बुवा रुसवा असा ! स्व मनासारखे आहे ना? मग आज कां 
ह्या मुखचंद्राला असं ग्रहण लागलं आहि £१'' जमीनदारांनी मोठ्या लाडिकपणें 
प्रश्न केला, बायके!च्या मृत्यूनंतर घर त्यांनीं जवळ जवळ वर्जच केलें होते. 
चंद्राच्या पायांत ते पुरत सांपडले होते. एकुलत्या एक मुलाची काय हाल- 
हवाल आहे, इस्टेटीची व्यवस्था कशी आहे, हें ते कांहींच पहात नसत ! 
चंद्राची काहीं इच्छा पुरवायची असली की दिवाणजींना अमुक रक्कम 
आणून द्या असा ते हुकूम सोडीत. कुठल्याही भारी व्याजाने कुठूनद्दी रकम 
उभी राहिली कीं मग ते पुढचा विचार करीत नसत ! चद्राह्ी नित्य नव्या 
नव्या वस्तूची मागणी करी, 

निरनिराळ्या शुंगारिक साधनार्नी नटाविलेल्या शयनग्ह्यांत एका कोचावर 
चेद्रा रेठून बसली होती. सुंदर फिक्या हिरव्या रंगाच्या तलम जॉर्जेटचें 
पातळ व मोठ्या उघड्या गळ्याची एक झिरझिरीत चोळी या पाषाखांत तिचे 
लावण्य खुलून दिसत होते. चोळींतून तिचे उन्मादक योवन पदह्ाणाऱ्याला 
भूल पाडण्यासारखे स्पष्ट उठून दिसत होते. गळ्यांत त्या मंगळतूत्राशिवाय 
दुसरा अलंकार नव्हता. समोर जमीनदार दुसऱ्या एका कोचावर लोळत ह्रेते, 


२२ सारजा 


/९९५-.. १%७४७% “के &00% के >. कक ह ,/>* .»%. /९% ८९७. .४/१ /*५_/”% ७.७७ 0७ ७ /7% *७ 0 09 “0. “७ 009 “हक “ह. “४७ “न शान 7 »/% “1 “7 “७...” 4०७ ४४१७ ७. &र 4७.५७ ०. ४”%.० ४ 8) 


६६ ह | मुखचद्राला ग्रहण लागलं का तो कायमचा मावळला हृत्राची 
काळजी आहि कुणाला इथं ! किती दिवसांपासून म्हणते आहे काँ माझा 
सत्यनारायणार्‍चा ब ब्राम्हण भोजनाचा नवस फेडायचा आहि म्हणून ! नवस 
फेडायचा राहिला तर देवाचा कोप होईल ! पण झाला तर झाला ! चंद्रा 
मेळी काय कीं जगली काय, पवा आहि कोणाला !'' चंद्रा डोळ्याला पदर 
लावून स्फुंदू लागली, 

“६ छे | छे! तू तर माझा प्राण आहेस ! तुझ्यावांचून दुसरं कोण आहि 
मला प्रेमाचं जगांत ! तुझ्यासाठी मी काय करणार नाहीं ? ब्राह्मणभोजन 
घालायचं आहेना ! उद्या तयारी कर! 

“तर तर ! तयारी करू कशी ? माझ्याकडे काय तुमच्या सारखी तांदळाच्या 
पोत्यांनी मरळेली कोठार आहेत !”' 

£ हात्तिच्या ! एवढंच ना! उद्या ५ पोती तांदूळ तुझ्याकडे पाठवून 
देतो मग तर झाले ना! ? 

6 खरंच गडे, एवढा तांदूळ ठेवला तरी कुठं बाई आपण ?!' वाड्या- 
तल्या कोठारांत तर ठेवतां येत नाही ! मग इतका सांठा असतो तरी कुठ १ 
मला एकदां आपली सगळी इस्टेट, जमीनी दाखवाव्या ना, उद्यांच हा 
सांठा दाखवावा गडे | मी तांदूळ पर्संत करणार माझ्या सत्यनारायणा करतां ! 
दाखवता ना ?"' चंद्राने मुरका मारून प्रश्न केला. 

तिच्या त्या लाडिक नखऱ्याने जमीनदार घायाळ झाले, तो गुप्त सांठा 
दुसऱ्या दिवशीं दाखविण्याचे वचन घेतलें तेव्हांच त्यांची प्रीतिदेवता त्या 
दिवशीं त्यांच्यावर प्रसन झाली 

दुसऱ्या दिवशी तिने आपला हृट्ट पुरा केला, दुपारी शिरवाडीा पासून 
४ भेल दूर असलेल्या एका मोडक्या, भुताटकीबद्दळ प्रसिद्ध असलेल्या 
बेंगल्याच्या तळघरांतला तांदळाचा तो सांठा पाहून तिनें मोठा आनेद 
व्यक्त केला, तांदळाच्या निरनिराळ्या जाती पाहून आपल्यासाठी उत्तम- 


मार्का पोलो 


येथें सोन्याचे नाणें चालते. पुरुष आणि बायका दाताला सोन्याचीं कवचें 
करून घालतात आगि हातांवर ब पायावर गोदून घेतात 

खालीं उतरल्यानंतर बेंगाल प्रान्त लागता, ब्रेंगालच्या राजाची आणि 
कुब्लाइखानाची एक फार मोठी लढाई झाळी, आणि पंजाबरांतील पोरस 
राजाच्या सैन्यातील हत्ती नी जसा पोरसचा नादा केला, तसा बंगालच्या 
राजसेनेंतील हत्तीमाही बरेगालच्या राजाचा केला. 

शेजारी मीन देश म्हणजे ब्रह्मदेश लागता, येथले उंच उंच मनोरे 
पॅगोडा-पहाण्यामारखे असतात, एका मनोऱ्यावर एक इंच जाडीचा सोन्याचा 
पत्रा ब्रसविळेला आहे. त्यामुळे जिकडे तिकडे सोनेंच सोने दिसते. 
मनोऱ्याच्या शिखरावर सोन्यारुप्याच्या लह्वान लहान घंटा टांगलेल्या अहित 
वारा सुटला कीं, त्या साऱ्या वाजू लागतात. पूर्वेकडे कारिजगू नावा'चा प्रांत 
लागतो, या प्रांतांत सोनें वाटेल तितके सांपडते, येथले लोक आपलीं अंगें 
गोंदवून घेतात, येथल्या रानांत हत्तीचे मोठमोठाले कळप हिडत असतात 
पूर्वेच्या बाजूळा अत्रू आगे थोलोआन ह प्रात आलांडले म्हणज, चिटिग्वी 
नांवाचे सुंदर शहर लागतें. इकडल्या टांपूत वाघांचा सुळसुळाट 
फार आहि. त्यांची शिकार करावयास लागणारे भयंकर कुत्रे येथील लोक 
बाळगतात, सिंचित्रयातु, लिंग्बि, प्रिंग्षि अश तऱ्हेची अनेक दाहरें पहात 
पद्दात, अभिय दिशेनें गेलें म्हणजे यांगत्सिक्यांग नदी लागते, जगांतली ही 
सगळ्यांत मोठी नदी असली पाहिजे, ही कोठें कोठें तर, दहा मेल रुंद 
आहि. 

टिंग्वि, वाग्वि, हीं शहरें कर्रात करीत पुढें गेलो म्हणजे, आपण 
किस्साई दाहराला पाहांचतो. याला अमरपुरीच म्हणतात ! आम्ही या 
शहरांत पुष्कळ दिवस राहिलो; आणि याची सव तऱ्हेची शोभा अगदीं 
बारकाईनें पाहिली, या शहरांतल्या रस्त्यांना द्गडाविटांची फरस बेदी केलेली 


ज.प्र...३ १ देई $ 


कु. ५ 
माका पाला 


| * ७ य क कै 

9 * व ७“: 

रीच २ ह 

“_, '९३-_,, 4 

2 क क 

6 टु द्‌ ७१४११११ & भु -्े 

01 व रां > ह 
व्य ऱ्य 0 


भार्का पोलो 


यी >“ चहा २. ४७. च “७ धका. ०0. “७९७००५८०००. ४.” “>> नळ 


आहे आणि शहरापासून दूर दूरच्या गांबांना जाणारे सगळे रस्ते अश्या 
फरसब्रंदीनेंच मढवलेले आहेत. राहरांत दुतर्फा मोठमोठाली घरं, आगि 
उेचच्या उंच हवेल्या लागलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फरशी 
ठेवून, मधल्या भागावर वाळूही पसरलेली असते, कमानीचीं गटारे 
ठेवलेली असल्यामुळें, रस्त्यांवर पडलेले पाणी नर्दीत वाहून जातें. एकाच्या 
ठिकाणीं आग लागली तर, नगारे वाजवण्याची चाल आहि. रात्रीच्या 
वेळीं सरकारी शिपाई सगळीकडे गस्त घालीत असतात. किन्साइ शहर 
सोडून अभियेनें पुष्कळ पुढें गेले म्हणजे कांचा नांवाचा परगाणा लागतो. 
डोवटीं जातां जातां झाईतून या बैद्राला आपण जाऊन पोहोचतो, 

झिपॅगू म्हणजे जपान हें पूर्वेकडील सागरांत एक मोठें ब्रेट आहे. 
त्रांब्जीच्या म्हणजे चीनच्या किनाऱ्यापासून १५०० मेलावर हें ब्रेट असावें. 
येथील लोक चांगले सुधारलेले आहित, या देदाचा राजा इतका श्रामंत 
आहि कीं, याच्या राजवाड्यावर सोन्याचाच पत्रा बसवलेला अहि, राजाच्या 

हालाची पटई सोन्याने मढवलेली आहि, या बेटांत मोतीही खूप सांपडते, 
रंग ताबूस असून, त्याचा दाणा गोळ आणि टपोरा असतो. हा देश 
जिकून घेण्यासाठीं कुन्लाईखानारने फार मोठे आरमार पाठवलेले होते, पण 
हे कुब्लाइखानाचें आरमार अक्षरदाः वाताहत झाले, 

१५० ० मैल समुद्र ओलांडून दक्षिणेकडे आलों म्हणजे अंबा<इंडो- 
चायना-या देशाला आपण येतों. या देशचा राजा कुब्लाईखानाला खंडणी 
देतो. ही खंडणी म्हणजे हत्तीचे कळप असतात, १२७८ त हा देश 
जिंकावा म्हणून कुबन्लाईखानानें तयारी केली होती. तेव्हां येथील राजानें 
त्याला कळविलें की, आम्ही दरसाल हत्तीचा एक कळप आणि चेदनाचे 
लांकूड खंडणी म्हणून पाठवीत जाऊं, येवढ्या खंडणीवर खूष होऊन 
कुन्लाईर्ने स्वारीचा बेत रद्दीत केला, 


1 दै५ 1! 


माका पोलो 

या देशांतून जावा नांवाच्या एका मोठ्या विस्तीर्ण बेटांत आपण 
जातों, हे ब्रेट निरनिराळ्या मसाल्याच्या झाडानीं भरलेले आहे. सोनें तर 
येथे इतके सापडते का, चीन मधले व्यापारी त्याचा जगी व्यापार चालव- 
तात. नैत्रद्वत्य दिशेने समुद्रांत गेळें म्हणजे, सोडूर आणि कोडूर हीं दोन बेटे 
लागतात. तेथून पुढे सुमात्रा बेटांत जातां येते. नोक्‍वूरान्‌ म्हणजे निकोबार 
आणि आगायान-म्हणजे अंदमान, हीं ब्रेटे पाश्चिमिकडे जातांना वाटेतच 
लागतात. दोवटी आपण झिलान-म्हणजे-सिलोनला पोहोचतो, या झिलान 
बेटांत आड्वीम म्हणजे पाहिला मानवप्राणी, त्याची समाधी आहे, असें 
लोक सागतात, पण बेटातळे लोक म्हणतात की, ही समाधी बुद्धांची आहे. 
या बुद्धांची कीर्ति कुन्लाईखानाच्या कानापर्यंत गेली, त्याला कळले का, 
यांचे कांही अवदोप या ब्रेटात अजूनही आहेत. त्याने ताबडतोब 
झिलानच्या राजाकेंड एक मंडळ पाठावैलें आणि या अवरेपांची मागणी 
केली, राजानें त्याना दोन दांत; एक केसाची वट, आणि पात्रूचे 
केलेले एक सुदरसे भांडें या वस्तु दिल्या, त्या घेऊन मंडळ परत गेले, 
या अवदोषाचे स्वागत करण्यासाठी कुब्लाईखानाची सारी राजधानी 
तटाब्राहेर आली ! 


झिलांग म्हणजे सिलोन अथवा सिंहलद्वरीप हे ब्रेट सोडून, पाश्चि- 
मेच्या रोखाने आपण ६० भेल गेलो, म्हणजे आपण माबार 
( म्हणजे मलबार ) येथें पोचतो, माबार हा हिंदुस्थान देशाचा एक 
प्रांत आहे. आणि हिंदुस्थान देश सगळ्या जगांत अतिदाय संपन्न 
असून, अतिशय थोर म्हणून गाजलेला आहे. या माबारांत चार 
राजे आहेत; आणि या चोघांत सेंदरबंदी ( म्हणजे झामोरिन्‌ ) हा 
मुख्य आहे, याच्या राज्यांत समुद्रकांठीं मोती सांपडतात. येथें समुद्राचे 
पाणी दहाबारा परुषच खोल असते; आणि कोठें कोठें तर, दोन 


: २६ ! 


मार्का पोठो 


हौ 0. “७ 40 0 66 0 0 0 20 0 “0 ७ के ४ अळी 0 14) आ अक जग अर, आलि. आ (की 0. &£* 2९ “*//:/*/” “/* /* शी णक 4 22 /* «० _/१ १ “ही “7 ४0 “मकी 


परुषांवरच मोती सांपडतात. मोती काढणारे कोळी आपल्या अंगाभोवती 
एक जाळें गुंडाळतात; आणि या जाळ्याच्या पिशवींत मोत्याचे शिंपले 
भरून, समुद्राच्या तळाशी गेलेळे कोळी वर येतात. मोत्यांचा दाणा 
चांगला गोल व अतिशय तेजस्वी असतो. कोळी जथे बुड्या मारतात, 
तेथें माश्यांचा उपद्रव फार मोठा असतो. म्हणून व्यापारी लोक मत्र 
जाणणाऱ्या कांहीं ब्राह्मणांना बरोबर नेतात, हे मांत्रिक त्या माशांवर मंत्र 
घालतात, आणि मग मासे कसलीही हालचाल करीत नाहींत. मोती 
काढण्याचें काम .दिवसभर चाललेले असतें. संध्याकाळ झाली की, हे 
मांत्रिक आपला मंत्र परत घेतात, आगि मग मासे पन्हा खेळूं लागतात. 
अथात्‌ रात्रीच्या वेळीं बुडी मारून दिपले काढावे, असें जर कोणी 
चोरट्याने मनांत आणले, तर त्याचा प्रतिवेध आपोआपच हेतोा. या 
ब्राम्हणांचे मंत्र पश्ुपक्ष्यांवर सुद्धां चालतात. एप्रिल महिन्यांत हें मोती 
काढण्या'चें काम चालूं होते; आगि मे महिन्याच्या मन्याला तें संपर्ते, हा 
हक्‍क व्यापाऱ्यांना राजाकडून विकत घ्यावा लागतो; आगि हक्काचे 
म्हणून, सांपडलेल्या मोत्यांतील दहा हिस्से राजाला द्यावे लागतात. 
मांत्रिकांना पिसावा हिस्सा द्यावा लागतो, उरलेले सारे मोती त्यांचे 
त्यांनाच ठेवतां येतात, अथातच ते चांगळा पका कमावतात, मोत्यांचा 
हंगाम संपळा म्हणजे आपलीं जहाज हाकारून ते तीनशें मेल दूर अस- 
लेल्या दुसऱ्या एका समद्रांत जातात, आणि सप्टेबर व आक्टोबर या 
देगन महिन्यांत तेथें मोत्यांचे शिपलळे काढतात. राजाला दहावा हिस्सा 
द्यावा लागतोच, पण शिवाय चांगले चांगले पाणीदार मोती त्यानें 
पहिल्यानें निवडून ध्यावे, आणि बाकीचा माल व्यापाऱ्यांच्या हवाली 
करावा, अक्षीही पद्धति असते. मात्र, या निराळ्या मोत्यांची राजा भरपूर 
किंमत देतो, म्हणून व्यापाऱ्यार्चः चांगली चगळ होते, 


: यै७ : 


मार्का पोलो 


«७ » » /. /»././.-५».».०.» .» --»“/>»..:”:.>_/”//“”»”“/”//”“/”//:>/“/:/“//./”/./.”/:/”:“/7/:“:“:““-औ.:“//,/--//”//-“:““/““-“/“-:““*““/“”“-<>“--:€“€-“*““-““।“-“““““/““/“>* 


या देशांतील लोक, एक लंगोटी सोडली तर, अंगावर दुसरे 
कसलेंही वस्त्र धेत नाहीत, राजासुद्धां, असाच अर्धनम असतो. फक्त 
फरक इतकाच कीं, त्याने कमरेला गुंडाळलेले वस्र भरजरीचें असते ! 
एरबीं राजाचा डौल मात्र फार मोठा असतो. हिंरे, माणके, लालड्या, 
पांचू, रतने, यांनीं लकटलेले नाना प्रकारचे दागेने राजाने घातलेले 
असतात. १०८ मोत्यांचा आणि माणकांचा छातीवर रुळणारा एक कंठा 
राजा नेहमीं घालतो, असे सांगतात की, जप करावयास या मण्यांचा 
त्याला उपयोग होतो. प्रत्येक द्दातांत, राजा सोन्याची तीन सलकडीं 
घालतो; आणि या कड्यांवर भारी किंमतींचें जडावाचे काम केलेले 
असतें, प्रत्येक पायालाही कंबरपट्यासारखे सोन्याचे पठ्ठे घातलेले असतात; 
आणि यावरही नाना प्रकारची मूल्यवान रत्ने बसविलेली असतात. 
हाताच्या आणि पायाच्या बोटांत सोन्याच्या आणि हिऱ्यामाणकांच्या 
अंगठ्या घातलेल्या असतात. य़ा सर्व अलंकारांनी नटलेला राजा मोठ्या 
डोलानें इकडे तिकडे वावरत असतो. मुख्य म्हणजे, हीं सर्व रतने 
आपल्या'च राज्यांत सांपडळेलीं अहित या गोष्टींचा त्याला फारच अभिमान 
वाटतो. 


राजाला कमीत कमी पांचशे राण्या आणि उपशस्ञिया आहेत. 
एकादी विशेष सुंदर स्री त्याला दिसली आणि तिच्यावर जर त्याची 
वासना गेली तर तो ती खुद्याल घेतो. एकदां तर राजानें आपल्या 
भावाचची बायकोच जवळ केली; आणि प्रसंगाकडे लक्ष देऊन, त्या 
बाईनेह्दी जिवाचा उगाच कहार करून घ्रेतला नाहीं. राजाच्या पदरी 
अनेक मानकरी असतात. इहलोकी, आणि परलोकी, यांनीं राजाची 
सेवा करावयाची असते. राजा जेथें जाईल तेथे त्यांनाही जार्वे लागतें, 
राजा मरण पावला, आणि त्याची चिता पेटली, म्हणजे हे सगळे मानकरीही 


£ दै८ ! 


“ >*>/७-” .” 27-22 “1 7“:7.“*॒७ /०.”९/” “7. “> शा 


त्या चितेंत प्रवेश करतात; कारण, परलोकीही आपण त्याच्या सेबेला 
रुजू व्हावें अशी त्यांची इच्छा असते. मुलगा गादीवर आला म्हणजे तो 
बापाच्या संपत्तीला हात लावीत नाहीं, ती संपत्ती घेग म्हणजे आपल्याला 
स्वतंत्र कांहीं मिळवितां यरेत नाही, असें दाखविण्यासारग्वे ठरेल म्हणन 
ही पद्धति राजकुमारांनीं चालूं ठेवलेली आहे, 


या पद्धतीमुळे राजकुळाच्या खजिन्यांत गडगंज संपत्ती साचत राहते. 
या देशात घोडा हे. जनावर नाही, राजा आणि त्याचे तिघे भाऊ 
दरसाल पांचहजार घोडे विकत घेतात, आणि परदेशचे व्यापारी खूप 
गबर बनतात, तांदुळाशिवाय या देशात कांद्दींच पिकत नाहीं, त्यामुळे, 
घोड्यांना दाणा मिळत नाहीं, आणि या प्रदेशांतील हवाही त्यांच्या 
प्रकतीला मानवत नार्ही, थोड्याशा दिवसांत हे घोडे मरण पावतात. 
आणि त्यांना होणारी शिंगरे वेडी बाकडीं आणि फॅंगडीं असतास, अर्थात्‌ 
नवे नवे घोडे विकत घेणे राजाला भाग पडतें, 


येथील स्री-पुरुष दिवसांतून दोनदां स्नान करतात, आगि स्नान 
केल्याशिवाय तोंडात अन्न घालीत नाहींत, पारोशानें जेवणाराला पाखेडी 
समजतात, जेवतांना ते डावा हात कशालाही लावीत नाहींत, स्वच्छ 
आणि नाजूक कामे ते उजव्या हाताने करतात; आणि अस्वच्छ, ब 
घाणेरड्या कामाला डावा हात राखून टेवतात, पाणी पिण्याचे ज्याचं 
त्याचें भांडे निराळे असते; आणि एकाचे उष्टे भांडे दुसरा कधीं घेत 
नाहीं. मद्य पितांना मद्याचे भांडे ते ओठाला लावीत नाहींत, उंचांबररून 
ते घशात ओततात. कोणी पाहुणा आला, आणि त्याचें भांडे जर 
त्याच्यापार्शी नसले, तर मद्य त्याच्या ओजळींत ओततात, आणि तो 
तें पिता, 


र्र 


मार्का पोलो 


“७ / धा ४/9४/2///£.-.. / 


क्रूणकोनें जर पेसे लवकर परत दिले नाहींत, तर धनको त्याच्या 
भोंबर्ती एक रेघ ओढतो आणि निघून जातो. या रेघेच्या बाहेर जाणें, 
अत्यंत खोटे काम समजतात. रोवटीं, कजे फेडण्याची कांहीं तरी व्यवस्था 
करून'च देणेकऱ्याला आपली सुटका करून घ्यावी लागते, एकदां 
राजावरच असा प्रसंग आला, व्यापारी लोकांचें कांहीं देणें राजा लागत 
होता. त्यांनी पुष्कळ आजंवे केलीं; पण राजा पैसे देईना, शेवटीं कंटाळून 
जाऊन, राजा एकदां घोड्यावरून चालला असतांना, या व्यापाऱ्यांनी 
त्याच्या भोंवर्ती रेघ ओढली. त्याबरोबर राजा ताडकन्‌ उभा राहिला. रेघ 
ओलांडून तो पुढे जाईना, कर्ज-फेडीची व्यवस्था त्यानें केला, आणि 
मगच तो तेथून हलला, 

हे लोक द्राक्षातज पीत नाहींत, एकादा कोणी पिणारा असला, 
तर न्यायमंदिरांत त्याच्या साक्षीला कसलीही किंमत देत नाहींत, समुद्र- 
यान करणांरांना सुद्धा येथे कसलाही किंमत नसते, आगि न्यायमांदेरांत 
समुद्रयान करणारांची साक्ष चालत नाहीं, मात्र, एकाद्यानें कसलीही 
बदफेली केली, तरी त्याच्याकडे हे दुलेक्ष करतात. 

या मल्बार प्रांतांतच, तो थोर हुतात्मा प्रेषित संत थामस्‌ याची 
समाधी आहे. या समाधीच्या यात्रेला हजारो ख्रिस्ती लोक आणि 
सरसिन्स जातात, या संताची एक मोठी चमत्कारिक कथा या बाजूला 
प्रचलित आहे. इ. स, १२८८ तींल ही गोष्ट आहे. एकदां एका 
मोठ्या जमिनदारानें आपल्या रेतांतील भात गोळा केलें. तें सांचवून 
ठेवावयास पुरेशी जागा नव्हती म्हणून, त्यानें सेंट थॉमसच्या प्रार्थना- 
मंदिरांत तें भरून ठेवले, थामसच अनुयायी म्हणू लांगळे “ आमचें हॅ 
प्राथना-मंदिर आहे; आगि गावोगांवचे येणारे यात्रकरूही या देवळांतच 


४ ४० १ 


मार्का पोलो 


५“*.“-/”///€/ /*7%*77> “« *€ "2". “२ “५५०९४१ क. बकुळ. . पाण (७५ » (वरळी आड के क. क के... : कळे री र. म *-: "८. 2/'/* “7-/-“ //72“-:“-ौ*“>//*“*:“>“.“.“-.“>“-“.2/..: /”./“:.:“>“>“>“.“ 


उतरतात; तर तुम्ही आपलें भात काढून ध्यावे. ” परंतु जमीनदार 
बिलकूल ऐकेना, दुसऱ्या दिवर्शी रात्रीं जमीनदाराला स्वप्न पडलें, त्याला 
वाटलें की, सेंट थॉमस्‌ हा अतिशय संतापून आपल्यापुढे उभा आहे. 
आणि आपल्या हातांतील त्रिशूळ त्यानें आपल्या गळ्यावर रोखला आहे. 
थॉमस म्हणाला, ' जर तू आपलें धान्य काढून नेले नाहींस, तर तुला 
कुत्र्याचे मरण येईल, ' जमीनदार खडबडून जागा झाला आणि त्यानें 
थॉमसर्चे देऊळ एकदम रिकार्मे केळ, पडलेळें स्वप्नही त्याने लोकांना 
सांगितलें, तेव्हांपासून थॉमस्ची कीर्ति सगळीकडे पसरली. परंतु, या 
संताला मरण मात्र चमत्कारिक आले, एके दिवशीं तो आपल्या आश्रमांत 
डोळे मिटून प्रार्थना करीत होता. आश्रमाच्या बार्गेत मोर हिंडत होते. 
पलीकडून जाणाऱ्या एका शिकाऱ्यानें मोराला तीर मारला, पण तो 
मोराला न लागतां या साधुपुरुषाला मात्र लागला. मरण जवळ आले हं 
ओळखून, त्याने परमेश्वराची प्रार्थना केली; आणि मला आता पदरीं घे 
असे म्हणून त्यानें प्राण सोडला, त्याच्या समाधीचची पूजा लोक भक्तिभावे 
करत!त; आणि त्याला ज्या ठिकाणी बाण लागला, त्या ठिकाणची तांबडी 
माती ते अंगारा म्हणून वरोबर नेतात, कोणी आजारी असले तर, ही 
माती कालवून ते त्याला प्यायला देतात; आगि आजार्‍्यांना गुणही येतो. 


कोपली ( म्हणजे केपकामोरिन ) या प्रांम्तांतून रूवाचचा तारा क्षितजा- 
पासून एक हात उंचावर दिसतो, जिकडे तिकडे रार्नेच रानें पसरठेली 
अद्दित, आणि त्यांत वन्यपश्ू हिंडत असतात. येर्थे कांही वानरे दिसतात, 
तीं येवढी मोठीं असतात, आणि त्यांचे नाकडोळे असे दिसतात की, 
माणसांत आगि त्यांच्यांत फारशी तफावत वाटत नाही. दुसरी लांब 
दोपट्यांची नेहर्माचीं माकडें येथे दिसतातच. पण तीआणि हीं अगदी 
निराळीं असतात,” 


५५72 /”»//2//2/£/£//£/”/£-/»//:/.:-”-/”./”//.::/:/::“/”7//>2//.///»/.-//2.:::///://:/“*/”://////:“////“/““।“/“/“€£“£////:“/““//““_>-“4 


मार्का पालीच्या वर्णनावरून असें दिसते की, फार झार्ले तर, भार- 
ताच्या अगदीं दक्षिण टॉकाला मलबार प्रांतांत ता आलेला असावा, 
त्याने ठिकठिकाणीं लिहिलेळे आहे की, “ या प्रांताच्या पाश्चिमला तीनी 
भल गेलें, पूर्वला पांचरी मेल गेलें म्हणजे अमूक प्रांत लागतो. ” परंतु 
या त्याच्या उललेखांचा कांहीं बोध होत नाहीं. आणि या प्रांतांची त्याने 
जीं वर्णने केलीं आहेत, तीं इतकीं सामान्य स्वरूपाची आणि ढोबळ 
आहित की, हे प्रांत त्यान प्रत्यक्ष पाहिले होते, असे बिलकूल वाटत नाही. 
झालें असेल तें हँ की, मार्का पोलो मलवार प्रांतांत येऊन राहिला असेल, 
आणणि तेथे त्याच्या कानांवर आलिल्या प्रांतोप्रांतींच्या हकीकती त्याने 
लिहून ठेवल्या असतील, त्यानें लिहिलेल्या प्रवासवृत्तांवर तेव्हांचे लोक 
विश्वास ठेवीनात अर्से मागें सागितलेलेंच आहे. परंतु, भारताच्या दिण 
भागांतील प्रदेशांचीं त्याने जीं वर्णने लिहिलीं आहेत, तीं पाहिली म्हणजे 
विश्वास न ठेवणाऱ्या लोकांचें विशेष कांहीं चकलें होतें असें वाटत नाहीं, 
मार्को पोलोनें प्रवास केला असेल हें स्वरे, आणि म्हणून त्याची मुख्य 
हकीकत आपण खरी मानावी, पण त्याने जी नाना प्रकारची अंधुक स्वरूपाची 
माहिती दिली आहे, ती खरी मानणें बरोबर होणार नाही, तो म्हणतो- 


“ कार्मौदिन, कानान, कबाया, गुजराथ अशासारख्या देशांची 
हकीकतही आपल्याला ऐकाबयास मिळत, हजारों मेलांचा समुद्र-प्रबास 
केला म्हणजे आपण मादागास्कर बेटांत जातों, येथें दरवर्षी अमूक एका 
भ्हृतूंत प्रचंड आकाराचे पक्षी येऊन दाखल होतात. यांचे नांव रुक्‌ 
अर्से भाहे. ते गरुडासारखे दिसतात, पण गरुडाच्या मानार्ने फारच मोठे 
असतात. हे इतके बळकट असतात कीं, ते आपल्या नख्यांनीं हत्तीला 
सुद्धां उचलतात. उच दृवेंत नेऊन ते तेथून त्याला खालीं सोडतात. हत्ती 
आपटून मरून जातो. आणि मग त्याच्या मासांवर हे यथेच्छ ताव 


४ ४० $ 


मार्का पोला 


पसरले म्हणजे हे सोळासोळा हात लांब भरतात. येथून पुढें झांशिबार 
बेटांत जातां येतें. पुढे आवास्सिया म्हणजे अबिसिीनया देश लागतो, 
होतां होतां आपण कॉनस्टॅटिनोपलळला जाऊन पोहचतो; काळ्या समुद्राच्या 
वर, राशियांत वस्ती आहे. पण तिकडल्या प्रांताला अंधार-देश असें नांव 
आहि. कानस्टटिनोपलहून आम्ही व्हेनिसाला गेलो, 


४ ४३ : 


२ “7२ -* “२ “% 


सुमारें साडे चारशे वषोपूर्वीपरयेत, युरोपियन लोकांना अटलांटिक 
महासागराचे फार भय वाटत असें. इंग्लंड, हॉलंड, फरान्स येथून निघालेले 
दर्यावर्दी दक्षिणिकडे जाऊन, भूमध्य समुद्रांत तरी शिरत; किंवा आपिरके- 
च्या पाश्चिम किनाऱ्याने आणखी थोडें खालीं जाऊन, उष्ण हवेचा टापू 
लागतांच्च, परत फिरत. तथापि, याच्याही पूर्वी आपैरकेच्या दक्षिण टोकाला! 
वळसा घालून, एकादा दयायर्दी तरी, हिदी महासागरांत उतरलेला अस- 
ल्याची नोंद इतिहासांत आहे. पण युरोपांतून, थेट पाश्चिमकडे जाऊन; 
अटलांटिक महासागरावर सफर करण्याची छाती मात्र कोणीही केलेली 
नव्हती. कोणी काणी नाविक सांगत असत कीं, हा समुद्र ओलांडला 
म्हणजे, पलीकडे एक मोठी विशाल भूमि आहे; व या समुद्रांत अनेक 
बारीक सारीक ब्रेटेंही अहित. परंतु नाविकांच्या या सांगण्यावर विश्वास 
ठेवून कोणींही आपली जहाजें त्या अंगाला नेली नाहींत, याचें एक प्रमुख 
कारण असे की, या अटलांटिक महासागरावर, सध्यां सुद्धां बारीक तिमिर 
पसरलेळें असतें; अनेकदां जिकडे तिकडे घुकें भरलेले असतें; आणि दयीही 
पुष्कळदां खवळलेला असतो. अथात्‌ तेव्हां तर लोकांचा असा समज 
होता की, या समुद्रांत पुढें पुढें जाण्याचे साहस जे कोणी करतील ते सेता- 


2१ शु: 


कोळंबस 


४7 ९. 4-4. ८००८. .»/ ७ १.” २.४५ /0७ '७ %_»%, खळ गोळे ४७ २ ७ ७ ३ क 8. /९७ ७ के ३ “. % 4. ७ २६ 7 4. . “०६ % ४ ६ 4. ७५ “च. कक, ७. 0 जे. ४. 0. “क ०. 20७ 


नाच्या मुलुखांत जाऊन दाखल होतील, हा समाज पांच शतकापूर्बीपर्यंत 
लोकांच्या मनांत गच्च बसलेला होता, 


युरोपांतील व्यापार आशीया मायनर, इराण, अफगाणिस्थान या वाटेने 
हिदुस्थान व आशियांतील इतर देश याच्याशी चाळू असे. हाच मोठा 
हमरस्ता हाता, परंतु, या प्रदेशातील तुक्चे आणि युरोपियनांचें वाकडे 
आल्यामुळे, त्यांनीं व्यापाराची ही वाट बंद करून टाकली, तुंबलेला व्यापार 
कोणीकडून चाळू करावा, अशा विवेचनेंत य्रोपांतील व्यापारी राष्ट्रे पडली, 
आणि मग, युरोपाच्या उत्तरेकडून, आपेरकेच्या दक्षिणकड्टून, असा कोठून 
तरी, दर्यावरचा नवा मार्ग शोधून काढण्याच्या उद्योगाला हॉलंड, इंग्लंड, 
स्पेन येथील नावाडी लोक लागले. युरोपच्या उत्तरेकडून जाणे हें बर्फो- 
मुळें तेव्हाच्या दिवसांत, सर्वथा अदाक्य ठरले, आणि आपिरकेच्या पाश्चिम 
किनाऱ्याने बरेच खालीं गेल्यावर, उन्हाचा कहर सुरूं होत असल्यामुळें, 
पुढे गेल्यास, आपण नरकपुरींत जाऊन पोहचू, असा धाक त्याना वाढू 
लागला, अशा प्रकॉर, पूव दिशकडे जाण्याचा प्रश्न कुचंबून पडला, द्र- 
भ्यान्‌ तेव्हाच्या सशोधकानी असा एक सिद्धांत माडला होता की, पृथ्वी 
गोल असली पाहिजे, हा सिद्धान्त फार थोड्या दहाण्या लोकाना पटलेला 
होता, आणि या शहाण्या लोकांतच कोळंबसाची गणना करावयास हवी, 

पृर्थ्थी गोळ आहे हें मत तर त्याला पसंत झालेंच होते. पण तो येव- 
ढ्यावरच थाबला नाहीं, पुढें जाऊन त्याने असें अनुमान बांधलें की, जर 
परथ्वी गोळ आहे तर, पश्चिम दिशेनेच पुढें पुढें गेळें असतां, आपण पूर्व 
दिदोला जाऊन पोहचू, पूर्व, उत्तर आणि दक्षिण या दिशांनी मार्ग काढणें 
अशक्‍य झालेले होते; पश्चिम दिशा तेवढी रिकामी राहिलेली होती. प्रथ्वी 
गोळ आहे, अशी कोलंबस'ची पक्की खात्री असल्याहूळें या बाजूनेच पूर्व 
दिशेला जाण्याचा मार्ग शोधून काढावा असें त्यानें ठरावेलें, 


४ ४५ 4! 


७ & 
काढबस 


४७. आ “नट “ >. “> - नॉ. >“ अक्ल -<<-- 


उत्तर मात्र एक्रच नव्हते, इतर बहुतेक सारे लोक म्हणत कीं, हिंदुस्थानां- 
नील आगि आशिया खंडांतील बाजारांत आपला माल नेऊन मांडता 
परावा, आणि तिकडील मसाले युरोपांत परत आणता यावें यासाठी ह्या 
ववा मार्ग पाहिजे आहे. 

कोलंबसाचें मत मात्र निराळें होते. त्याला वाटे की, पूर्वेकडील देशांत 
जावे, पुष्कळ पैसा संपादन करावा, आणि हा पेसा मुसलमान लोकांचें 
भाक्रमण युरोपवर होत होते ते बंद पाडण्याच्या कार्मी खर्च करावा, 
'हृणजे त्याच्या मतानें पूर्वेकडे जाणें हें एक घर्मकार्य होतें. शिवाय बाय- 
लांत सांगितलें आहे की, ' पथ्वांविरील लोक जवळ जवळ येतील, ? कोल- 
[साला वाटलें की, आपण तिकडे गेला म्हणजे भाकित केलेली ही जव- 
ठीक आपोआपच उतप्तन्न होईल, आणि पूर्वेकडील लोक आपल्या धमाची 
दीक्षा घेतील, अशा कल्पनांनी प्रेरित होऊन, कोलंबसानें आपली जहाजें 
भटलाटिक महासागरांत हाकारली, परंतु, हा कोलंबस, कोण, कोठला, हें 
|॥हिल्यानें सांगितले पाहिजे, 

इटलीतील जिनोआ गांबीं इ. स, १४२५ त कोलंबस जन्माला आला, 
याचे आईबाप गरीबच होते. पण घराणें चागलें कुलबंतांचें होतें, कोलं- 
[सला दोन भाऊ आणि एक बहीण अशीं तीन मावंरडे हाती, आपला 
[डील मुलगा कोलंबस हा लवकर शाहाणा झाला पाहिजे अशा हिशेबाने, 
॥पानें फार लहानपणीच त्याला शिकवावयास आरंभ केला, बुद्धीनें चलाख 
पसल्यामुळे, त्याला सर्वच विषय चांगळे येत, परंतु, बापाच्या हें ध्यानांत 
पाळे की, या पोराला भूगोलाची माहिती फार आवडते. त्यार्चे रहाणे 
मुद्रकाठाच्या जवळ असल्यामुळे, कोठंबसाला वाटू लागले की, आपण 
॥वाडी बनावे. मुलाचा हा कल पाहून, बापार्ने त्याला नावाडपणार्चे शिक्षण 


$ ४६ : 


कोलंबस 


देण्याचे ठरावेले, प्याभिआ येथें एका शाळेंत हें शिक्षण देत असत. भूमोति, 
भूगालविद्या, खगोलविद्या, आणि नावाडीपण हे विषय कोलंबस तेथें 
आबडीनें शिकू लागला, मास्तरसाहेबरांचे एकंदर शान ब्रेताचेंच होतें. 
त्यांची पुंजी संपल्याबरोबर दुसऱ्या कोठल्या शाळेत न जातां, कोलंबस 
एकदम समुद्रावर गेला; आगि कोलंब्रो या नांवाच्या एका नातेवाईक 
खलाशाच्या हाताखालीं नाकरीला राहिला, ता या वेळी केवळ 'चौदा 
वषीचा होता ! 

भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर यावेळी अनेक लहान लहान सज्यें होती. 
आणि प्रत्येक राजाचे एक लहानसे आरमारही असें. परंतु ठिकठिकार्णी, 
कांहीं साह्सी लोकांनीं जवळ बरीचक्षी तरांडीं बाळगून, राजांच्या आरमा- 
राला न जुमानता, समुद्रावर वाटमारीचा धंदा ब्रेघडक चालयिला होता. 
या ब्रिलंदर चाचे लोकांतही कोलंबो हा सवाई त्रिलंदर म्हणून प्रसिद्ध असे, 
आणि यांच्या हाताखालीच कोलंबस समुद्रावर भटक्या मारावयास शिकला, 
थोड्याशा सरावाने त्याची पाण्याची भीती पार मरून गेली. इ. स, १४४९ 
साली राजानें नेपल्स शहर हस्तगत करण्यासाठी तयार केलेल्या आरमारा- 
तील एक ताफा कोलंबाच्या हवाली केला, समुद्रावर्ची ही लढाइ चार वर्षे 
चाललेली होती, आगि कोलंबस ४ वर्षे पर्यंत, दर्यावरच नांदत होता, 
एकही साहस असे नसेल की, जे त्यानें आचरिले नाहीं. अटलांटिक 
महासागराच्या अंधाऱ्या हृबेंतून जहाजे हाकारीत नेणें, हॅ. धेर्यारचे काम 
त्याने पुढें केळे, पण, त्या धेयोचा पाया या चार वषोत कोलंबसानें भरला. 
तो मनानें आणि शारीरानें विलक्षण बळकट बनला, इतक्यांत कोलंबो 
मरण पाबळा, आणि त्याचा पुतण्या धाकटा कोलंब्रा ह्या त्याच्या जागेवर 
आला, हा कोलंबो मोठा निदय आणि आडदांड असे, 


एकदां असें झालें की, व्होनिसवाल्यांची कांहीं जहार्जे परत आपल्या 
£ ४७ ! 


देशाकडे चाललीं हाती. आणि जहाजांवर उंची माळ भरलेला होता. 
पोतुगालच्या किनाऱ्याने ही जहाजे चालली असता, कोलंबो आणि कोलंबस 
या दोघांनी त्या जहाजांवर हणा चढविला, जहाजावरचे लोक यांच्या- 
सारखेच महा रगेल होते. युद्धाची झुंबड सकाळपासून संध्याकाळपर्यंत 
सारखी चालली होती. दोग्हीं जहाजांवरची कित्येक माणसे मेली, होता 
होता, कोलबस ज्या जह्वाजांवर होता, ते एकाएकीं पेटले, रात्रूंच्या जह्या- 
जावर उड्या टाकतां याव्या म्हणून, कोळंबोने आपली दाहाजे शात्रेच्या 
जह्ाजाना साखळदंडांनीं बांधून टाकलीं होतीं, यामुळें दोघांचीही आरमार 
पेटली, जीव वबाचवावयाचा तर समुद्रात उढ्या टाकल्याशिवाय गत्यंतर 
नव्हते. कोलंबसानेंही उडी टाकठी; आणि सहज हाताला लागलेल्या 
एका फळकुटाला धरून, सहा मेलपर्येत, पोहत जाऊन तो. पोवुंगालच्या 
किनाऱ्याला लागला, 

यावेळीं पोठुंगालच्या गादीवर प्रिन्स हेन्सी या नावाचा राजा होता. 


च ८” 
व. भु 
च. > पेकिकिळ 
> 
आळ “५० कह 34 >] 
क 
क 


७ .] ५ 
७०७ आ क जळी, 


ह्या राजा मोठा आकांक्षी आणि साहसी होता, मूर लोकांच्याशीं भांडतां 
४१ ४८ $ 


कोलंबस 


“ळी... -»>-८ळ ००० 2०७७० >-“-”->>-*“-_--_-> “५८ “> -->” < ट्ट 


भांडता, आपिरकच्या पाश्चिम किनाऱ्याने तो पुष्कळच खालपयेत गेलेला 
होता, तेव्हां त्याने अटकळ बांधली होती की, आफिरकेला वळसा घालतां 
येईल; आणि मग तेथून पुढें गेल्यावर, हिंदुस्थानालाही पोंचतां येईल, 
उष्ण करिबंधांत शिरले असतां, जळून मरण्याची भीति तो. खोटी मानत 
असे, राजाच्या या अनुमानामुळें साहसी नावाडी लोकाना मोठाच उत्साह 
प्राप्त झाला होता; आणे ज्याच्या त्याच्या तोंडीं दूर दयीवर जाण्याची 


गोष्ट चाळू होती, याच वेळी, म्हणजे इ. स, १४०० सुमारास कोलंबस 
पोहत पोहत पोतुगालच्या किनाऱ्याला लागला. 

लिस्बन येथें असतांना, समुद्रावरच्या सफराचा हा घोप त्याच्या काना« 
वर सारखा पडत होता. सफरांतील साहसांची आवड, एवढा एकच विषय 
त्याला अजून तरी दिसत असे. परंतु आतां प्रिन्स हेस्रीच्या भूगोल-विषयक 


जप्र४... $$ ४९ : 


कोलंबस 
कल्पना त्याने एकल्या, तेव्हा त्याच्या प्रतिभाशाली मनात चमत्कारिक 
वादळे उठ लागली; आणि या वादळाना कांही आकार यावयास एक 
निराळेच कारण झाले, कोलंबस रोज देवळांत प्राथनला जात असे. या 
देवळाच्या शेजारींच डोना फिनिया या नावाची एक मोठी प्रतिष्ठित व 
उच्चे काळांतील खी राहत असे, तिचे मन कोलंबसावर बसलें. लवकरच 
शुभमंगल होऊन सासूबाइनी कोलंबसाला धरजावडे करून घेतले ! कोल- 
बसाचची काठी सडक उंच असून तो चांगला बांधेसूद आणि पिळदार 
होता. त्याचा चहरा थोडासा लाबट असून नाक चोचदार व डोळे घांर 
असत. डोळ्यांची भिंगे स्वच्छ लखलस्वित होती; आणि त्याची 'चालण्याऱ्ची 
ढब बिशप ऐटदार होती, अशा या पुरुषावर, त्या स्त्रीचे मन बसावें, यात 
कांहींच नवल नाहीं, परंतु, तो घरजावई बनला, याचा मात्र त्याच्या भावी 
जीवितावर फारच मोठा परिणाम झाला, सासरा वारललाच होता. पण तो 
जिवत असताना, त्याने अनेक सफरी केलेल्या होत्या, आणि त्या सफरीचे 
नकार त्यांने तयार करून ठेवले होते. सासूने हे सारे साहित्य जावयाच्या 
हवाली कठे; येबढेच नव्हें तर, नवऱ्याच्या तोंडून ऐकलेल्या समुद्रावर्या 
नाना प्रकारच्या गोष्टी ती त्याळा नित्य सांगूं लागली, नकाशे पाहून कोटं 
बसची नजर फांकली; आणि गोष्टी ऐकून त्याचे साहस पुन्हां जागें झाले, 
सकरीवर जाणाऱ्या लोकांना नकाशे लागत, म्हणून हाती असलेल्या नका- 
शांच्या नकला करण्याचे काम त्याने सुरू केळे; आणि समुद्रावरून नव्याने 
जाऊन आलेल्या लोकांच्या तोडून जर कांहीं नबी माहिती मिळाली, तर 
ती त्याने नकाशांत दाखविण्याची पद्धत ठेवली, स्वाभाविकच कोणाही 
नावाड्यापेक्षा, आतां त्याला समुद्राची माहिती जास्त झाली, पूर्वी होऊन 
गेल्ल्या भूगोळकारानी लिहिलेल ग्रथ त्याने वाऱ*चून काढले; आणि त्यानी 
दिलेली माहिती आधुनिकांच्या माहितीशी कोठे जुळते ब कोठें जुळत नाहीं, 


$$ ५८ ३१ 


कोळेंबस 

हे त्याने ताडून पाहिठें, वर सांगितलेच आंहे की, आपिरकेच्या दक्षिण टोकाला 
बळसा घालून, पूर्वेकडे जाता येइल, य़ा एकाच विचाराने सारे नावाडी 
देशा भरून गेले होते. पण उष्ण कटिबधातून दक्षिणेकडे जाणे फार 
धोक्याचे आहे, ही. भीति मात्र निरस्त झालेली नव्हती. अश्या वेळी कोलं- 
बसाच्या मनात विचार आला की, “* ज्याने उठावे त्यानें द््षिणेकडेच 
जाण्याची कल्पना का करावी ! युरोपच्या उत्तरेकडून जाता येत नाही, 
कारण तिकडे बर्फ फार आहे; आणि आपपिरकेला वळसा घाढून जातां 
येत नाही, कारण वाटेतच आपण भाजून मरू अशी भीति लोकांना 
वाटत आहि. मग आपण पश्चिमेकड्ूनच का जाऊं नये १? जर पथ्वी गोल 
आहि, तर पाश्चिमकडे पुढे जाता जाता, पूवकडे असलेल्या हिंदुस्थान 
देशांत आपण केव्हाना केव्हा तरी पोहूचूंच ,_ 

या कल्पनेने कोलंबसाचें मन अगदी भरून गेलें, फ्लोरेन्स शहरा 
भूगोलवेत्ता पोलो टास्कानेळी याजबरोबर त्याने पत्रव्यवहार चालूं केला, 
कारण, हाच कल्पना या पंडितांच्या मनातही बरेच दिवस घोळत होती, 
पृथ्वी वाटोळी असून पूर्वेकडून पश्चिमेस व पाश्चिमेकडून पूर्वे, आपो- 
आप-च जाता आलें पाहिजे असा त्याचा सिद्धांत हाता आणि पूर्वेकडे 
पसरलेळठें आरिया खंड पसरत पसरत युरोपच्या पाश्चिमेस थोडासाच समुठ़- 
मध्ये रहाण्याइतकें पसरले असावे असा त्याचा अदाज होता, आशिया 
खंडार्‍चा पूर्व किनारा व युरोपचा पाश्चिम किनारा याच्यामधील अन्तर फार 
थोडें असलें पाहिजे अशी त्याची कल्पना होती, कारण पृथ्वीचा परीघ 
आहि त्याहून फार लहान असावा अशी त्याची अटकळ होती, युरोपच्या 
पाश्चिमेला पसरलेला विस्तीणे अटलांटिक महासागर, त्याच्या पलीकडे 
अमेरिका हे. अक महाद्ीप, आणि त्याच्या पलीकडे पॅसिफिक नांवानें 
मोडणारा अफाट महासागर, इतकें झाल्यावर मग आरिया खंडाचा 

४ (६१ : 


9 


कोलंबस 
पूर्वी किनारा लागतो हें तेव्हां कोणालाच माहीत नव्हतें, या पोलो टास्का- 
नेलीने आपले हें मत कोलंब्रसालळा कळविळे आणि वरोबर अक नकाशाहि 
काढून दिला, नकाशा पाहून कोलंबसाचची खात्री झाली काँ, युरोप व 
आशिया यांच्यामर्धाील नकाशात दाखविलेले थोडेसे अन्तर आपण जर 
धाडस करून ओलांडले तर आपण आरियांत ब मग हिंदुस्थानांत जाझं 
शकू, हें त्याचें ठाम मत झाले, मार्को पोलो, अल्फिगॅनस इत्यादींची मतेंहि 
त्याने शोधून पाहिली, अँसरिस्टॉट्ल, सेनेका, प्लिनी इत्यादिकांच्या मताचा 
कानोसाहि त्याने घेतला आणि पाश्चिमकडे चालं लागलें असता आपल्याला 
पूर्वकडील हिंदुस्थानात जाझन पोहाचतां येइल हे आपले मत त्याने 
कायम केले, 

अकीकडे शास्रवेच्यांचा मते पहात असताना दुसरीकडे खलाशी लोक 
काय बोलतात याकटेहि त्याचे लक्न होते. मदिरा लिओनामा नांवाचा हा 
खलाशी सांगत असे कीं, पाश्चिमकडे तीन चारदेो मेल गेलो असतां तेथे 
आपल्याला काही ब्रेटे दिसली, आयलंडचा अक खलाशी सांगत असे कीं 
पाश्चिमकडे दूरवर गेलो असतां आपल्याला तातरी देशाचा किनारा दिसूं 
लागला होता, कोणी कोणी सांगत कीं, पश्चिमच्या बाजूला एक हजार 
मेळ सफर केल्यावर समुद्रावर पश्चिमकडे वाहात येणारा कोरीव लांकडें 
आपण पाहिली, कोणी म्हणत कीं, आपल्याला ताजे ऊंस सुद्धां दिसल 
आणि कोणी निवाळा देत की, आपल्याला चमत्कारिक रंगाची काळी 
माणसें भर समुद्रांत भेटली होती, या बातम्यांचा अपयोग किती करून 
घ्यावयाचा याची अटकळ कोलंबसाला अथोतच होती. पण, ' पुढे 
पृथ्वीची दोन टोके एकत्र येतील व माणसे आपापली राष्ट्रे, भाषा इत्यादि 
विसरून ' तारकाच्या ' निशाणाखालीं गोळा होतील हँ बायबलांतील बाक्‍्य 
कोलेंबसाच्या श्रद्धाळू मनाला फारच पटलेले हाते, अशा प्रकोर॑ शास्त्र- 


१ (५4५ : 


कोलंबस 


४५०८५९०९2९ “9670 ९०6*०€५५"”/४५/"-€ 2९-07 -/-<५-/-/€-”- -“€><>*-> - -<->.>-/.>><- “८. - 0 7४५क नट ल्क शा >“ क य वीवििगाूगव् 


सिद्धांत, अनुभवी लोकांनीं सांगितलेल्या कथा, आणि धर्म ग्रंथाने केल 
भाकित हीं सर्व जमेस घरून कोलंबस आपल्या अद्योगाला लागला, 

यावेळीं पोलुंगाल देशाच्या गादीवर, मागें सांगितलेल्या देन्रींचा नातू 
जॉन हा होता. आजाप्रमाणे त्यालाहि भामि-शोधाचा मोठा नाद असे 
त्याने एक अंस्ट्रीलेन या. नांवाचे नोकानयनास अत्यत उपयोगीं असें 
साधन तयार केळे होत. या राजाकडे कोलंबस गेला, त्याच्या म्हणण्याचा 
निकाल करण्यासाठी राजाने एक समिति नेमली. या समितीचे कांहीं 
सभासद मूख होते आणि काही मत्सरी होते. त्यांना राजाला कळविलें 
की कोलळब्रस हा एक भ्रातिष्ट मनुष्य आहे. परंतु तेवढ्याने राजाचें 
समाधान होईना; म्हणून त्यांनी एक निराळाच राक्कळ काढली, त्यांनी 
राजाला सुचचविळें कां ज्या दिंशेनं गेळो असता नवी भामे सापडेल असें 
हा म्हणतो त्या दिशाला आपणच आपली माणसें घाडावीं म्हणजे नवी 
भाभे शोधून काढल्याचे श्रिय तरी राजेसाहेबांना लाभेल, या गोष्टीला 
राजानें हाकार दिला, समितीने कांदी थोड्याशा नावाड्यांना मारून 
मुटकून भूमि-शोधाच्या या कामगिरीला धाडले, परंतु या नावाड्यांना 
स्वतःला शञानहि नव्हते आणि आकांक्षादि नव्हती. समुद्रावर कांहीं 
दिवस घालवून ते रडत घरी परत आले; आणि सांग्र लागळे कीं तुम्ही 
पश्चिमकडे बाटेळ तितके जा, जमिन म्हणून कोठें सापडत नाहीं; हा 
कोलंबस कोणी तरी उपरा आणि पैसे उपटावयास निघालेला माणूस 
दिसतो, नावाड्यांचे मत प्रमाण मानून राजानें कोळबसाला निराप दिला, 
हा सारा लबाडीचा अकार कळून आल्यावर कोलेंबसाला राजाविषयी 
तिरस्कार वाटूं लागला. दरम्यान त्याची ब्रायकोहि वारली. खर्चाचे नीट 
निभेना; अशा स्थितींत त्याने पोघुगाळ देशाला रामराम ठोकला. कोणी 
म्हणतात कीं सावकाराचे तोंड चुकविण्यासाठी त्यानें पोर्तुगाल देशांतून 
यःपलाय केलें. 


: (१३ : 


तेथून तो जिनोआ शहराच्या राजाकडे गेला, पण तो म्हणाला, * माझे 
राज्य केवर्ढे आणि मी तुम्हांला देणार काय ? ? येथेंहि निराशा झाल्यावर 
आपला धाकटा भाऊ वार्थालोना याला कोलबसाने इंग्लडच्या सातव्या 
हेर्साकडे धाडले. चार ठिकाणी खडा टाकून पहावा, जेथे लारेल तेथे 
लागेल अत्या हिदाबाने भावाला तिकडे पाठवन तो. स्वतः स्पेन देशांत 
गेला. यावेळी त्याची स्थिती अत्यंत हृलाखीची हाती. अंगावर नीट कपड! 
नाहीं आगि खिश्ांत दमडा नाही अक्का स्थितीत ता आपल्या मेव्हण्याच्या 
गांवाकड निघाला, वाटेंत एका धर्मापदेशकाचची आणि त्याची गांठ पडली 
आणि त्याने कोलंबसाचे म्हणणें आस्थेने ऐकून घेतलें. बरोबर एक 
ओळखीचे पत्र देऊन त्याने कोडेंबसाठा आलॉशो पिंझे या नांवाच्या एका 
दर्यासारंगाकडे पाठविठें, त्याने कोलबसाशी बोलणें चालणे केलें आगि त्याची 
शिफारस करून त्याला राजदरबाराकडे रवाना केले. 

हा राजघार्नीत जाऊन पोाहाचतो तों त्याला तेथे मोठा गोंधळच सुरु 
झालेला दिसला, राजा फर्डिनेड हा मूर लोकांशी युद्ध सुरूं करणार होता. 
म्हणून जिकडे तिकडे दंगल माजून राहिली होती. फर्डिनेड राजा आणि 
इसाबेल राणी दी फॉर चांगलीं माणसें हाती, पण यावेळीं कामे फार 
असल्यामुळें कोलंबसाच्या बोलण्याकडे लक्ष द्यावयास त्यांना वेळ सांपडेना, 
कोलंबस अगदी रक्रमेस आला होता. जवळ पैसा नाहीं, धंदा नाहीं अशी 
त्याची स्थिती झाली हाती, इतक्यांत नशिबाने त्याल! निराळ्याच बाजूने 
हात दिला, कोलंबस फार सुस्वरूप होता. त्याची मुद्रा कांतिमान आणि 
भव्य असे, ती पाहून अक भीमेत तरुण विधवा छ्ली त्याच्यावर टब्ध 
झाली आणि लग्नाची अठाठेव न करतां तीं दोघें नवराबायको म्हणून 
खु्याळ राहूं लागली. ग्रहस्थितींत जरी अशा रितीर्ने फरक पडला तरी कोलं- 
बसाचा मूळचा “यास कांहीं सुटला नाही. अटलांटिक महासागरांतून पश्चिभ- 


वकर. १ 


कोडंबस 


हा क. "२ 47% »'७ »'% ४7% '> “/”% ४£% ४७ 4के. & ७ / क &99. ४४१७. 47०७ &७ ७७ 70७ "७ & अहे च? २ च हक ४2७ ७ २ २ ४” “7: /. ४५७ ८ च ८” &७. &”७ 


कडे जात राहिलें तर आपण दशोवटी हिंदस्थानास जाअन पोाहचं ही आपली 
कल्पना तो अनेकाना सांगत राहिला. होतां होता टोलळेडो येथील महो- 
पाथ्यायाच्या कानीं त्याची हकिगत पडली, हा अपाध्याय फार मोठा विठान्‌ , 
बहुश्रत आगि चतुर होता. त्याने कोळेबसाला बरोबर घ्रेतळें आणि राजाची 
व त्याची गांठ घाळून दिळी, राजा तरी एकटा काथ करणार? त्यांने विद्वान्‌ 
लोकांची अक परिषद बोळाविळी आणि या परिषतेत कोलंबसाच्या बोल- 
ण्यावर चचा सुरूं झाली, 

परिषदेचे सभासद असेतसेच होते. आपण या'ची परीक्षा पहावयास 
जमलां आहोंत असें त्यांना वाटत होते. कोणी म्हणाळे ह्या पैसाकाहू 
माणूस आहे, कोणी म्हणाले ह्या भोळा आणि वेडगळ आहे. तिसरे कोणी 
म्हणाले हा अन्नाला मद्दाग झालेला असून पोळी पक्‍्वाबयास पहात आहे. 
परंतु त्याच्याकडे लक्ष न देता कोलळेपसाने आपले म्हणणें परिषदेपुढें 
माडलें. भौतिकशा&ह्लनं आगि अध्यात्मविद्या हीं त्या काळीं अकमेकापासून 
अलग झालेलीं नव्हती, प्रत्सश्नाने जे खरे असेल तेसुद्धा जर घर्मशासत्रांशी 
ब्रिसंगत असले तर लोक ते खोटे मानीत, जे बायबलात किंवा त्यावर्राल 
माष्यात असेल तेंच फक्त खरे असे लोक समजत असत, अथांत्‌ * पृथ्वीचा 
गोलाकार, गोलाकाराऱ्या ६सर्‍्या बाजूस असणारे प्रातिपादाति (अँटिपोडिझ) 
इत्यादि शाब्दप्रयोग येऊं लागले तेव्हा परिपदेंतील सभासद ' पास्वबंड ' 
६ चाखंड * म्हणून गिळला करूं लागले, मार्गे एकदां असाच प्रकार झाल! 
होता. पृथ्वी गोल आहि असे प्रतिपादन कानांवर येतांच सत्पुरुष लाक्‍्त- 
नियस उसळून म्हणाला कीं, “ तुम्हीं काय वाटेल तें बोलतां काय! ञ्यांच्या 
पायाचे तळवे आमच्या तळपायांकडे आहेत असे मानव प्राणी पृथ्वीबर 
आहेत £ मग त्यांच्या टांगा जामिनीला चिकटून डोकीं मात्र अरफाटी 
लोंबत नसतील काय ? प्रथ्वावर असा प्रदेश असेल तरी काय कीं जेथें 


र (१ (श्‌ १ 


कोलंबस 
अवघ्या वस्तु * खाली डोके वर पाय? अज्ञा आहित ? जेथे झाडांच्या 
मुळ्या वर भर्मीत आहित ? पण फाद्या मात्र खालीं अम्तराळांत लोंबत 
आहेत १ जेथे गारा व पाझ्स वर पडतो ? खरोखर, या सव वेड्या कल्पना 
दुसऱ्या एका वेत््या कल्पनेतून निघाल्या आहित आणि ती वेडी कल्पना 
म्हणजे प्रश्वी गोळ आहे असे समजणे ही होय, हे नवमतवादी लोक अगोदर 
अक चुकीचे प्रमेस पुढें मांडतात आणि मग त्यांतून असल्या कुकल्पना 
बाहेर पडतात. लाक्‍्तनिअसर्चे हे राब्द या परिषदेतील लोकानी उद्‌धत केले 
आणणे कोलंबसा'ची थट्टा अडविली, 

कोणी म्हणाले, “' ही प्रतिपादातीची कल्पना सर्वथा अग्राह्य होय. ती 
मानिली तर आदामपासून अवघी मानव जात जन्मली हा बायबल-प्रणीत 
सिद्धांत खोटा पडतो, जर ते आदामचच वबंदाज तर ते तेर्थे गेळे कसे १ 
अवढा अफाट समुद्र त्यानीं अठंघिळा कसा ? अथोत्‌ मूळात ते नसलेच 
पाहिजेत, ?' कोणी “' मूले कुठारः ” या न्यायार्ने म्हणाळे, “' अगोदर 
पृथ्वी गोळ आहि हेंच खोटे आहि. कारण बायबलांत स्पष्ट म्हटलें आहे की, 
हें नॉलवरणे आकादा परथ्वीवर तंबूप्रमाणें आहे. मग आकाठदा जर तंबू तर 
त्याच्या खालची पथश्वी ही एक विस्तीर्ण सपाट सतरंजीच नव्हे काय १ '? 
कोणी म्हणत, “' पृथ्वीचा गोलाकार व प्रतिपादातींचे अत्तित्व खरे घरले 
तरी हा कोलंबस उष्ण कटिबरवात जाझन जगणार कसा १ २? कोणास चिता 
पडली को, जी सफर निदान तीन वर्ष चालवावी लागणार तीत हा अन्न- 
पाण्यावांतून मरणार नाही काय ! शेवटी अका चवुर श्रोत्यार्ने विचारले की, 
£ समजा, तुम्ही हिंदुस्थानास पोचला, तरी पण पोंचलो म्हणून सांगण्यास 
तुम्ही परत कसे येणार ? तुम्हीच म्हणतां पएरथ्वी गोल आहे; अथीत्‌ इकडून 
तिकडे जातांना तुम्हांला उतरणच लागेल व सफर सहज होईल; पण 
तिकडून परत फिरल्यावर तुम्हांस सारखा 'चढच लागणार, मग या अखंड 


: (५६ 


कोलंबस 


१» ५५८५५०५०८७... /८५८०.५.५.५०८०./५/०/०८०/८५८-८०./०-०-०.०५१/ २५.५ /१५./५/./-८/./-०/-८०५-”/५१////»/:“« ”"///-.//€>» «”/>./.”.”/"/../५.०/-०१../८./-/-./८-/--:/.“>“.“«. 


चचढानें तुम्ही परत कसे येणार १” हा बिनतोड कोटिक्रम ओकून तेव्हांचे भोते 
कोतुकार्ने स्तिमित झाले कीं, आपल्याचपेकीं एकाचे अज्ञान पाहून ओझा- 
ळले याची नोंद इतिहासांत नाही ! पण मागे मागे जाअन प्रस्तुतच्या 
अत्क्रान्त कल्पनांची बाढ तपासली म्हणजे ज्ञानाची गति किती मंद आहि 
हे लक्षांत मरून आपल्या बुद्धीस गंभीथ प्राप्त होते. या गोंधळांतसद्धां 
कांद्दीं आपाध्याय खरे चिकित्सक होते. त्यानीं त्यांचें म्हणणें खरें आहे असे 
ठरविलें व त्याप्रमाणें ब्रादशहास कळविर्ळे. पण बहुमत मात्र विरुद्ध होतें. 

इकडे पंडितांची चर्चा चालूं होती तर राजा तिकडे आपल्याच घाईत 
होता. अथात्‌ कोलंबसाला ग'प बसावें लागलें, पण घरीं बसून तरी काय 
फायदा ? असें वाटून कोलंबसहि लढाईवर गेला, दोन वर्षार्नी पुन्हा सारे 
स्थिर स्थावर झाळे आणि पुन्हा सभा, पुन्हा चचा सुरू झाल्या. तथापि 
पंडितांचे मत कोलेबरसाला अनुकूल पडेना, दोवटी ता अगदी अंबून गेला 
आणि त्याने स्पेनची राजधानी सोडली, कोलंबस राजाच्या दरबारांतून 
विन्मुख जात आहे हें जॉनपेरे या महाधिकाऱ्याला पसंत पडलें नाही. तो 
राणीसाहेबांना भेटला आणि म्हणाला की, ' अवढा थोर संशोधक आपण 
परत दवडणें बरोबर नाहीं, ) पेरूचे म्हणणें राणीला अकदम पटले, राणी 
व राजा हीं दोघेहि राज्याची मालक दोती आणि म्हणून कोलंबसाला मदत 
करावी कीं काय हें राजेसाहवेबांना विचारण्याची जरूरी तिला नव्हती, माणूस 
घाडून, परत निघालेल्या त्या कोलंबसाला तिने बोलावून आणलें आणि 
दरबारांतून सरबराइ झाली नाहीं तर मी माझे दागिन गह्ाण ठेवीन आणि 
कोलंबसाच्या सफरीचा खर्‍्च भागवीन असें ती निकराने बोलली, राजानें 
रूकार दिला आणि कोलबसाचची तयारी झाली. 

राजा आणि कोलंबस यांच्या ठरलेल्या अटी ध्यानात ठेवण्यासारख्या 
आहित, कोलंबस जे देश आणि समुद्र शोधून काढील तेथील सर्व सत्ता- 


५ (१७ : 


कोलंबस 


&% . ५ २.४७ ४७ “0 ८0% “क -% “७ “०७ 79 % “७. जक 2. “* “४ “* /* /% 0६ 0७ शब < “टा. 7२ “४५ “४ “७ १७ 70 हॉक 4*५ /४७ “0४ “४ ९.१५ “७ “0.७७. ८४७७ &च र 


घिकार कोळंबसाला असावा व त्याच्या मागून तो त्याच्या कुळांत रहावा 
नवीन सांपडलेल्या भूमीवर त्याला राजाचा प्रतिनिधी म्हणून समजण्यांत 
यावे; त्या देशांत हाणारे अप्तन आगि चालणारा व्यापार यांवरील नफ्या- 
पेकीं दहावा हिस्सा कोलंब्रसाला मिळावा; त्या प्रदेशातील लोकांशीं जर 
कांही तंटे झाले तर ते तोडण्याचा अधिकार कोलंबसाकडे रहावा; यापुढे 
आणखस्तरी कांहीं सफरी कोळंबसानें केल्या तर लागणाऱ्या स्वचोपैकी आठवा 
हिस्सा कोलंबसाने द्यावा; पण जर या सफरीतून कांहीं नफा झाला तर 
त्याचाहि आठवा हिस्सा त्याला मिळावा, इ. स. १४९२ ओऑप्रिल ता. १७ 
या दिवशी राजाराणींनीं या करारपत्रकावर सही केली आणि पाश्चिमिकडे 
जातां जातां आशियांतील ता्तरी प्रदेश कोळंबसाला लागेल या समजुतीने 
त्यांनी तार्तरीच्या बड्या ग्वानाला पत्र लिहिळें व पेलोस ब्रेदराच्या अधि- 
काऱ्यांना आशापरत्रे घाडलीं की, कोलबसाबरोबर द्यावयाची जहाजें आणि 
पाठवावयाचे खलाशी यांची लवकर तयारी करावी. 

गोळा केलेळे खलाशी कोलेंबसाबरोबर जावयास अगदी नाखूष होते. 
कारण अटलाटिक महासागर म्हणजे पाताळांत नेअन सोडणारी अक वाट 
आहे असा त्यांचा समज होता. पण राजाचीच आज्ञा झाल्यामुळें नाअि- 
लाज होअन ते जावयास तयार झाळे, कोलंबसाला स्वतःला सुद्धां आपण 
परत येअंच येअं अशी खात्री नव्हती, म्हणून त्याने उग्पाथ्याला बोलवून 
आणून त्याच्यापुर्ढे पातकाचा अच्चार केला, अथात्‌ दुर्यम तांडेलांनी 
आणि खलाश्शांनींही मरणापूर्वी करावयाचा हा विधी अरकून घेतला, आपली 
ही माणसं परत येतील कां नाही. अश्ली शका असल्यामुळें या लोकांच्या 
नांतेवाअिकांचे थवेच्या थवे समुद्रकाठी जमा झाले, त्यांसी मनांतून राजाला 
शाप दिला आणि रडत भेकत त्यांना निराप दिला. नशिबाला हात लावून 
आणि बायकांपोरांकडे गोवटचे पाहून खलाळीहि आपल्या कामाला लागले 


2 जट ४ 


कोलंबस 


कोळूंबस आणि त्याचा मदतनीस पिंझो यांना मात्र खरा हुरूप वाटत होता. 
१८ वर्षे झाली; कोलंबसाच्या मनांत जें करावयाचे होतें तें होण्याचा योग 
आज जमून आला होता. नवी भूमि शोधून काढीन, पुष्कळ पेसा मिळ- 
वून आणीन आणि मोठमोठ्या फोजा अभ्या करून ख्रिस्ती धर्माचे जें पावित्र 
स्थान जेरूसलेम ते मुसलमानांच्या तावडीतून सोडवीन हे वेड त्यानें घेतले 
होते. तें खरें ठरण्याचा संभव आज अप्तत्न झाला, इ. स. १४९२ त 
ऑगस्ट ३ या दिवशीं कोळंबसानें आपलीं जहाजे हांकारलीं. 


सप्टेंबर ९ ला पोरठुगीझ लोकांचे फेरो बेट त्याला लागलें, याच्यापुढे 
नावाडी लोक कधीं गेले नव्हते. तेथून पुढची सफर सुरूं झाल्यावर खलाशी 
लोक ग्वचल्यासारखे दिसू लागले, फेरो बेट लांबूनहि दिसेनासे झालें आणि 
त्याना वाटूं लागलें की, आपण आतां आपल्या ब्रायका पोरांना स्वास मुकलो. 
ते र्ड लागले, कोलबसानें त्यांची पुष्कळ समजूत घातली; थोल्याच दिव- 
सानीं आपल्याला अका सुंदर भूमीवर पाय ठेवतां येईल, तेथील हवा अति- 
शय मजेदार आहे, पशुपक्षी सुंदर आहेत, जमीन सुपीक आहे, झाडें फळा 
फुलांनी लटकलेलीं असतात आणि नद्यांच्या वाळवंटातून हिंडतांना जसें 
शिंपले वेचावे तसे सोन्याचे गोळे आपल्याला तेथे अचलतां येतील; असें 
प्रोत्साहनाचे शब्द कोलंब्रस त्यांना सागू लागला. पण ते म्हणत, “' महाराज, 
हॅ सारे खरे, पण प्रथम आपण जगर्लो पाहिजे ! आगि तें जगं असें आम्हांठा 
वाटत नाहीं. ?” अकेदर तीन जहार्जे होतीं, सवांच्या कर्णघारांना हुकूम 
होते कीं थेट पश्चिमेच्या रोखाने चालावयारचे. जमिनीपासून आपण फार 
दूरवर गेलां नाहीं असे खलाशांना भासवावे म्हणून कोलंबसानें राज संच्या- 
काळीं झालेल्या प्रवासाचे आंकडे लावावयाचे दोन फळे तयार केले, अक 
आपल्या स्वतःसाठी आणि दुसरा बाकीच्या लोकांसाठी, खरा आंकडां ता 
आपल्या फळ्यावर लिहून ठेवी आणि खोटा भ्हणजे कमी मेल दाख- 


४१ (५१९ 


कोलंबस 


याजवर ॒गा्ा््काय मम्मा अह्हामगाजडबाब॒॒॒डाआबाबयुबबाब॒कवाबबम्ककुिब्॒बल्बगब्गटु बरम्् मुबब॒जशबगयाव वबा य हबया कीची * ८.० .» >» ९८५००८. >०-०४/००-९४८ >” “ -” >>>“ -“>“.“.* >> 


विणारा तो त्या दुसऱ्या फळ्यावर लिहून ठेवी. सप्टेंबर १३ ला होका- 
यंत्राची सळई सरळ राहीनाशी झाली, कोलंबसानें प्रथम हॅ कोणालाच 
दिसूच दिळें नाही. पण लवकरच सुकाणूंवाल्यानें तें ओळस्वलें. सळई 
वांकडी झालेली त्यांनी कधीं पाहिली नव्हती, त्यामुळे दिशाच फिरल्या की 
काय असे हे लोक अकमेकांत म्हणू लागले, कोलंबसाला ज्योतिपार्चे शान 
बरेंच होतें. नक्षत्र, तारा आणि होकायंत्र याचा संबध काय असतो हॅ त्याने 
त्या लोकांना समजावून सांगितर्ठे, पण समजण्याची कुवत नसल्यामुळें ते 
ग'प बसले आणि कोलेबसाचे आयतेच काम झाले ! काही थोड्याच 
दिवसात समुद्रावर फळे असलेल्या काही फांद्या त्यांना दिसल्या; तेव्हां 
खलाशी म्हणाले की, त्या जिकडून आल्या त्याच दिशेन आपण जार्वे; पण 
तो म्हणाला हिंदुस्तान तिकड सांपडावयार्चे नाही. आपल्याला सरळच 
पाश्चिमकडे गेळें पाहिजे, फाद्या भेटेनाशा झाल्या. दिवस संपला म्हृणजे 
रात्र आणि रात्र संपली म्हृणजे दिवस यावा असा प्रकार सुरू झाला, 
जमिनीचा मागमूसाहि दिसेना, वर आकाश आणि खालीं पाणी या दोनच 
गोडी त्याना दिसत होत्या, वारा चांगला वाहात होता आणि त्यामुळें जहाजे 
वेगार्न चालली होती. पण खलादाना ह्या वेगच आपला दातू वाटूं लागला, 
कारण वाऱ्याचा वेग जों जो जास्त तो ता आपण आपल्य़ा घरापासून 
अधिक अधिक दूर जातो असे त्यांना वाटूं लागले, वरे, परत वळण्याची 
सूचना करावी तर पाश्चिमिकडून वाराच येतां दिसेना, मग जहाजे पूर्वकडे 
जाणार कशी ! सुदैवानें एक दोन दिवसांत पाश्चिमिकडून वारा सुटूं लागला. 
मग कोलंत्रस म्हणाला की, आपल्याला जर परत जावयाचे झालें तर वारा 
नाही म्हणून निराश होण्याचे कारण नाही, 

तीन चार दिवस गेळे आणि' दोन्ही दिशांचा वारा अगर्दी बंद पडला, 
लाटा बंद झाल्या आणि जहार्जे जेथल्या तेथें अभी राहिल्यासारग्वी झाली, 


६6%. 


कोलंबसं 


लोक म्हणू लागले की, आपण अकाद्या अथळ समुद्रांत येअन अडकलो 
असांबे., कोलंबसाने लागलीच नागर टाकला आणि समुद्र कितीतरी खोल 
आहि हें त्यांना दाखवून दिलें, दुसरे दिवशी वारा पुन्हां सुरूं झाला, लाटा 
अठूं लागल्या आणि जहाजे पुन्हां वेगानें चाळू झाली, दिवसांमार्गे दिवस 
गेळे पण जमीन कोठे दिसेना, खलाशी लोक अकमेकांत तक्रार करूं लागले, 
“ राजानें हा कोठला भुरटा परदेशी जवळ केला आणि स्वदेशच्या माण" 
सांच्या गळ्याला दावे लावून तें त्यांच्या हाती दिलें? अशी तक्रारजो तो करू 
लागला, “' लोक चांगले सांगत हाते की, हा अक अडाणटप्पू भटक्या 
आहे. पण तें राजानं अकळे नाही आणि आतां आमच्या जिवाला तात 
लागली आहि, आम्ही याचे आतां कां एकावें १ ” दुसरा म्हणे, “' खरेच 
आहि. परत फिर म्हटळ तर हा एकत नाही. ?' तिसरा म्हणाला, “' हा बऱ्या 
बोलाने ऐकळस दिसत नाही, त्याला जरा चुणकच दाखविली पाहिजे, ?' 
शेवटी कांही लोक बेफाम होझन त्याला म्हणाले, “ आतां जर तू परत 
फिरला नाहीस तर तुझे हात पाय बाघून तुला समुद्रात फेकून देऊं, नाह्दीं 
तर परत फीर, 

- अकदां पिझोच्या हातून चूक झाली, सगळ्याच्या पुढे त्याचें जहाज 
चाललेळं असे, रात्रीच्या वेळी दूर अन्तरावर ढग पसरलेले होते. पण ते 
जमिनीसारखे दिसले, सवाप्रमाणें पिझोही अतावीळ झालेला होता म्हणून 
६ जमीन * “ जमीन ! असें ता मोठ्याने ओरडला, पण सकाळ झाल्यावर 
पहातात तों ते केवळ ढग आहित असें त्यांना दिसलें, अर्थातच खलादांर्च( 
दारुण निराशा झाली, ऑक्टोबर ७ च्या सुमाराला पक्ष्यांचे थवे अडत 
जातांना दिसले, सध्याकाळ आहे तेव्हां पक्षी आपल्या घरट्यांकडेच जात 
असले पाहिजेत असें पाहून कोलबसानें त्याच दिशन जहाजे वळविली, तीन 
दिवस या नादांत गेले, चोथ्या दिवशीं फळे असलळी एक झाडाची फांदी, 


£ ६१ 


कोलंबस 
नक्षी केळेठी अक काठी आगि समुद्रतीराच्या आसपास सापडणारे मासे अशा 
वस्तू त्याना दिसल्या, कोलेत्रसानें हेरळे की, आता जवळपास कोठें जमीन 
असलीच पाहिजे, त्याच दिवशी रात्री दूर अन्तराबर त्याला दोनदां झजेड 
दिसलासा वाटला, अग्राच वोभाटा न करतां त्याने अकदोघांना न्याहाळून 
पहावयास सागितले, तेहि म्हणाळे की, अजेडच आहे. पण ते सारे गप्प 
बसले, रात्री दोहोंच्या सुमाराला आघाडीला चाललेल्या पिटे जहाजावरून 
बेदुकीचा कडाडून बार झाला, जमीन दिसली तर असा बार करावा असे 
ठरलें होते. धार अकताच सगळे लोक ताडकन अभे राहिळे आगि जमीन 
जमीन असा जयघोष त्यानीं केला, जमीन तर आहेच आहे पण तीवर 
दिवेहि आहित म्हणजे माणसाची वस्तीहि तेथें आहे हें मनात येअन तर 
लोक केवळ हर्षभरित होअन गेले. 

तांबडे फुटले आणि जमीन स्वच्छ दिस्‌ लागली, समुद्रकांठ संपल्यावर 
हिरव्यागार जमिनी पसरल्या आहित, त्यांच्या पलीकड झाडांच्या गर्द राया 
लागल्या आहेत आणि दूरच्या टेकड्यावरील अतरणींवरून पाण्याच खळ- 
खळाट वहात आहित असा देखावा त्यांनी पाहिला, लोक आनंदानं ब्रेहोप 
होअन गेले, 

कोलबसालाहि अकदम नवा हुरूष आला, आतांपथत तो| बाह्यात्कारी 
धीर दाखबीत होता. परंतु दिवसामागे दिवस गेले तरी जमीन दिसत नाही हें 
पाहून त्याचाहि धीर खचू लागला होता. त्याला मुख्य काळजी ही होती का, 
निराश झालेले खलाशी कदाचित्‌ बेड करतील आणि जबरदस्ती करून 
जह्वाजे परत घराकडे बळवतील, पण आतां भूमि दिसू लागतांच त्याचे ते 
भय आणि काळजी अकदमच नष्ट झाडी आणि आपण केलेठें भाकित 
अखेर ख्वरे ठरत आहे हे पाहून तो केवळ दृर्षमरित होअन गेला, त्यानें 
छृतशता-बुद्धोने आकाशाकडे पाहिलें आणे त्याच्या डोळ्यांतून अश्रंच्या 


£ ६९ :! 


कोठैबस 


धारा वाहूं लागल्या, त्याने आतापयेत फार अपमान सोसला होता; लोकांनी 
त्याची अबहेलना केली होता आणि केवळ थ्येयवादासारठी त्याने सारा 
जन्म दारिद्यात घालबिला हे!ता, लोकानी आपल्याला लबाड, पैसेकाढू, 
भटक्या अशा रिव्या दिल्या, याचे त्याला स्मरण होते; पण तेच आपण 
परमेश्वराच्या अका विशाल योजनेचे साधन होत आहे हे पाहून त्याला 
परा काचे समाधान झालें. खलाशांनींहि पाहिले की आपण जरी अद्वातद्वा 
बोलली असलो तरी आपला कप्तान खरा खरा मोठा मनष्य आहे, अथात्‌ 
त्याना पश्चाताप होझं लागला आणि त्यानीं त्याच्यापुढे लोटागणें घातली. 
ज्यांनी त्याला आतांपर्यंत शिब्या दिल्या होत्या ते आता त्याचा जय- 
जयकार करू लागले, 

सूब-प्रकाशाची काति बेटावरील वस्तुजातावर पसरली आणि तें 
अधिकच शोभिवन्त दिसू लागलें आगि मग सवांनी आपापले पोघराख 
घातळे, कोलंबस तर दर्यासारंगच होता. अर्थात्‌ त्याचा पोषाख 
त्याच्या वेमबाळा आणि दजीला साजेसा भरजरी होता. तो त्यानें घातला, 
कमरपट्टयाठा तलवार लाविळी आणि हातांत स्पेनच्या राजाचे निशाण 
बेझन तो जमिनीवर अंतरला, सर्वच लोकांनी त्या भूमीचे चुंबन घेतलें 
आणि मग गुडघे टेकून त्याना भक्तिभावाने परमेश्वराची प्रार्थना केली, 
जगाच्या इतिहासात जे दिवस फार महत्त्वाचे “हणून समजतात त्यातच या 
दिवसा'ची गणना केळी पाहिज; कारण आज अका नव्या विशाल भूमीचा 
शोध लागलेला होता; अटलाटिक महासागर म्हणजे सैतानाचा प्रदेश नव्हे 
आणि त्यांतून पुढें जाणारे पाताळाच्या दरीत अतरत नाहींत ह तिद्ध झालें 
होते. अका नव्या युगाचाच अनावरण विधि झालेला होता आणि तो 
कोलेंबसाऱ्या हस्ते झाला होता, असा हा अक भव्य प्रसग हाता. 

ज्या दिवर्शी पहिली आगगाडी चालूं झाली असेल, बिनतारी संदेश ज्या 


: ६३२ ! 


*४*०»/«/ ०4५५८.“ “र “>>. “> /“» >.“ >. «7 की >>“ &»> ८ न “ >“ /“€7/अ“<“</“/>.><>»/.“”“//“</“/.<> >. की “* -»// ९८2०“ /.//>* 


दिवशीं माणसाने पहिल्या दिवशीं ओकला असेल, तो दिवस विशेष मोलाचा 
असें आपण समजतो; पण तितक्‍याच मोलाचा हाहि दिवस होता. ज्या 
घरणीवर आपण फिरतो तिचा व्याप तरी किती आहे याचीसुद्धां कल्पना 
माणसांना नव्हती. कोणीकडे बर्फाचा खच तर कोणीकडे अन्हारची दाहक 
रणरण आणि कोणीकडे अफाट समुद्राचा तिमिरमय विस्तार अशा वेढ्यांत 
यूरोपांतील मनुष्ययोने सहखावाधि वर्षे सांपडलली होती; यामुळें पथ्वींचा 
विस्तार किती आहे याचीच कल्पना मनुष्य-प्राण्याला नव्हती. सध्यां आपले 
शास्त्रशा चंद्र-बिंबावर अड्डाण करण्याची गोष्टी बोळृत आहेत, पण चारपांचरा 
वर्षापूर्वी समुद्राच्या पलीकडे काय आहे हेसुद्धा आपणांस माहित नव्हतें. 
कोलेप्रसार्न छाती केळी आगि सृष्टाने तोपर्येत दडवून ठेविलली रहस्ये त्याने 
अधडकीस आणली. असा कोलंत्रसाचा महिमा आहे, 

किनाऱ्यावर अतरलेळे लोक अंच हेति, सुस्वरूप होते आगि गोरेपान 
होते. त्याच्या हातांत नानाप्रकारचा शास्त्रे होती. आगि त्यांच्या अंगावर 
शोभिवन्त वस्गामरणे होती. कांहीं अक विराप नवे घडवून आणल्याचे 
तेजहि त्यांच्या मुखांवर दिसत होतें. त्याच्याकडे बघून त्या भमीतील माणसें 
अगदी दिपून गेली, पहिल्या पहिल्याने ती त्यांच्या जबळच येईनात. 
कोलेब्रसाला वाटत हाते की, आपण हिंदुस्तानात आला आहोंत. कारण 
हिंदुस्तान पूर्व दिहाला आहे आणि अटलांटिक महासागरांतून थेट पश्चिम- 
कडे जात राहिलें म्हणजे केव्हां तरी आपल्याला ह्या देश लागेल अशी खात्री 
त्याला वाटत होती, अथीतच हें हिंदुस्तानच अशा दृष्टीने तेथील सर्व गोष्टींचा 
अर्थ ता बसव लागला, तेथील पक्षी त्याला फार सुन्दर आणि तेजस्वी 
दिसले आणि तो मनांत म्हणाला, हं हिंदुस्तानच असलं पाहिजे ! तेथील 
हबा त्याला मोठी मजेदार आणि हुरूप आणणारी वाटली आणि तो मनांत 
म्हणाला ह हिंदुस्तानच असलें पाहिजे, या हवेला मसाल्याचा वास येत 


-- ६४ -- 


>हळ 4०..&ळ ४6. 59. 4४%, .अव्क 4 “कभ.&8>. अय, आ. आदा आक, आ, अक “जाळ / जाडे, आहो......> “आ, /किक-अीळ आळ. अय ाळ. /ी, /मळ “आ, “के. &ओो. आळ. आहे. आक. आ. आक. आळे अक अळ अ “0 “क हक अ क कळ »% 2०... 0 ० ७ ““ & क. ल 2९ “2. 20. “० र. ७०, या. क% ४69: “वीन... :6/ण..:09 69 6. व, “ळक. 9.7) क्काम. ककी 


आहे असेहि त्याला वाटले आणि म्हणून तो म्हणाला, हे हिंदुस्तानच 
असले पाहिज |! परन्तु आपल्याला माहित आहि को हे हिंदुस्तान तर नव्ह 
तेच नव्हते; पण खुद्द अमेरिका खंडहि नव्हते ! अमेरिका खंडाच्या आस- 
पास अलीकडे असलेले हे अक बेट होतं. या बेटाठून अमेरिका खंडावर 
जाऊन, तें ओलांडून, पुढें पसरलेला विशाल पॅसिफिक महासागर ओलांडून, 
यवदीप, मलयद्दीप ही मार्गे टाकून, सहखावबाधे योजनेपुढे गेल्यावर मग 
हिदुस्तान देश लागणार आहे अर्से जर त्याला माहित असतें तर हे सफरीचं 
काम त्याने हातीं घेतलें असते असे वाटत नाही, पण अटलाटिक महा- 
सागर आलांडला की लगेच हिंदुस्तान लागते आणि अटलाटिकचा विस्तार 
फार थोडा आहे असा त्याचा समज होता, म्हणून त्यानं ह्या साहसाला 
हात घातळा., पण या त्याच्या अश्ञानामुळेच माणसाच्या जातीला प्र्श्वीचें 
नवे ज्ञान झाले. 

त्याचे काही लौक आतील प्रदेशात गळे आणि तद्दशीय माणसाचा 
रूपे त्यांसी पाहिळी, हे लोक फार सभ्य आणि समजस दिसले. यातल्या 
कांही लोकाच्या तोंडांत पानांच्या पेटविलल्या सुरळ्या होत्या. या 
सुरळ्यांतन तोंडात येणारा धूर हवे लोक मोजेने बाहेर सोडीत असत. हीच 
ती सध्याची तेब्राखू होय, मग कांठाकांठांने हिड़न त्याने त्या स्थळ-विशोषाना 
निरनिराळी नावें दिली. प्रदेशात शिरल्यावर य्या सोन्याची त्याला 
अवढी हाव सुटली होती ते सोनेंहि त्याला येथे मुवळक सापडे लागलें, 
कोलंबसाने बरेच दिवस या ठिकाणीं घालविळे आणि मग नवी भूमि शोधून 
काढल्याचे हे शुभ वर्तमान फर्डिनेड आणि इझाबेला यांना सांगण्यासाठी आतां 
आपण परत स्पेन देशाला जावें असें त्याने ठरविलें, पण कांही झाले तरी 
हें हिंदुस्तान नव्हें हें त्याला कळून चुकले असले पाहिजे, हिंदुस्तानांत सोनें 
रगड आहे असें त्यानें ओकलें होते आणि सोम्यापुरतेंच पाहिलें तर त्याचा 


ज,.प्र,५... “ण ६५ -ा 


७“ ५४ नळा नन्ही “>> »/”“शाशा्ना्न की “ळू “गा, >>> कळ “4 अ/://>/“न7“ *“ “>. ५» “शा >> नग» >/.>//“/ “रा <<“ ७ ७ कहो 


२ 


अन्दाज बरोबर हाता. पण हिंदुस्तान देशातील माणसे फार सुसंस्कृत 
अहित, तेथे मोठमोठी साम्राज्ये अदयास आलीं अहित आणि तेथे कला- 
कोगाल्ये बाढीस लागलेली आहेत हेहि त्याने अकले होतें. त्यांतळे या ठिकाणी 
त्याला काहीच दिसळे नाही म्हणून हा देश हिंदुस्तान नसावा हे त्यानें 
मनच्या मनांत ओळखले असले पाहिज, परस्तु अटलांटिक महासागर 
ओलांडता येतो, पलीकडे अक विदश्याळ भूमि आहे आणि त्या भमीवर 
सोनेंहि खूप सांपडते अवढा शोधहि लोकविलक्षणच होता. अवबढ्यावर 
संतु होअन त्यानें परत फिरण्याऱचा निश्चय केला, 

परंतु त्याच्या कित्येक खलाक्यांना तें बेट इतके आडवले की आपण 
परत येत नाही अर्से ते म्हणूं लागले ! कोलबसाला याचे नवलच वाटलें 
त्याना राहण्यासाठी अक किला बाधण्याचे काम मग त्याने सुरू केर 
किल्याच्या भोवताली त्यांमा ओक खंदकही खणला आणि जवळचा 
बराचसा दारूगोळा व हत्यारे त्याने तेथे ठेअन दिलो. तेथे राहू इच्छिणाऱ्या 
होशी खलाशाना त्याने सांगितले को तुम्ही नीट तरतूदीनें रहा, अथात्‌ 
कोलळंबसाला आणि त्या खलाश्यांना खासच वाटत होते कीं ही जहाजें घरी 
जाझन आपण पुन्हां परत येणार आहोत ! कोलबसानें तेथे बांधलेला किल्ला ही 
वसाहती'ची मूळ कल्पना हाय, मग बरेचसें सोनें, कांहीं सुंदर पक्षी, पांचसहा 
तद्देशीय माणसे आणि कांहीं चमत्कारिक वनस्पति बरोबर घेऊन कोलंबस 
परत निघाला, 

परतीचा प्रवास कोलंबसाळा फारसा सुखाचा गेला नाही, जामेनीवरचचा 
अजेड हा प्रथम आपल्याला दिसला आणि मागून कोलेंबसाला दिसला 
असा रांड्रेग बर्मेजा ? या अका खलाशाचा दावा होता. पण जमीन 
पाहिल्याचे श्रय कोलंबस घेणार हे पाहून हा रांड्रींग रुष्ट झाला होता. 
पिझो याच्याशी कांही तरी कारणानी कोलंबसाचे भांडण झाळे, आणि 


४ ६६ : 


कोलंबस 


शाक »“** क हक 209 4. ४ जद २५०७ //"७ ७, ७.४० 67७ 7२. // २. 4.४४” 4.४७ 40. £00७ “७ १. “च ४7 जळी 


तोहि दूर निघून गेला, समुद्रावर ठिकठिकाणी वादळें झालीं आणि आपण 
बुडणार असं कोलभसाला वांटू लागले, मग आपल्या सफरीचें वृत्त त्याने 
लिहून काढलें आणि तो कागद अका मेण-थेलीत बंद करून टाकला, या 
थेलीवर पुन्हां मेणाचे अनेक थर त्याने बसाविळे आणि ती त्यानं अका पिपांत 
घातली व या पिंपाचे तोंडहि त्यार्ने चांगळे बंद करुन तें त्याने समुद्रांत 
सोडून दिलें. कोलंब्रसाला वाटलें कीं जर कदाचित्‌ आपण बुडालो आणि 
हे पीप वहात बहात यूरोपच्या किनाऱ्याला लागलें तर आपल्या सफरीची 
सर्व हाकेगत आतील थेलळीतील कागदावरून तरी सवांना कळेल. सुदेवानें 
वादळहि शांत झाठे; आणि कोलंबसाचे जहाज येतां येता पोतुगालच्या 
किनाऱ्याला लागलें, 

कोलंबस परत आल्याची बातमी हां हा म्हणता सर्व लिस्बन्‌ राहरभर 
पसरली, याच माणसाला आपण धिःकारून परत लाविले होतें याची आठ- 
वण होझन राजा मनांत स््रजील झाला, तथापि त्याने कोलबसारचें स्वागत 
केळे, आणि त्याचा बहुमानहि केला, तेथून निघून कोलंबस स्पेनच्या किना- 
ऱ्याला गेला; आणि आपण परत आल्याची पत्रें त्याने फार्डनेड आणि 
इसाबेला यांना लिहिली, ही बातमी राजवाड्यांतून व्राहेर पडून मग सर्व 
राजधार्नाभर पसरली, दरम्यान आपल्या सर्व लवाजम्यासह कोलंबस/हि 
राजधार्नीत येअन प्रात झाला, राजाच्या इच्छेप्रमाणे राजवाड्याकडे 
त्याची मिरवणूक निघाली, प्राचीन काळीं रोमन्‌ वीर पुरुप विजय मिळ- 
वून आलेला असला म्हणजे त्याची मोठी मिरवणूक निघत असे, पण ती 
मिरवणूक सुद्धां कोलंब्रसाच्या मिरवणुकीइतको डोलदार नसेल ! सवांच्या 
पुढें तिकडून आणलेले ते सहा इंडिअन्स चाललेले होते, त्यांची रंगविलेली 
अंगे आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून राजधानींतले लोक 
चकित होऊन गेले, या रानटी लोकांच्या मागून कोलवसानें बरोबर आण- 


: ६७ ! 


कोलंबस 
ळेला अनेक चित्रविचित्र पगुपश््याचे पिजर चाळले होते. त्याच्या मागे 
उंचावर ठेवळळे सामन्याचे मुकुट आणि सळकडी अशासारखे जिन्नस 
रथावर झगझगत होत. त्याच्या मागून घोडवावर स्वार होऊन आणि 
€पेनच्या राजाने निशाण हातात घेऊन कोलंबस मोठया एटीनें चालला 
होता, राजबाडधापुढे विस्तीण पटांगण होते, त्यावर राजाने आज आपला 


ऱ्य ब ॥षह,! | 


11 पश, 


आत अया णा 
। ॥ । री ह. | 


“क 
जज ॥. १९॥५॥/ ९८८. 


ह “१ रष ्ि 1 ह र भं री! 


द्रवार भरविला होता, मन्यभागा सिंहासन मांडून दोन्ही बाजूंच्या उच्चा- 
सनावर मोठमोठाले माडलिक, अमीर, उमराव, विडान्‌, शास्त्री, पंडित, 
धघमवत्ते असे लोक बसलेल होते. आगि भोवताली सहतस्त्रावाधे नागरिक 
उभे होते. कोलंबसाचची स्वारी पुढे येताच त्याच्या स्वागतासाठी राजाराणी- 


सह सवे समा एकदम उभी राहिली, राजाला अभिवादन करण्यासाठी 


: १८ $ 


कोलंबस 
कोलंबस गुडघे टेकणार तोच राजानें त्याला हात देऊन उभें केळे, सर्वच 
लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्र बाहु लागळे, गळा दाटून आल्यामुळें 
कोलंब्रसाच्या तोडून शब्द निघेना, शोबटी आनंदाचा भार हलका झाल्यावर 
कोलंब्रसाने आपल्या मुखाने सफरीची हाकगत सभेला सांगितली. ती 
ऐव.न तमाम लोक खूप होऊन गेले, राजा-राणीरनें देवाची प्रार्थना केली; 
आगि कोळंबसावर पारितोपिकांचा व्षीव केळा, पूर्वी ठरवल्याप्रमाणे जो 
कोणी जमीन पाढहेल्याने पाहील त्याला आमरण वेतन मिळणार होतें. 
राजा[राणीने तें कोलंबसालाच दिले. परस्तु राड्रेगे याच्या अंगा'चा मात्र 
आतिशय संताप झाला, कारण ब्ेटावरचा उजेड आपण प्रथम पाहिला 
असा त्याचा दावा होता. हे सिरस्ती लोक बडे लुच्चे आहेत असे म्हणून 
तो त्या धमोतून उठून गेला आगि मुसलमान झाला, पण ही अक गोष्ट 
सोडली तर कोलंबरसाःची सफर पूर्णपणे यशस्वी झाली, रांडरिरचा दावा 
कदाचित्‌ खराहि असल पण दिवा पाहेल्यानें पाहिला ही गोए केवळ दाब्दा- 
थाने खरी असेल, बक्षिस दिवा पाहण्यासाठी नसळे पाहिजे ! बेट शोधून 
काढण्याचा मान निःसंशय कोळबसाचाचच होता. त्याने जर वीस वंबपयेत 
एकच ध्यास घेतला नसता, राजेरजवाऊ्याच्या दरवाजात साहाय्यासाठी 
गयावया केळे नसते; अंधाऱ्या समुद्रात जहाजे हाकारळी नसती आगि 
निरा झालेल्या खलाशांना दादावाब्रा करून सफरीचे काम दोबटपयत 
नेळे नसतें तर हा राषट्रिय्‌ अजेड तरी कोठला पहाणार होता ? असो, कोलं- 
बसा'चे जीवितकार्य या ठिकाणीं परिपूर्ण झाळें असेंच समजलें पाहिजे. ही 
सफर यशस्वी झाल्यामुळें कोलंबसालळा नवा हुरूप आला आणि राजानेंहि 
नव्या सफरीची तयारी त्याला करून दिली, अद्या चारपांच सफरी कोलेब- 
सानें केल्या. मात्र हिंदुस्तान देश त्याला सांपडला नाही हें शिल्लकच 
राहिले ! अटलांटिक महासागर ओलाडल्यावर त्याला अमेरिकेची केवळ 


: ६९ 


कोलंबस 
ठेंच लागली असेंच समजलें पाहिजे, परब्तु हें त्याचें कृत्याहे जगाच्या 
इतिह्ासांतील अद्भूत कृत्यांतच गणलें पाहिजे, 

परग्तु कोलंबसानें या अनेक सफरी जरी पुन्हा केल्या तरी पाहिल्या 
सफरातील त्याच्या हेवूचा उदात्तपणा या नव्या सफरीत दिसून आला 
नाही. एक महत्त्वाची गोष्ट आपल्या ध्यानांत येते, ती ही की हिंदु- 
स्तानाला जाण्याचा मार्ग जर त्याला शोधून काढावयाचा होता आणि ज्या 
बेटावर तो जाऊन पोंचला होता तें ब्रेट किंवा त्याच्या लगत पलीकडे 
असलेली विर्स्ताणे भामे म्हणओे हिंदुस्तान नव्हे हँ जर त्याला अनुभवाने 
कळून चुकले होतें तर या नव्या सफरींचा उद्देश हिंदुस्तानची व!ट शोधून 
काढणें हाच असावयास हवा होता, चार पांच सफरी झाल्यानंतर सुद्धां हे बेट 
किंवा अभेरिका म्हणजेच हिंदुस्तान असा त्याचा समज होणें किवा टिवून 
रहाणें सवथा अशक्य होते. युरोपातील लोकानी हिंदुस्तान प्रत्यक्ष पाहिले 
नसले तरी तो देश माणसांनी चांगला गजबजलेला आहे, तेथील लोक 
सुसंस्छत आहित, येथे व्यापार आणि कलाकोशल्य यांची वाढ झालेली 
आहि आणि तेथें मोठमोठाली साम्राज्ये आहेत या गोष्टी त्याच्या कानी 
गेलेल्या'च होत्या, हिंदुस्तानातील लोक रानटी असून अर्धनम्न स्थितीत 
हिडतात आणि तेथें सोन्याच गोळे सांपडतात अशी हिंदुस्थान देशाची 
माहिती कोलम्बसाच्या कानांवर खचित गेलेली नव्हती, ज्या बेटावर तो 
गेला त्या बेटावर त्याला हिंदुस्थानच्या खुणा सांपडल्या अर्से म्हणतां येईल 
काय ? एका खेपेला तों फसला असें जरी म्हटलें तरी तीन चार खेपा 
झाल्यावर हे हिंदुस्तान नव्हे असे त्याच्या ध्यानांत येझून चुकर्ळें असले 
पाहिजे आणि म्हणून आपला मूळचा उद्देश साध्य झालेला नाही हें पाहून 
तो साध्य करून घेण्यासाठी त्याने नवे प्रयत्न करावयास हवे होते. पण 
त्यांतले काहींच झालें नाही, केवळ एक नवी भूमि पायाला लागली आणि 


४4 ७० ५ 


कोलंबस 

चार सोन्याचे गोळे तेथे सांपडले कीं ताबडतोब परत निघावयाचे या 
उद्देशानें त्यानं हें साहस केलेलें नव्हते. असें जर आहे तर आणखी चार 
पांच सफरी करण्यांत त्याने कृतकृत्यमता कां मानली हे समजत नाहीं. 

बरें, ज्या फर्डिनेड आणि इसांबेला या जोडप्याने त्याचा मूळचा हेतु 
त्याच्या तोंडून ऐकला होता त्यांनीं तरी त्याला विचारावयास हें होते की 
समुद्राच्या पलीकडे तुम्हांला जमीन लागली हें फार बरें झालें; तुम्ही थोडेसे 
सोने घेऊन परत आला याचेंहि आम्हांला कोतुक वाटतें; पण पाश्चिमकडे 
जात राहिल्याने आपण शेवटीं हिंदुस्तान देशाला पोहूचूं ही जी तुमची 
मूळची कल्पना होती तिचें काय झाले १ तुम्ही ज्या जमिनीला जाझन 
लागल तेथील कांही माणसें घेअन तुम्ही परत आला; पण हीं माणसें 
रानटी आगि अंगाला रंग लावून फिरणारी दिसतात; आणि आम्ही तर 
ऐकत आलों आहो कीं हिंदुस्तानांतील लोक अतिदाय सुधारलेळे आह्दित. 
तुम्ही पूर्व दिशचा शोध लावगार म्हणून तार्तैरी देशाच्या राजाला देण्यासाठी 
आम्ही कांही पत्रेहि तुमच्याबरोबर दिली होतीं त्यांचे काय झालें १ तुम्ही 
ज्या भूमीवर जाझून पोहोचला ती भूमि म्हणजे तार्तरी नव्हे हेंहि तुमच्या 
*यानांत आलें असेलच; तर मग तुमच्या मूळच्या हेतूचें काय झालें ? तुम्ही 
पुन्हां तिकडे जाऊं म्हणतां तर आम्ही तुमची तरतूद करून देतो; पण तुमचा 
मूळचा हेतु साध्य करण्यासाठीं या नव्या सफरी तुम्ही काढल्या पाहिजेत, 
फर्डिनेड आगि इसांबेला यांनी कोलेंबसाला असे प्रश्न खासच विचारले 
असले पाहिजेत, निदान विचारावयास हवे होते. 

फर्डिनण्ड आणि इसाबेला यांचे अक वेळ असो; पण दरबारांतील ज्या 
लोकांनी कोलंबसाची थट्टा केलेली होती, त्याला हरतऱ्हेचीं नांवे ठेवलेली 
होती ब त्याला साहाय्य करूं नये असा निकाल दिला होता ते लोक केवळ 
पांचसह्ा रानटी माणसें आणि सोन्याची सलकडीं अवढी फलश्राति पाहून 


* ७९१ : 


कोलंबस 


कळ” ७-७०७.४” ७.८७ १७७८४ क. "क. ७ के 4 चक्क ४७ ७ »/७ फेक? ७ /% किक के अर्क “०७ ५४७ शके /% शर अही.» शी ४४ ७/४..४१७४९१ ७४ ७-५ ७४१७४७ ८५ 47१७.” ७.७” १७८४ ४४७ ७४०४७७७ ७.८ % ५.४ २९ २.८० ०.» > २. ५.८२... 


गप्प बसले असतील असें वाटत नाहीं, राजाराणीला ऐकूं जाईल 
इतक्या मोट्यार्ने ते म्हणाळे असतील कीं, कोलंबस हिंदुस्तान देशाला 
जाझन पोचणार होता त्याचें काय झालें ! तार्तरी देशाच्या राजाला द्यावया- 
साठी जी पत्रें राजेसाहेबांनी त्याच्याबरोबर दिली होती ती त्यानें त्या 
राजाला दिली काय ? दे ळीक खासच असे म्हणूं ठढागळे असतील कीं जो 
उदात्त हेतु कोलवसानें मनात घरला आहे असे आपण ऐकत होतो ते| 
खचितच सिद्ध झालेला नाही, अथवा तो मूळांतन्च त्याच्या मनांत नसला 
पाहिजे ! पाश्चिमेकडील समुद्राच्या पलीकडे कांही बेटें आहेत किंवा अक 
विस्तीर्ण भूमि आहि द्दे इतर खलाशानीहि आधी सांगितलेले होते आणि 
ती खात्री होती म्हणूनच यानें त्या समुद्रातून जाण्याचचें साहस केळे, यार्‍ची 
कर्तबगारी एवढीच कीं हा प्रत्यक्ष तेथें जाअन आला आहे आणि खला- 
शानीं दिलेली माहिती खरी आहे एवढेंच त्यानें सिद्ध केळे आहे. पण 
येवढेच सिद्ध करण्यासाठी तो मुळींच गेलेला नव्हता. पाश्चिमेच्या रोखाने जाता 
जाता पूर्व दिशेला जाऊन पोहोचतां येते हा त्याचा सिद्धांत, तो हिदुस्तानला 
जाझन पोंचला असतां तरच, सिद्ध झाला असता आणि तो हिंदुस्तानाला 
तर मुळीच गेलेला नाही. मग त्याचे ओवर्ढे स्तवन कशासाठी ? 

असे वाटते की या सव इंका कुडंका तेव्हां उत्पन्न झाल्या असतील; 
पण कोलंबसाच्या बाजूचे लोक अवढेंच म्हणाले असतील कीं या दाका जरी 
खऱ्या असल्या तरी अका अंधाऱ्या समुद्रांतून त्याने मोठी साहसा'ची सफर 
केली आहि हें कांहीं खोटें नव्हे, पूवी माहित नसठेळी अक जमीनहि त्यानें 
शोधून काढली आहे आणि तेर्थ रगड सोनें सांपडतें होहि त्यानें दाखवून 
दिळें आहे. म्हणून आपण अवढ्यावरच सम्तुष्ट असावे आणि त्यांचा मान 
सन्मान करावा |! असो. 

कोलंबरसानें आणखी चार पांच सफरी केल्या हें वर सांगितलेंच आहे. 


2 रव्े ३ 


कोलंबस 


७९७० २.० 
वी 0 270५५ “09/७७/७०४७, ७८ ७८५४५४ “७४ ७४ ७.२७ ४५%.” ७४७. ७.५ छे. ७. ७७.०..४४०८//% २. २५% %े..४२.४७. ७.८१७.४७ ७.४ '%../ २.५७ /%. / ० ७  &%, ७ ०४,४४७, ७५४७” क ३.७ ७ ४४७८४ ७ 7७४0३. ७-४” ७७% & के 


या सफरींतून काय निष्पन्न झालें तें पाहिलें म्हणजे मन थोडेसे खिन्नच 
होतें. दरवेळीं तेथें जावें; नवे किल्ले बांधावे; तेथील लोकांना राबवून 
सोनें गोळा करावे हाचच उद्योग त्यानें सुरूं ठेविला, त्याच्या बरोबरचे 
ग्वलाशी तर मद्दादुष्ट होते. ज्याना घरच्या धरी काही करतां येण्यासारखे 
नव्हतें किंबा घरी आपण नकोसे झालो आहो असें ज्यांना वाटत होते ते 
अनेक ढोक नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याबरोबर तिकडेच जाझ 
लागले; कारण त्यांनीं अकलें होते कीं तेथे पुष्कळ मोकळी जमीन आहि, 
माणसें अडाणी आह्दित, त्याना लुबाडणे सोपे आहे आणि सोनेंहि पुष्कळ 
सांपडते. सोन्याच्या जोडीला कापूस गोळा करण्याचाहि हव्यास कोळंबराने 
घरला, अमुक दिवसांत प्रत्यक माणसाने इतक्या वजनाचे सोने गोळा 
करून दिलेंच पाहजे किवा इतके गडे कापूस वांभून आणून दिला पाहिजे 
अशी सक्ती त्याने आरंमिली, ज्याने आपे काम पुरें केळे आहे. यांच्या 
गळ्यांत खुणेसाठीं अक तांब्याचा पत्रा बांधण्याची पडत त्यानें ठेविली 
आगि सागितलेल्या कामांत कुचराई करतात म्हणून उरलल्या लोकांना 
ग्व टाशांकडून फटके मारण्याची व्यवस्थाहि त्याने केली ! वन्याने हा पायंडा 
घातल्यावर खलाद्यांनी केवढा प्रलय आरंमिला असेल याची कल्पना सहज 
करतां येओल. शिवाय हे खलाशी लोक तेथे अगदीच मोकाट सुटल 
आगि तेथील स्रियांच्या अंगाला हात लावण्यासहि त्यांनीं कमी केले नाही, 
तेव्हा त्या रानटांच्या ध्यानात आळे की गोरे गोमटे दिसणारे हे लोक देव- 
दूत नसून केवळ हेवानच आहित. 

कोलम्बसाचा अधःपात याहि पुढे गेला, त्याला वाटूं लागलें कीं येथले 
रानटी लोक धरून नेऊन युरोपांत विकता येण्यासारखे आडत; गुलाम 
म्हणून त्यांना कोणीहि विकत घेईल असा अन्दाज ब्रांधून जहाजे भरभरून 
त्यानें हे रानटी लोक आपल्या देशाला धाडले आगि राजाला कळविलें 


५: ७३ 


कोलंबस 


७०>.००/०-/-४/-//-/८>-/-.>-.-><>>“>/:“>>>-“_।“>--/->>->->.>.>.>7-.:>.“/->/--/->.>>..>..““-.>.>>>--.५>.५-”-.:“.//>.//८-:///८/->->०>->>/>..“> ८ 


कीं या लोकांची विक्री झाली म्हणजे ह्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा द्यावी. 
अर्से झालें म्हणजे यांचा व्यापार करून आपल्याला पैसाहि मिळेल आणि 
यांच्या आत्म्याचें तारणहि होईल, अशा प्रकारे आपला स्वाथ आणित्या 
रानटांचा परमार्थ ह्या दोहोंचा मेळ कोलम्बसानें आत्तम बसविला ! त्याच्या 
या योजनेप्रमाणे रानटी लोकांचीं जहाजे भरून देशांत आलेली पाहून 
इसांबला राणी मात्र अगदी चवताळून अठली; ती म्हणाली कीं, ' तुम्ही 
ह्या लोकांचा व्यापार कां मांडता ! ह्यांना तुम्ही परत न्या आगि आपल्या 
मुलांमाणसांत नेझन सोडा. दुर्देवाची गोष्ट अशी की कोलम्वसाच्या हातून 
गुलाभगिरीच्या य[ संस्थेची स्थापना व्हावी. परन्तु जो अितिहास झाला 
आहे तो पत्करलाच पाहिजे. हळू हळू लोकमत कोलम्बसाच्या विरुद्ध जाझं 
लागलें, तिकडे सांपडणारे सोने कोलम्बस दाबून ठेवतो, या बेटाच्या समुद्र - 
किनाऱ्यालगत वाटेल तितके मोतीं सापडते तेही हा गिळंकृत करून बसतो 
असे आरोप प्याच्यावर होऊ लागले. ख्रिस्ती केल्यानन्तर या लोकांची 
विक्री करता यावयाची नाही म्हणून हा तिकडील लोकाना ब्राप्तिस्मा देऊं 
देत नाही अशी तक्रार तिकडे गेलेल्या धर्मापदेशकांनीं चाळ केली. शेवटीं 
राजानें त्याला कामावरून दूर केळे आणि या नव्या भूमीचा कारभार 
पहाण्यासाठी एका नव्या ताडेलाची योजना केली, तिकडे जातांच या 
नव्या माणसाने कोलम्बसाला केद केलें, त्याने त्याला दण्डा बेडी घातली; 
आणि स्पेन देशात पाठवून दिले, त्याची ती दुरवस्था पाहून राणीला अति- 
दाय वाईट वाटले आणि पहिल्या सफरीचे त्याचे महनीय कृत्य स्मरून 
तिने त्याची दण्डा-बेडी काढून घेतली, 

पण अकन्दरीने पाहातां कोलम्यसाचची सद्दी केव्हांच संपून गेली होती. 
त्याला आतां कोणाचा आश्रय अरला नाही. राजाराणी मरून गेली आणि 
तो अगदी अघडा पडला. त्याला दुपारची भ्रांत पडू लागली, त्याचें वयहि 


४ ७४ * 


कोलंबस 


“// %-० २.० ७. ७ २ २ "**/%१ ५ च 


र. । ४९% .»'७.” ७४% २७८ % ७. ७८४ ७.४0 2” &7. 


बरेंच झालें आणि दारीराला अदाकतता येऊं लागली. कर्जाखालीं कपाळ 


ठिनत चालले, संघिवाताने शरीर आंखडून गेले, आपल्या मुलाला त्याने 
कष्टी मनाने लिहिलें की, ' मी शोध लावला म्हणून मला मोठें अिनाम 
मिळणार होते; पण मला अक कवडीहि [मळत नाही. मी केवळ अचा- 
पतीवर जगत आहें. वीस वर्षे मीं हाडांची काडे केली आणि माणसांना 
नवी प्रथ्वी दाखविली पण माझी म्हणून म्हणावयास अक अंगळभर 
जमीनसुद्धां माझ्यापाशी नाही, कोठल्या तरी भटारखान्यांत मी तुकडा 
खातो. आगि तो घालणाराला पेसे कोठले द्यावे म्हणून विवेचनेंत पडतो ! 

अदा आपत्तींत दिवस जातां जातां आपलें आटपत आल्याचे कोलं- 
बसाला दिसू लागलें, जवळ प्रत्यक्ष कांहींच नव्हतें. कागदोपत्री कांही 
थोडेसे होतें. त्याची त्यानें वांटणी करून ठेविली आणि सश्रद्ध मनाने 
परमेश्वराची करुणा भाकली., वयाच्या सत्तराव्या वर्षी म्हणजे इ. स, 
१५०६ मे महिन्याच्या वीस तारखेस कोलम्बसानें प्राण सोडला, 


४१ ७१५ : 


कॅप्टन कुकू 

कॅ"्टन कुक हा इंग्लंडात यॉर्कशायर परगाण्यांतील माटनरिन गांवी 
१७२८च्या २७ व्या तारखेस जन्मास आला, याचा ब्राप दोतावर मोलमंजुरी 
करीत असे, आपल्या सारख्याच एका गरीब कुळातील स्त्रीशी त्यान लम 
केळे, आणि दोघेही प्रामाणिकपणाने पोटाला मिळवून सुखासमाधानाने राहूं 
लागलीं. लवकरच, एका मोठ्या रदोतवाडीच्या देखरेखीचे काम या ग्रहस्था- 
कडे आले. कुक्‌ हा बापाच्या हाताखालींच नेहमीं इकडे तिकडे करीत 
असल्यामुळे त्याच्या दिक्षणाची हयगय*च झाली. तो चागला तेराचोदा 
वषांचा झाल्यावर, त्याला कारही उजळणी आणि हिशेब येऊं लागले. ता 
सतरा वपार्‍चचा झाल्याबर, बापाने त्याला, चार वर्षाच्या बालीने, वाणसोद्याचची 
आणि कापडचचोपडाची माहिती व्हावी म्हणून, सॅंडरसन या नांवाच्या 
व्यापाऱ्याच्या हवाली केळं. या व्यापाऱ्याला लवकरच दिसून आले की, 
मुलगा फारसा शिकलेला नसला तरी, हिशेत्र करण्यात आणि कामाचा 
निकाल लावण्यांत वयाच्या मानाने चागलाच पटाईत आहि. जवळच समुद्र 
किनारा होता. आणि त्यामुळें, नावाड कामांत गुंतलेले पुष्कळ लोक 
कुकच्या ओळखीचे झाले; आणि आपण करीत असलेल्या कामापेक्षा 
समुद्रावरर्चे कां्ही काम करावयास मिळालें, तर तें जास्त बरे, असें वाटून 
त्याने त्या व्यापाऱ्याचची रजा घेतली. 


कॅप्टन्‌ कुक 


»» > शो * 0८ “6 / क्ट शश “« कशी “>. 


१७४६ त वॉकर केपनीत तीन वपांचा कागद ठिहून देऊन प्याने 
उमेदवारी पत्करली: आणि तो समुद्रावर हिडू लागला, कंपनीच्या मालकाचे 
त्याच्याविप्या फार चागले मत झाले, १७४९ त एका जहाजाची दुरुस्ती 
करण्याच्या कामावर कंपनीने त्याला पाठविले; तेही काम कुकनें चोख 
बजावळें, तीन वषाची मुदत संपताच व्राल्टिक समुद्रात फेऱ्या करणाऱ्या 
एका जहाजावर त्याने नोकरी धरली; आणि दोन वषात त्यानें याही कामांत 
प्रावीण्य संपादन केल, लवकरच मालकाने त्याला कॅप्टनची जागा देऊं 
केली, परन्तु कुकने ती पत्करली नाहीं. 

१७५५ त इंग्लंड आणि परान्स याचे युद्ध सुरू झालें, यावेळीं कुकचचे 
जहाज थम्स नदीवर होते. शकडो जहाजवाल्याना सरकारी नोकरीत येण्याच्या 
नोटिसा आल्या. कुक्या मनात, असली नोकरी करावयाऱची नव्हती; म्हणून 
तो दडून बसला; पण, हे उघडकीस आल्यावाचून रहाणार नाहीं, असे 
पाहून ता. आपण होऊनच आरमारखात्याकडे अजंदार म्हणून आला, 
६ हूगल ? नावाच्या जहाजावर त्याची नेमणूक झाली, कुकच्या कामातील 
दक्षता आणि ततप्तरता पाहून केप्टन हॅमर याळा मोठा संतोप झाला, अथा- 
तच हॅमरने वेळोवेळी त्याची बढती केली, 

पाराने वरच नाव कमावले आहे, असे पाहून त्याच्या मित्राना पाल- 
मेटच्या एका सभासदाकडून कप्तानाला पत्रे लिहविलीं की, कुकला एकादी 
मोठी जागा द्यावी, वास्तविक पाहता, असल्या शिफारशीची जरूरीच 
नव्हती, १७५९ त गालंड नांबाच्या एका जहाजाचा ता. तांडेल झाला, 
तेथून त्याची बदली मर्कयूरी जहाजावर झाली, हे मर्कक्‍्यूरी जहाज कॅनडा 
देशांतील क्‍्वेबेकच्या कामगिरीवर गेलें; आणि तेथें सेन्ट लॉरेन्स ग्रा नदीच्या 
पात्राची ठिकठिकाणची खोली पहाण्यांचें काम या जहाजाकडे आलें, कुक 
ह अतिशय हुषार माणूस आहे, हें कप्तानाला माहित झालें असल्यामुळे 


$ ७७७ ४ 


कॅप्टन्‌ कुक्‌ 
त्याने त्यालाच या कामावर नेमले, परेच लोकाना कळूं नये म्हणून, हे 
नदीवरचे काम रात्रीच्या वेळीं करणें भाग होते. पण कुकने इतके अव- 
घड काम रात्रीच्या अंधारांत इतक्या हिमतीने पार पाडले का, कॅप्टन 
वगेरे मंडळी बहोत खूष होऊन गेली, रात्रामागें रात्र हें काम चाललेले 
होतें, पण शत्रूंना यानें दाद लागूं दिली नाही, पण शेबटी शेबटी फ्रेन्चांच्या 
हें ध्यानात आठे; आणि त्याला पकडण्यासाठी कांहीं इंडियन लोकांना 
त्यानीं पाठावेळे, या लोकाची होडगी आता आपल्याला घेरणार, हे दिसू 
लागताच, कुकनें आपलीं नाव आइल ऑफ आरल्िम्सकडे वळवली; 
आणि जोराने से केलें. पाठीवर, त्या इंडियनाची होडगीं येतंच होतीं. 
शेवटी, जमीन दिस्‌ लागताच, त्याची नांव थांबण्याची वेळ आली तो 
नावेच्या मागल्या टोकाने ते इंडियन लोक त्याला धरण्यासाठी त्याच्या 
नावेवर चढले देखील ! इतक्यांत पुढल्या टोकाने कुकनें जामिनीवर उडी 
टाकळी आणि त्यांच्या तावडीतून तो निसटला, जयाचचें चिन्ह म्हणून त्या 
वेड्या लोकांनी त्याची नावच पळवून नेली ! 

आतांपर्यंत, कुकला रेखाकळेंची माहिती ब्रिलकूळ नव्हती. परन्तु, 
आपण पत्करलेल्या उद्योगाला, या कलेचे ज्ञान अवश्य आहे, हें पाहून, 
त्यानं फावल्या वेळी, तिचा अभ्यास सुरूं केला, आणि, हें शान पुरेसे 
हस्तगत केल्यावर, त्यानें सेट लरिन्स नर्दाचें एक मानवचित्र ( नकाशा ) 
तयार केलें. त्या चित्रांत कोठें किती खोली आहे, कोठें उथळ पाणी आहे, 
कोठें खडक आहेत, हे सारें बारकाईने दाखविलें होते. कुकचा हा नकाशा 
पाहून, वारिडांना नुसता संतोषच झाला नाही, तर आपल्या हाताखाली, 
एक फार बुद्धिमान, सचोटीचा कतेबगार माणूस आहे, याचा त्यांना नवाच 
प्रत्यय आला. 

सेंट लारेम्स नदी फार रुंद आणि लाब आहि, या सर्वच नदीच्या 


४१ ७८ 


कॅप्टन्‌ कुक 


५०८ ४७ ७ ४ ४£* २. 79 व 7२ /7१. शा 


पात्राची आणि त्य़ातल्यात्यांत क्वेवेकूच्या आसपासच्या टापूनचची पाहणी 
करण्याचे आणि त्याचें मानवचित्र काढण्याचे काम वरिपांनी त्याच्याकडे 
दिलें, हेंही काम कुकने तितक्‍याच कुरालतेनें आणि तडफेने करून दाखावेले, 
नकाशा तयार होतांच, कप्तानाने तो छापून घेतला, आणि मग आरमारां- 
तले सर्वच अधिकारी म्हणूं लागलें की, ' लोरेन्स नदीचे आतांपर्यंत झालेले 
सर्वच नकाशे आपण आता रद्दीतच फेकून दिले पाहिजेत.' 


म“. 


कॅनडा देश जिकल्यावर, अ्थातूच अञ्यांनीं ज्यांनीं महत्त्वाची कामें केली 
होतीं, त्याना एकदम बढती मिळाली, कुक्‌ याला १७५९ त लोड कोल- 
व्हिल याच्या हाताखाली, एका जहाजाचा कप्तान म्हणून नेमण्यांत आले, 
कोलाव्हिळ हा लवकरच कुकचा मित्र बनला, आता कुक्‌ याला असें वाढू 
लागले की, जर समुद्रावर हिंडावयाचे, तर भूमिति आणि खगालशात्र 
याचें ज्ञान असणे अवश्य आहे. मिळण्यासारखीं सर्व पुस्तकें त्याने जमा 
केली; आणि कोणी गुरु नसतानाच, त्याने या विषयाचा पुष्कळच खोल 
अभ्यास केला, १७६० त एका स्वतंत्र जहाजावर त्याची नेमणूक झाली. 
१७६२ च्या सप्टेंबर महिन्यांत न्यू फाऊंडलंड ब्रेटावर इंग्रजांनी चढाई 
केली, तेव्हा त्याही कामांत कुकूने आपलें शोय आणि बुद्धि हीं दोन्ही 
प्रकट केली, याचवेळी, या बेटावरील, बंदरांची आणि डोंगरांची पाहणी 
त्याने केली, हळूंहळूं अंडामिरळ्‌ भ्रेव्हज़ याच्या ध्यानात येऊं लागले कीं, 
कुक्‌ हा एक फार कोणीतरी अलोकिक बुद्धीचा माणूस आहे, त्यानें आपण 
होऊन त्याचा स्नेह संपादन केला; आणि नवलाची गोष्ट ही कों, कुक्‌ 
विषयीं त्याचे मत अधिक अधिकच चांगलें वनत गेलें. केवळ ज्ञानाचा 
हव्यास म्हणून उत्तर अमेरिकेचा सर्व किनारा जलपयटनाच्या दृष्टीनें त्यानें 
तपासून पाहिला आणि मग तर, सर्वच आरमारांतील अधिकारी-वर्गाने 
त्याची मोठीच वाहवा केली, 


४ ७९ .» 


कॅप्टन कुक 


१७६२ त लेफ्टनेटची जागा मिळवून कुक॒ इंग्लंडांत परत गेला. 
आणि लवकरच बेटस्‌ या नावाच्या एका स्त्रीशी त्यार्ने लग्न केले, या वटस- 
बर त्याचें अतिदाय प्रेम होते. तथापि, सांसारिक सुखाचा अखंड उपभोग 
घेण्याला त्याचा धंदा अनुकूल नव्हता, मधूनमधून त्याला सारखें परदेशी 
जावें लागे, मात्र, असले व्यत्यय सोडले तर, त्याच्या प्रपंचाचे सुकाणू 
सुद्धां चागल्या तऱ्हनें चालत हो(ते, 

१७६३ त युद्ध संपळें आगे दर्यासारंग 9व्हूज्‌ याला न्यू फाऊंडलंडचा 
मुख्य शास्ता म्हणून रवाना करण्यात आले. या बेटाची एक निराळीच 
किमत दोती, याला व्यापारी महत्त्व फार हाते आणि म्हणून अंग्ला फ्रेंचांची 
नेहमीच घासाघीस चालं अस, प्ेव्हजच्या मनात आले की, व्यापारी दृष्टी- 
नेच या ब्रेटाचा सवे किनारा पारखून पहावयास हवा. म्हणून सरकारात 
पुन्हा पुन्हा लिहून त्याने लेफ्टनन्ट कुकूची नेमशूक या कामावर करवून 
घेतली, हे पाहणीचे काम यथायोग्य करून, कुक्‌ इंग्लन्डला परत आला, 
१७६४ त, न्यू फाऊन्डलन्ड आणि लब्नाडोर, यांचा खलाशी देखरेख- 
नवीस म्हणून त्याची नेमणूक झाली; आणि पुन्हा किनारा-पाहर्णाचें काम 
त्यानें पहिल्यासारखेच चालूं केळे, यावळी त्याने तयार केळेळे नकाशे पाहून 
अधिकारी लोक सन्तुष्ट होऊन गेळे, पण आतां या बेटाच्या काठाकाठाने 
हिडण्यानेच त्याचे समाधान हाईना. तो त्या बेटाच्या आत शिरला, आणि 
१७६७ पयत, त्यानें या ब्रेटाच्य़ा आतील प्रदेशाची उत्तम पहाणी केली, 
दरम्यान, सर बिल्यम वनात्री याच्यावरोबर तो एकदा जमेका बटालाही 
जाऊन आला, 

लवकरच त्याने खगोलाच्या माहितावर एक प्रबंध लिहिला, न्यू फाऊन्ड- 
लग्ड वेटात, १७६६ सालच्या आगस्ट महिन्याच्या पाच तारखेस सूर्य- 
ग्रहण लागले होते, त्यावर त्याने ह्या प्रवर्ध लिहिला हाता. या प्रबन्धानें 


“८... "२ ८ "« ७- टी “४८%” ८०९८५०९ >. >” “40,./४-” .“ >“ ७७०७” » / ८“ 


४ €५ $ 


कॅप्टन्‌ कुक 
त्याला गणिती म्हणूनही कोत मिळवून दिली; आणि या माणसाचा उप- 
योग आता काही निराळ्या कामासाठी करून घेतला पाहिजे, असं सर- 
कारांत वाटू लागलें. आता युद्ध संपून जिकडे तिकडे स्थिरस्थावर झालें 
होते; आणि भूमीचा शोध करण्याची नवी उ्मि लोकांना पुन्हां आली 
होती. अनेक दर्यावर्दी लोक निरनिराळ्या महासागरांत भ्रमग्ती करू लागले 
हाते. पण, समुद्राचा विस्तार आणि आकाशाचचें आंगण याऱचा निकटचा 
सम्बन्ध, असल्यामुळे, खगोल शास्त्राच्या अभ्यासाकडे लोकांची दृष्टी 
बळली, पं्चांगकत्यो्नी याचवेळी प्रासिद्ध केळे की, १७६९ त, शुक्राचा 
तारा सूर्यबिंब ओलांडून जात आहे. हा चमत्कार नेहमीच घडतो असें 
नाही, म्हणून हें संक्रमण होत असताना, त्याचें प्रत्यक्ष निरीक्षण करणें 
अवश्य आहे, हें इंग्लन्डचचा तेव्हाचा राजा तिसरा जॉज यालाही पटले, 
बरीच भवति न भवति होऊन, मार्किसास या ठिकाणीं किवा फ्रेंडली 
आर्ल्स या नांवाच्या बेटावर हे निरक्षण फार चागल्या तऱ्हेने करतां 
येईळ, असा विद्वानांचा अभिप्राय पडला, विदानांनी शिफारस केली, 
आणि राजानें तमाति दिळी की, सवे साधनानीं सुसज्ज केलेल एक जहाज 
एका हुषार अधिकाऱ्याच्या हाताखाली तिकडे पाठवून द्यावे, ह्या अधि- 
कारी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून, कुक्‌ हाच असणार, हे आतां 
ठरल्यासारखें झालें होतें. पुढे कॅप्टन वलिस यानें अशी शिफारस केली 
की, किंग जर्जिस आयलन्ड या ब्रेटावरील पोर्ट रायल हाबर हें ठिकाण, 
या संक्रमणाच्या निर्राक्षणालळा जास्त अनुकूल आहे. अथात्‌ कॅप्टन्‌ कुक 
यानें तिकडेच जावयाचे ठरविलें, मुख्य काम जरी झुक्ताच्या संक्रमणाचे 
अवलोकन हें होते तरी, तिकर्डाळ सवे समुद्राची कुकूने पहाणी करावी व 
नवे नवे प्रदेश हुडकून काढावे, असेंही काम त्याला सांगण्यांत आले. 
१७६८ च्या ऑगस्ट महिन्यात कॅप्टन कुकूने आपले जहाज हांकारलें, 


ज.प्र.... : ८१९ 


कॅप्टन कुक्‌ 


९ 0 0 /0 0.0 00 0 ल *->-५२-.०-2५-५- १-० -५--/५-८-->-/-> “५८” “ -7 “:->« “«. शोब्न्टा ऱी -“ -* /*/* <- -“ «>: >> .“* 40५४९ 0५ -“00-०/४.५९७७ ७ क त कहि क्यात पट १-०. 


१ ३ सप्टेंबरला तो मदिरा बेटांत आला आणि तेथली ती फळझाडांची 
शोभा, पिकांची लागलेली थाप, आणि खेळकर हवा, हीं पाहून त्याला 
फारच आनंद झाला, जातां जातां नोव्ह्यर १३ला त्याचें जहाज रिओ-डी- 
जेनिरा येथे आळे, ब्राझिल देशाच्या पूर्वे किनाऱ्यावर हें एक मोठें 
सुंदर बंदर आहे. परन्तु, इतक्या वघोपूर्वबी त्याला आजची शोभा नव्हती. 
आणि तेथील अधिकार्रीही फारसे भले लोक नव्हते. या बग्द्रांत उतरतांना, 
पुष्कळच कटकटी झाल्या, परंतु कुकू यानें हें सारें गोडीने निभावून नेले. 
या स्थळाचें तेव्हां केलेलं वर्णन आजही वाचण्यासारखे आहे. 

6 येथील पुरुष खेंचराच्या गाड्यांतून हिंडतात आणि बायका मेण्यांतून 
जातात. निग्नो लोक हे मेणे आपल्या खांद्यावरून नेतात. वेद्यबुवांच्या 
दवाखान्यातच काफीपानाची व्यवस्था केलेली असते; आणणि सगळ्या 
गांवांत एकही माणूस भीक मागतांना दिसत नाहीं, पोर्तुगीज आणि 
स्पाभेश वसाहृतींतील स्त्रिया वर्तनानें थोड्या ढिल्याच असतात. येथली 
हवा अतिदाय आनंदकर असते आणि कोणाच्याही प्रकृतीला छान मानवते. 
नारिंगे, संत्री, ठिंबे, आंब्रे, नारळ, कलंगडीं इत्यादि फळांची इकडे रेल- 
वल आहे आणि येथल्या खाणीही चांगल्या समृद्ध आहेत, मात्र एका 
गोष्टींच फार बाईट वाटतें. चाळीस हृजार निग्नो लोक दरवर्षी या खाणी 
खणण्याच्या कामावर लावतात. या कामांतील श्रमानें आणि दुगेधीनें हे 
गरीब निग्रो पटापट मरतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी, 
पुन्हां हजारो निग्नोंना धरून आणून तेर्थे पाठवण्यांत येते, ” 

रिओ बगन्दरांतून डिसेबर ८ ला कुकूर्चे जहाज बाहेर पडलें, आणि 
१३ तारखेला रात्री, चन्द्रग्रहणाचा देखावा त्यांनीं पाहिला, जानेवारी १५ 
ळा कॅप्टन कुक हा भे ऑफ गुड सक्सेस येथे येऊन पोहोंचला आणि 
किनाऱ्यावरील तंद्देशीयांची कुकूनें ओळख करून घेतली, कुकूर्ने त्यांना 


५ ८२ $ 


कृप्टन्‌ कुक्‌ 


*”"न.* “> >९१”/ > >“ 2.0 0.00 ““-€“£ न“ क्ट -“€०€ “€> “० ->”>“-“ “>” »>“*“-“-“ “.“>* >” *>*..*>*>“ “>>.” “>... -“€- -“>“>“.-“>* 


थोडेसे कपडे दिले आणि कांही खावयासही दिलें, दारु पुढें ठेवतांच, त्या 
रानटांनी खुणेने सुचविले कीं, ही दारु आम्हांला नको, कारण यानें 
आमचे धसे सुजतात. हे लोक मध्यम उंचीचे असून, त्यांचीं कपाळें 
अरुन्द आणि चेहरे थव्रकट आणि रुंद होते, गालाची हाडें वर आलिलीं 
असून नार्के बस्कट आणि नाकपुढ्या फारच पसरट होत्या. यांचे डोळे 
काळे आणि बारीक असून, जिवण्या लांब्र होत्या. दांत बारीक बारीक 
आणि आंत बाहेर झालेले असून, केस काळे आणि सडक होते ब ते 
त्यांच्या गालफडांवर आणि कपाळांवर अलिले होते. विशेष म्हणजे या 
लोकांना दाढी'च नव्हती, 
या ठिकाणीं थंडीचा कडाका इतका विलक्षण होता की, जहाजांवरील 
माणसांना थोडीशी मरगळ येऊन, आपोआपच झोप लागूं लागली. म्हणून 
कतानानें हुकूम सोडला को, कांहीं तरी जोराची हालचाल चाढूं ठेवा. जे 
कोणी बसून राहील त्याला झोंप लागेल; आणि ज्याला झोप लागेल तो| 
पुन्हां जगा होणार नाहीं ! 
एप्रिळच्या १० तारखेला किंग जॉज आयलंड या बेटावर ते आले. 
मात्र तद्देशीय लोक या बेटाला ओताहिट अर्से म्हणत असत, या ओता- 
हिट बेटावर, कॅप्टन कुक आणि त्याच्याबरोबरचे इतर अधिकारी यांनी 
देशीयाची पुष्कळच माहिती करून घेतली आणि कांही थोल्यांर्च 
भेत्रीही संपादून घेतली, या बेटावर कांहीं दिवस मुक्काम व्हावयाचा 
असल्यामुळें एक लहानसा भुईकोट किल्ला बांधण्याचें काम कुक्नें सुरूं 
केळे, इंडियनांनीं म्हणजे तद्देशीय लोकांनीं यांना मनापासून मदत केली. 
या पाहुण्यांना भाकरीर्ची फळें आणि नारळ यांची अगदीं ल्यठूट या 
लोकांनीं करून दिली आणि त्यांच्या करमणुकीसाठी त्यांनी थोड गाणे- 
बजावणेंही केलं, विशेष गोष्ट म्हणजे याच्यांतला पिपाणीवाला आपली 


१ ८३ 4 


पिपाणी तोडानें बाजविण्याच्या एवजी नाकानेंच वाजवीत होत ! हे सारे 
ठीक झाले. पण, जहाजावरील लाकांना लवकरच कळून आलि कौ, हे लोक 
चोरटे आहेत. एकादा खिळा किंवा एकादा आकडा दिला म्हणजे हे लोक 
"यूप हाऊन जात आगि फळाची पाटी पुढें आणून ओतीत ! एकदां मात्र 
असे झालें की, जहाजावरच्याच एका खलाशयाने एक चोरी केली. तो 
तेथल्या एका बाईला म्हणाला को, ही दगडाची केलेली फरशीा-कुऱ्हाड 
जर मला विकत दिली नाहीस, तर मी तुझा गळा कापीन. असें म्हणून, 
ती फरशी तो घेऊन आला, गुन्हा उघडकीस आल्याबरोबर त्या सव रान- 
टाच्या समोर कॅप्टन कुकूने आपल्या त्या खलाशाला चाबकाखाली 
झोडपून काढले, 

पुढें एकदा या लोकांच्या प्रमुखाची म्हणजे राजाची बायक्रो पाहुण्यांना 
भेटावयास आली. राणीसाहेब सरासरी. चाळीस वषोच्या असाव्या. ही बाई 
अंगाने भली आडवी तिडवी आणि उंच होती. ती रंगाने गोरी-पांढरी 
होती. तिचे डोळे पाणीदार होते. तरुणपणी ती चागलीचच सेदर असली 
पाहिज, आपल्या परिचारिकासह राणीसाहेब जहाजावर आल्या, तेव्हां त्याना 
नजर म्हणून इतर काहीं वस्तूबरोवर खळांतळी एक सुंदरशी त्राहुलीही 
कुकूनें दिली; आणि राणीसरकार त्या बाहुलीकडेच बघत बसल्या, कांही 
वेळाने कॅप्टन कुकू त्यांना परत पोहोंचवावयास गेला, तेव्हां, राणीसरकारनीं 
त्याला केळांचे कांहीं घड दिले; आणि एक डुकरही नजर केळे ! एकदां 
असें झाले कीं, त्यांच्यांतला एक इंडिअन सारख। ओकू लागला कुकूच्या 
लोकांनीं तपास केला तेव्हा कळलें कीं, तंत्राखूचें एक पान त्यानें खाले 
अहि. ताबडतोब, जहाजावरच्या ब्रॅक या अधिकाऱ्यानें सागितळें का, 
नारळाचें दूध काढून याला पाजा, तें पाजताच हा ग्रहस्थ खडखडीत 
बरा झाला, 


करण्याचें कप्टनूर्चे एक यंत्रच चोरून नेलें. अथातूच कुकला मोठें 
कडक रूप धारण करावें लागलें. हे झाल्याबरोबर यत्र आपोआप घरी 
परत आलें ! मग कांहीं दिवसांनी कटन्‌ कुक्‌ तेथील राजाच्या भेटीला 
भला, नजर म्हणून त्याने राजेसाहेबांना एक पेरण आणि एक पांच ह्दयात 
लांबीची पंजी दिली ! राजेसाहेब एका झाडाखाली बसले होते. आणि 
त्यांच्या भोवती कांहीं म्हातारे उभे होते. नजराणा बघून, राजेसाहेबांची 
मुग्वश्री प्रफुल्लित झाली; आणि मग, पाहुण्याच्या करमणुकीसाठी राजे- 
साहेबांनी कुस्त्यांचा फड भरवला, इतक्यांत यर्दी आली कीं, डुकरें शिजत्रन 
तयार झालेलीं आहित; आणि भाकरीची फळेंही येऊन पोहोचली आहेत. 
भेजवानीची पंगत उठल्यावर, कॅप्टन कुकच्या लोकांनी हत्यारें नीट करण्या- 
साठी लावळेला घिसाड्याचा भाता पहावयास राजेसाहेबांची स्वारी गेली. 
पाहुण्याच्या नांवाचा उच्चार करणे या लोकाना फार जड जाऊं लागलें, 
: कुकू ' ला ते ' ठुटू ” म्हणू लागले; * हिस्क ? याला ' हिट्‌ ' म्हणूं लागले; 
: गोऑर * याला  टोआर ? म्हणूं लागले; सोलम्डरचें ' टोलेनार ' झालें; 
आणणि ' ग्रीनर्चे ! ' ट्रीन ' वनळें ! असो, अशा प्रकारें परस्परांच्या ओळखी 
झाल्यानंतर, शुक्राचें संक्रमण पारखण्याच्या त्यांच्या तयाऱ्या सुरू झाल्या. 
कांही उपकरणे नव्यानेंच करावयास हृवीं होती; आणि जी आधींच हाताशी 
हाती, त्यांचा उपयोग कसा करावयाचा, हें लोकांस शिकवाबयास हवें होतें. 
या बेटाच्या आसपासही विशेष अनुकूल जागा कोठें सांपडते कीं काय, याचाही 
शोध त्यांनीं चालूं केला, होतां होतां, तयार झालेल्या वेघशाळेवर सर्वजण 
जमा झाले; आणि मग, कुक्‌ याने राजेसाहेबांना आपण कशासाठी आलों 
आहों हें समजावून सांगितलें, सकाळच्या प्रहरी तूर्यबरिंवाचा आणि शुक्राचा 
पहिला संपर्क झाला, त्यावेळी ९ वाजून २५ मिनिटे ब ४ सेकंदे झालीं 


१ ८७५ ! 


कॅप्टन्‌ कुकू 


“टी ४. > **/ ">>. 22"/:/2“:“/”2*>2“ /-./*-./*.त” तज” ७» ७४०४४७०” 


होती. ९ वाजून ४४ मिनिटे व ४ सेकंदें झालीं तेव्हां शुक्राचें ब्रिंब सूये 
बिंबांत पूर्णपर्णे मम्न झालें, दुपारी ३ वाजून १४ मिनिटे आणि ८ सेकंद 
होतांच आुक्र बिंब सूयबिंबांतून बाहेर पडूं लागलें; आणि ३२ मिनिटेंव 
१० सेकंदें होतांच, ते सूयेबिबांतून पूर्णपणें बाहेर पडलें. हें निरीक्षणाचें 
काम अतिदाय समाधानकारक झालें, म्हणजे ज्या कामासाठी कुकू याला 
तिकडे धाडण्यांत आलें होतें, त्यांतील एक काम त्यानें पार पाडले. तें 
आटोपून परत येतांना, नव्या नव्या प्रदेशांचा शोध लावणें, दव दुसरें काम 
त्याच्याकडे दिलेलें होते; व ते आतां त्याने सुरूं केले, 

जून महिन्याच्या २६ व्या तारखेस कुकर्ने आपलें जहाज पुन्हां हांकारलें, 
तें पाश्चिम दिदोच्या रोखानेंच चालले होते; पण पुढें पुढें जावे, तसतसे 
ते पूव दिदोला येऊन पोहेंचित हाते. वाटेंत त्यांना कितीतरी बेटें लागली, 
परंतु, बहुतेक सारे रानटी लोक 'चालीरीतीच्या आणि आहारविहारांच्या 
बाबतींत इथून तिथून सारखेच आहेत, असें कुकूला दिसून आलें. त्याच्या 
लोकापैकीं कांहीं लोक, ओताहिट बेटावरच मार्गे राहून गेले, त्यांचा पाय 
तेथून निघेना; कारण तेवढ्यांतल्या तेवढ्यांतच, तेथील रानटी बायकांशी 
त्यांनीं लम लावून घेतलीं होती ! तुपिया या नांवाचा एक त्या बेटा- 
बरचा माणूस त्यांनीं आपल्याबरोबर घेतला होता. त्याला यांची संगाति 
फार आवडली; आणि तो त्यांच्याबरोबर जावा बेटाच्या पुढेपर्यंत गेला 

जुलेच्या १ ३ तारखेला, त्यांना एक मोठें बेट लागलें, येथील रहिवासी 
युरोपियन लोकांच्यापेक्षां मोठाड दिसले. पुरुष लोक चांगले उंच, दांडगे, 
आणि सुंदर बांध्याच दिसले, त्यांच्यांतील वरिष्ट लोकांच्या बायका, इंग्लंडां- 
तील सामान्य बायकांपेक्षा मोठ्या दिसल्या, त्यांचा वर्णही चांगला तुक- 
तुकित असून त्वचा चांगली मृदु, आणि गोजिरवाणी दिसली. त्यांची 
मुखश्री सुंदर असून, डोळ्यांवरून पाहतां ही माणसें फार शहाणी आहेत 


४ ८६ ! 


कृप्टन कुक्‌ 


२.५४ कि 


असें वाटे, दांत तर विलक्षण शुभ्र असून, त्यांच्या श्वरसनाला, कसलाही 
वाईट वास येत नव्हता, यांच्यांत एक मोठी चमत्कारिक चाल आहि. 
पुरुष आणि बायका हीं तर एकमेकापासून जवणाच्या वेळीं निराळीं बसतातच; 
पण बहीण भावाचे सुद्धां भाकरीचे टोपलें निराळें असते; आणि ते 
एकमेकाकडे पाठ करून जेवावयास बसतात ! जेवणाच्या आर्धी आणि 
नंतर ते चळा भरून टाकतात; आणि दिवसांतून तीन वेळां.स्नान करतात, 
आजाऱ्याचची शुश्रषा करण्याचें काम उपाध्येब्रावांकडे असतें; आणि त्यांचे 
औषध म्हणजे देवाला प्राथना करणें हें होय, रोगी बरा होईपर्येत, किंवा 
मरेतोंपर्येत प्रार्थनांचा तडाखा सुरूं असतो, लग्न म्हणजे स्त्रीपुरुषांची केवळ 
संमाते येवढेच असतें. परस्पर-संमातिे असली म्हणजे लग्न होते, आणि 
कांहीं थोडेसें बिघडले, तर काडीमोड होते, लम किवा काडीमोड यान्चा 
कसलाही गाजावाजा नसतो, 

ऑक्टोबर २९ ला ते ईस्ट आयलंड या बेटावर आले, कॅप्टन कुकनेंच 
हें नांव त्या बेटाला दिले, कुकने येथें कांहीं दिवस मुक्काम करावयाचे ठर- 
विळे, कारण, मंगळाचे संक्रमण (चड जा शल्याउऊ) येथें 
चांगळें दिस र होते. बोटीवरचा खगोलशास्त्ररा ग्रीन यानें हें संक्रमण फार 
बारकाईने पाहिलें; या प्रसंगानिमेत्तानें येथील उपसागराला त्यांनीं ' मर्क्यूरी 
बरे? असं नांव दिलें, 

१७६९ च्या डिसेंबरच्या १६ व्या तारखेला न्यूझीलंडच्या अगदीं 
उत्तर टोकापाशी ते येऊन पोद्दोंचले, आणि ३, जानेवारी १७७० पर्यंत 
पूर्व दिशेनें गेल्यावर त्यांना पुन्ह्या॑ं एकदां जमीन लागली, याचा अर्थ 
असा कीं, न्यूझीलंडबेटाचे निरनिराळे कंगोरे त्यांना लागत होते, मायेच्या 
५ तारखेला त्यांना एक भला मोठा खडक लागला, याचा घेर एक मेल 
असून, याचा कडा फार उंच गेलेला होता, याला, सोलॅन्डरचें ब्रेट असें 


७७/४१/७ ९-० -“ “के” .» ७.” ४ ९.४७. ७.७४ कि "२. ११ * २३. _४'% १५ ४४७४ 


४ ८७ $ 


कॅप्टन कुक्‌ 


ििडेशशाबबाआचािब॒ुबबुबब बज ा कचऱ्टी १२.०७ . ७” ४७-४४ -» अ ४ -“€**-/ च्च न्स“ “८ २.“ ७.१७ 9७.७” १७.४४ “० ७ &7 क. '“/ १० ०7. ७. /१%-७४७...७ १७७४७८७ १-७ -“__ “७-८ १७ रोधक 


नांव कुकनें दिलें, इंग्लंडला कोणच्या दिशेनें जावें, याचा विचार या ठिकाणीं 
ठरविण्यांत आला; आणि येता येतां, ते केप फेअरबेल येथें येऊन पोहोचले. 

आतां ते न्यूझिलंड ब्रेटांत आलेल होते. ह्या प्रदेश, अरण्यमय असून 
त्यांतील झाडें फार मोठीं, सरळ आणि उंच दिसलीं. निरानेराळ्या तऱ्हेच्या 
४०० वनस्पती त्यांना येथे आढळल्या; आणि यांतल्या फारच थोड्या 
त्यांना ओळखीच्या वाटल्या, येथील लोक कोणत्याही भक्कम आणि पुष्ट 
युरोपियानांपेक्षां अंगानें जास्त मोठे दिसळे, आगि त्याचा रंग भुरा होता. 
स्त्रियांच्या अंगीं मादव कमी दिसले. मात्र त्यांचा आवाज अतिशय 
कोमल होता. युरोपांतील कोणच्याही लोकांइतकेचच हे लोक विनयशील दिसले 
आणि बोलण्याचालण्यांत ते थोडा संकोच दाखवितात. हे आपल्या अंगावर 
रंगवेलीचीं नाना प्रकारचीं चित्रे काढतात; आगि ब्रायका, आपल्या केसांचा 
बुचडा टाळूवर बांधतात. सवच माणसे कान टोंचतात; आणि कानांची 
भोकें थेबढी मोठी ठेवतात की, त्यांतून माणसा'ची करंगळी जावी. यांची 
दास्त्रे म्हणजे भाले, कुऱ्हाडी हींच होत. यांच्या नाचाचें रूप हिडिसच 
असतें. एक सर्व भ्रेष्ठ देव आणि त्याच्या खालच्या अनेक देवता हे लोक 
मानतात. 

२७ मेला ते केप मॅनिफोल्ड येथें आले; आणि येथें काहीं दिवस 
मुकाम करून जहाजाची साफसुफाई करण्याचें कुकूनें ठरवले. ट्रिनिटि 
उपसागरात आल्यावर, त्यांना आढळून आलें कीं, आपण आतांपयेत 
११३०० मैलांचा प्रवास केलेला आहे. येथून पुढें गेल्यावर त्यांच्याबर एक 
मोठा चमत्कारिक प्रसंग गुदरला, समुद्राच्या सपाटीला मोठमोठाळे खळगे 
पडल्यासारखे झाळे, आणि आपण त्यांत सांपडत आहों असें त्यांना स्पष्ट 
दिसे लागले. यांतून ते बाहेर पडतात तोंच, जहाजांत कोठून तरी पाणी 
शिरू लागले, आणि पंपाने हे॑ उपसून काढण्याच्या कामी जहाजावरील 


276. 


कॅप्टन कुक्‌ 
झाडून सारीं माणसें अगदीं रकमेला आलीं. पाणी कोठून येतें, हद्दी 
नीटसें कळेना, सुदेवानें लवकरच समुद्राला ओहोटी लागली; जहाजाची 
खालची बाजू मोकळी झाली, तेव्हा त्यांना दिसून आलें की खडकांना 
घासल्यामुळें, कांहीं फळ्या पिचून गेलेल्या अहित. परन्तु, जहाजांत पाणी 
जरी येत होतें तरी एका निराळ्याच आकस्मिक कारणामुळें आपलें जहाज 
बुडाळे नाहीं, हवे त्यांच्या ध्यानी आले. पिचलेल्या फळ्यांच्या एका मो! 
भोकांत, एक खडकाचा मोठासा कपरा, अलगद जाऊन बसलेला होता, 
आणि म्हणून, भरतीचे पाणी आंत येऊं शकले नाहीं, नाहीं तर आठ 
पॅप चालळतून सुद्धां त्यांचें जहाज केव्हांच बुडाले असते, याच ठिकाणीं 
त्यांनीं कांगारू हा पशु पाहिला, आगि त्यार्चे मांसही त्यांना फार आवडले. 
लोक इतके असंस्कृत, अज्ञानी आणि चरबट होते कीं, ते या युरोपियन 
लोकांच्याकडे नुसते बघतच बसत असत. एकदां तर त्यांच्यापेकी एकानें 
एका खलाशाचे हात चाचपून पाहिले; आणि त्याच्या तोंडावरूनही त्यानं 
हात फिरवून पाहिला, आपल्या सारखाच हा हाडामासाचा केलेला आहे, 
हं पाहून त्याला नवल वाटलेसें दिसळें, या भूमीतून बाहेर पडटून बराच 
जलप्रवास झाल्यावर, त्यांचें जहाज एका खडकाकडे वेगानें गेलें, पाण्यांत 
पडळेल्या खळग्याने तें तिकडे जाऊं लागलें. जहाज खडकावर जोरानें 
आपटून, आतां आपण सर्वजण मरून जाणार, हें त्यांना स्वच्छ दिसू लागलें, 
इतक्यांत, उलट दिरोनें वारा येऊं लागला; आणि त्यांची बोट तिरप्या 
दिशेने चालूं लागली, अर्थातच ती खडकावर आपटली नाहीं, आपण 
मरणाच्या तोंडांतूनच परत आलों, हें सवांना कळून आलें, २१ तारखेला 
योक आइज या नांवाची ब्रेटे त्यांना लागळी; आणि सामुद्रधुनी रुंद होत 
चाललेली आहे असे त्यांना दिसून आलें. कुकरने असा चुकीच अंदाज केला 
कीं, आपण लवकरच हिंदी महासागरांत प्रविट होणार, येथें कॅप्टन 


१: ४९-३१ 


कृप्टन्‌ कुक 


७०*-७७-” ८-० > ०0 “४००७०२८ > “> “>: >>> “>“>_* >» >>» 2.2.“ .००५- २०९०० ०७.० -ल ल्क > > ->-००७०५०-०--० ० ९०००५०९.» .» 2. >>> ०. ५... ० > 


कुकनें इंग्टंडची ध्वजा उमी केली; आणि त्या सर्व प्रदेशाला न्यू साऊथ 
वेल्स अर्से नांव दिलें, म्यू हालडचें उत्तरटोंक त्यांनीं आतां गांठलें हाते. न्यू 
साऊथ वेल्स हा प्रदेश वाटल! होता त्यापेक्षां फार मोठा आहे, नव्हे, हा 
युरोपपेक्षांसुद्धां मोठा आहे, हे कॅप्टन कुक यानें २००० मेलांचा घेरा 
घालून दाखवून दिलें, 

येथील माणसे हाडापेराने मजबूत, मन्यम बांध्याची असून त्यांचा 
आवाज अतिडय मृदु लागला, किंबहुना ता बायकांच्या आवाजासारखाच 
वाटला. त्यांच्या कातर्डांचा रंग, चॉकोलेटसारस्वा असला, तरी ते घाणीने 
इतके बरबटलेल असत कीं, निग्नोसारलेच वाटावे, त्यांचा मुख्य दागिना 
म्हणजे नाकांतून इकडून तिकडे ख्वपसलेले हाडूक हें होय, लाकडे एकमेकांवर 
घासून विस्तव उत्पन करण्याची कला त्यांना माहीत झालेली होती, न्यू हॉलंड 
सोडतांना कुक्‌ म्हणतो कीं ' न्यू हालंडचा, म्हणजे आस्ट्रेलियाचा पूर्वकिनारा, 
३८ अक्षांशपासून तों खालीं एंडेव्हर सामुद्र धुनीपर्यत, माझ्या पूर्वी कोणाही 
युरोपियनानें पाहिलेला नव्हता. म्हणून, आमच्या तिसऱ्या जॉजेच्या नांवान 
मी इंग्रजांच्या व्वज येथे उभा केला; बेदुकाच्या तीन फेरी झाडल्या; आणि 
न्यू साउथ वेल्स या नांवानें मोडणारा सर्वच्या सर्व पूर्व किनारा, त्यांतील 
उपसागर, बंदरे, नद्या, बेटे, यांसकट, राजसाहेबांच्या नांवानें हस्तगत 
झाल्याचें जाहीर केलें, ! 

ऑक्टोबर २ ला जावा ब्रेटाच्या किनाऱ्याकडे कुकर्चे जद्दाज येऊन 
पॉ्होचले, दहा तारखेस ते या बेटांत आले, येर्थे डरचांचें साम्राज्य हेते. 
आणि युरोपियन संस्कृतीचा प्रसारही पुष्कळ झालला होता, त्यांच्या- 
बरोबर आलेल्या तुपी नांवाच्या त्या इंडियनानें हॅ युरोपियन संस्कृतीर्चे वेभव 
पाहिले, तेव्हां ता अगर्दी विस्मित होऊन गेला. या ठिकाणी, कुकच्या 
जहाजावर रोगराई फार पसरली; परस्तु डच अधिकाऱ्यांनी औषधपाण्याची 


४१ ५८० $ 


कृप्टन्‌ कुक 

सर्व तरतूद केली, तेथून एंडेव्हर जहाज प्रिइन्सेस आयलंडकडे गेलें. आतां 
ते हिंदी महासागरांतच उतरलेले होते. येथून पुढें नेक्रत्येच्या रोखानें ते 
आपिरकेच्या दक्षिण किनाऱ्याकडे गेले, आणि १७०१, माच १५ ढा 
केप आफ गुड होप येथें त्यांनीं मुक्काम केला, यावेळीं केप टाऊन हे 
लहानसेंच गांव होते. तथापि, कुकच्या माणसाची बडदास्त येथे बरी 
राहिली, १४ एप्रिलला, त्यांनीं दे केप सोडलें, आणि मे महिन्याच्या 
आरंभीं ते सैंट हेळेना या बेटात येऊन पोहोचले. आतां त्यांना घराची 
ओढ लागलेली होतो. वाटेनं फारसें कांहीं घडळें नाही. २२ जुलेला ते 
इंग्लंडच्या किनाऱ्याला जाऊन लागले. २ वर्षे ९ महिने १४ दिवसपर्येत 
त्यांची द्दी सफर चालू होती, 

कोलंब्रसानंतर इतकी नवी भूमि शोधून काढलेला दुसरा कोणीही दर्यावर्दी 
या वेळेप्येत झाला नव्हता. न्यूझीळंड देश दोन ब्रेटांचा झालेला आहे, आगि 
ऑस्ट्रेलियाचा पूर्ब किनारा किती विस्तीण आहे, हें त्याने दाखवून दिलें, 
परत येतांना इंग्लंडांतील पदार्थ-पंग्रह्मलयासाठीं, त्यानें बरोबर आणलेल्या 
वस्तूंची यादी पाहिली म्हणजे त्यांच्या जिज्ञासेची मोज वाटते. न्यूझीलंड 
व साऊथ सी आयलंडज़ इकडील लोक र्जे कापड वापरीत त्याचे काह्दी 
नमुने, कांही पेट्या, एक पीप, एक डम, एक लाकडाचा परळ, पांच 
उद्या, दोन स्कूपस, दोन दगडाच्या व दोन लाकडाच्या कुऱ्हाडी, एक 
माश्यांचा गळ, तीन खोदलेल्या मूर्ति, आठ खलतत्ते, कांहीं हाडांची शास्त्रे 
या वस्तू त्याने बरोबर आणल्या होत्या, 

कुकूचा बाप यावेळीं अगदी म्हातारा झाला होता. आणि त्यालाही 
कांहीं दुसरीं घरगुती कामें होती, म्हणून सरकारांतून कुकूला तीन आठ- 
वड्यांची रजा मिळाली, येवढाळे शोध करून ता परत आलेला असल्या- 
मुळे इंग्लंडांत त्याचें नांव सगळ्यांच्या तोडी झालें; आणि आपल्या 


£ ९१ ३ 


महे लर. अती ऑर “९२९०” 7९ ७ “१.0... 20“ ७/१ ७ 9_/% क क० “७0 //% 60 4४00) हक क स्थळा “१८९७० ८००० ० ७७ 20 20४७ ७” 2० ८९४0८०० ४९0० ./0 “कोक &% ० 60 ७ क ७ कळी 


देशाच्या मालकीची येवढी विशाल भाम त्यानें शोवून काढली हें पाहून तर 
आपल्या देशाचा हा एक फार मोठा उपकारक्ता आहे, असेंच राजा- 
सकट सवे लोक मानूं लागले. 

लवकरच, इग्लेंडच्या सरकाराने दक्षिण गोलाधीचा शोध पुरा करण्याची 
योजना केली, आतांपर्यंत दक्षिणेकडे बऱ्याच्च अतरावर नावाडी लोक गले 
हाते, आगि ते सागत असत कीं, दक्षिण धरुवाच्या रोखानें पुष्कळ खाली 
गेलें तर, एकादे नवें खंड सांपडण्याचा संमव आहि. एथ्वींच्या भोवती, 
पूर्व-पश्चिम वळसा घालून झालेला होता; आणि हा वळसा घालतांना, 
एक नवें अमेरिक नांवाचे प्रचंड खंड, आणि आरस्ट्रेलियासारखें संड- 
तुल्य ब्रेट, यांचा शोध लागला हाता, शाकडोंच्या रोकडी नवी ब्रेटे, सांप- 
डली होतीं; आणि युरोपांतील सर्वच दयोवर्दी राष्ट्रांत जोराची अहमहमिक! 
उप्तञ़ होऊन, नवी नवी भाम दस्तगत करण्याची आकांक्षा सार्वत्रिक 
झालेली होती, पण या सर्व लोकांचे प्रयत्न विषुवत्रत्तापासून दक्षिणेकडे 
व उनरेकडे ४६ अंशाच्या पलीकडे फारसें उचरेकड गेलेले नव्हते, त्यातही, 
दर्यावर्दी राष्ट्र उत्तरेकडील झीत काटेबरधाच्य़ा जवळ असल्यामुळें त्यांना त्या 
बाजूची माहिती बरीच झालली होती, परंतु दत्षिणेकडील शीत काटिब्रंध अजून 
अज्ञातच राहिलेला होता, कोणी कोणी नावाडी म्हणत की, हिंदी महा- 
सागरांतून ग्वूप खालीं गेळें म्हणजे, नवी भ्राम़े सांपडलीच पाहिजे, त्यांच्या 
या म्हणण्याचा पडताळा पाहण्यार्चे काम इंग्लडर्ने हाती घेतले व रेझोल्यू- 
शन व अइव्हेस्वर अका दोन जहाजे त्यांनी तयार केलीं, जहाजांची 
रचना शीत करटिबंधांतील जलप्रवासाळा योग्य अक्षीच बनविली होती. 
आणि तेव्हांच्या काळीं उपलब्ध असलेल्या सव सुखसोईनीं तीं सुसज्ज 
केलेली हाती, आडमुलखांत आणि आडसमुद्रांत जावयाचे असल्यामुळें, 
तोफा, दारुगाळा, हद्दी बरोवर देणे अवशयच होते. महिनोमहिने समुद्रां- 


: ९५९ ! 


कॅप्टन कुक्‌ 


तून जावें लागणार असल्यामुळे, गोज्या पाण्यासाठी पाण्याची मोठालीं 
टाकी ठेवणेही भाग होते. आणि सवांच्या वर म्हणजे, ज्या समुद्रात अजून 
मानवप्राणी कधी फिरकलाच नव्हता, त्या समुद्रांत जावयाचे असल्यामुळे 
सर्व अधिकारी आणि खलाशी जाणते, हुषार, सोशिक, आणि झूर असेच 
निवडणे प्राप्त होते. रेझोल्यूजान जहाजावर, क"्टन्‌ कुकूची नेमणूक झाली 
आणि अंडव्हेनचर जहाज कॅप्टन फ्नो याच्याकडे देण्यांत आलें, रेझोल्य- 
शन जहाजावर सगळे मिळून ११२ लोक होते, आगि अडव्हेस्वरवर ८१ 
होते. फोस्टर आणि त्याचा मुलगा हे दोघे सट्टिविशानशासतरी आणि 
ब्रेल्स हा एक गणिती, हे ही अभ्यासाची सोय म्हणून यांच्या बरोबर निघाले, 
कॅ्टन्‌ कुक हा १७७१ च्या जुलेच्या १२ तारखेला पहिली सफर संपवून 
इंग्लंडांत परत आलेला होता. बरोबर १ वपीने म्हृणजे १७७२ च्या जुले 
१३ ला ता दुसऱ्या सफरीला बाहेर पडला, 

पहिला मुक्काम २९ तारखेस मदिरा व्रेटावर पडला, पाणी घेण्यासाठी 
ऑगस्टच्या १० तारखेला ते सँंट यागो ब्रदरावर उतरले, आणि आक्टोबर २९ 
ला केप ऑफ गुड हापला आले, टेबल माऊंटन या नांवाचा जो एक पवंत 
केप टाऊनच्या शेजारी दिसतो, त्याचें दर्शन त्यांना झाळें, पण ढग आलेल 
असल्यामुळें देखाव! दिसावा तसा दिसला नाही, संध्याकाळच्या वेळी, 
दृष्टीच्या टप्यांत असलेला सारा समुद्र पेटलेला आहे असें त्याना दितू 
लागले, त्यांना हा देखावा नवीनच होता. मात्र स्थानिक लोक सांगू लागले 
की, समुद्रातील फास्फरस असाच केव्हां केव्हा पेटतो, 

आतां आपण गार हवेच्या मुलखांत आलो आहों हे पाहून बरोबर 
आणलेले लोकरी कपड्याचे गड्डे कुकने सोडलें; आणि खलाशाना ते घाला- 
वयास दिलें, फेळ्रू्ञारी १ ला कप्टन्‌ फनो यानें कुकला सांगितलें की, 
दगडावर उगवणारे बरेचसे गवत समुद्रांत बह्वात येत असलेळें आपण 


४ ९३ $ 


कृप्टन्‌ कुक्‌ 


बक १६ ६ // »/* ४ '“* क «५ /0% //१%६ &”% “७ के क 4९% “२३ 7 के अ/* '$ ३ ची 


पाहिलें, आणि डोक्यावरून पाखरेंही उडतांना पाहिली, यावरून जवळच 
कोठेतरी जमीन असावी, परंतु जमीन कोठेंच आढळली नाहीं. इतक्यांत 
एक मोठा चमत्कार घडून आला, फर्नोचे जहाज आणि कुकर्चे जहाज 
यांची ताटातूट झाली, दोन्ही जहाजे अथोतूच कांही अतरानें चालत होती, 
परंतु ८ फेब्रुआरीच्या सुमारास, फर्नोचें जहाज कुकला दिसेनासे झालें. 
ताटातूट झाल्यासारखी वाटली तर, फर्नोनें असल्या जागीच तीन दिवस- 
पर्यंत इकडे तिकडे करीत रहावे, असा कुकचा हुकूम होता. या संकेता 
प्रमाणे, कुकने शोधून पाहिलें; परंठु फर्नाच्या वहानाचा पत्ता लागेना, 
दोघांनीही आपापल्या जहाजावरच्या तोफा उडवून पाहिल्या, परंतु, 
कोणाचाच माग कोणाला लागेना, रेवटी १७ मार्चला कुकर्ने ठरवले कीं, 
आतां न्यूझीलंडला जावें आगि फर्नो तेथे भेटतो कां पहावें. यावेळीं 
कुकनें दक्षिणेच्या ब्राजला, जितका दूरवर प्रवेश करून घेतां येइल, तितका 
घेतला होता. आतांपर्यंत दक्षिण समुद्रांत इतक्या लांत्रवर कोणीही गेलें 
नव्हते. या गार इवेत, कुकच्या लोकांना, दातांचा रोग होऊं लागला. 
परतु, स्वीट वाट नांवार्चे एक बरोवर आणलेले औषध त्यानें लावावयास 
देतांच, हा दातांचा उपद्रव एकदम कमी झाला, 

कृकचें जहाज आतां डस्की उपसागरांत आलेलें होर्ते; तेथून ते चार- 
लोटी सामुद्रधुनीकडे निघार्ले; अशासाठी कीं, फर्नोचे जहाज तेर्थे असलें 
तर गांठ पडावी, कुकचा अजमास खरा ठरला, १८ मेला ते या सामुद्र- 
घुर्नीत आले; आणि तेथे त्यांना अडव्हेस्वर जहाज खरोखर दिसले, 
फर्नोने सांगितलें की, 'दीड महिना झाला, आम्ही येथे बसून आहो ! 
आणि मग, ताटतूट झाल्यापासून पुन्हां गांठ पडेपयेत आपण कसेकसे 
हेलकावे स्वाले, यार्चे रसभरीत वर्णन फर्नोनें केले. त्याच्या जहाजावरचे 
खलाशी अगदी सुकून गेलेले होते, दोघेही कप्तान, चांगली हवा सापडावी 


१ ९४ : 


“७ '७ /% “७ क ८ ८५% % €% 42” “७ भक क्ट 


कप्टन्‌ कुक्‌ 


म 0 कर ७०, 40 पळी चक अक “२. ०७ ७0७ 0७. कटाचे. 4-४. .» % //% ७ “7. ७४१ &.ी हकक ली ह 4 न 


म्हणून, ओताहाटी बंदराकडे निघाले, आता ते दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण 
टोकाजवळ आलेले होते, 

येथून उभयतः कप्तान आणखी दक्षिणेकडे निघाले, मग पुन्हां एकदां 
अडव्हेन्वर्ची आणि रेझोल्यूशनचची ताटातूट झाळी, आतां मात्र त्याची 
आणि आपली पुन्हां गांठ पडेल, अर्से कुकूला वाटेना, डिसेंबरच्या १२ 
तारखला, त्याला पाण्यावर बफ आढळू लागलें, दोन दिवसांनी पुढें बफाचे 
खडपेच्या खडपे लागूं लागले, यांतून, कुकरचे जहाज तसेंच पुढें पुढें गेलें. 
वारा अनुकल होता. वेगानें पुढें गेल्यावर, अनेक लहान लहान ब्रेटे त्यांना 
लागलीं. पण त्याहीपेक्षा म्हणजे बफौचे सुटे खडपे अधिकाधिक भेटूं लागले. 
त्यांना चुकवण्याची कुकूनें पराकाष्ठा केली. परंतु, मधून मधून ते त्याच्या 

हाजाच्या बरगत्यांवर येऊन आदळत असत. एक खडपा चुकवावा, तो 
दुसरा लागावा, असे हाऊं लागलें, सगळींकडेच धुर्के नरून राहिलें. अर्थात्‌ 
उत्तरेकडे वळणें भाग आहे. असें कुकला वाटूं लागलें. २१ तारखेला तर, 
बफाच्या खडप्यांचा त्यांच्याभांवती एवढा गराडा पडला काँ, आपण यांतून 
कसे सुटतो, असें कुकूला होऊन गेलें. 

१७७४ च्या जानेवारीच्या शेवटी, एके दिवशी सकाळीं दक्षिणेच्या 
बाजूला पांढरे स्वच्छ ढग दिसू लागले, त्यावरून त्यांनीं अनुमान केलें की, 
पुढें बफीर्चे मेदानच सुरू होणार असावे. लवकरच ते त्याच्या अगदी 
जवळ येऊन ठेपले, उजवीकडे, पश्चिमेच्या बाजूला आणि डावीकडे 
पूर्वेच्या बाजूला हें बर्फार्चे मेदान इतकें दूरवर गेळं होते की, ते कोठें संपले 
असेल, याची कल्पनाही त्यांना होईना. दक्षिणकडील निम्या क्षितिजावर 
प्रकाशाचे झोत पडल्यासारखे दिसू लागळे आणि त्या झोतांत, बर्फाचे 
डोंगर स्वच्छ दिसले. लोकांनीं हे डोंगर मोजले तेव्हां ते ९७ भरेल, 
यांतले कांहीं पुष्कळच मोठे होते आणि एकमेकांच्या मार्गे वर जातां 


1 ९७५ ३१ 


कॅप्टन्‌ कुक 


“/*  & ऱ्ह “।ॉ. शा >“ * »“४* कक्कर “नी 


जाता, कांहीची शिखर ढगाला जाऊन मिडलेली दिसली, जवळजवळचें 
मदान, बर्फाच्या खडप्याचैच बनलेळें हाते. पण, ते खडपे येवढे मोठे 
आणि, थोड्या अंतरा अंतरावरच पण असे गच्च बसले होते कीं, त्यातून 
पुढें बाट काढणें, सवथा अडाक्य होते. दक्षिणकडील समुद्रांतून खार्ली 
खालीं जाऊन, कदानित्‌ एकाद्या नव्या भूमीचा शोध लावता येईल ही 
कॅप्टन कुकूची आशा या ठिकाणी विराम पावली; त्याने आपल्या डायरीत 
लिहिलें की, ' मधून कोठून तरी आणखी दक्षिणेकडे जाता येणें अदराक्य 
होतें असें माझ्याने म्हणवत नाहीं. परन्तु मी तसा गेलों असतो, तर 
माझ्यावर भलतींच संकटे कोसळली असतीं आणि मी वेड्यासारखा वागलो 
असं ठरलें असते. माझ्या आर्धी नाबाडी लोकांनी जेथपर्यंत रिघाव केला 
हाता त्याच्या पुष्कळ पुढें जावे येबढीच माझी आकाक्षा नव्हती; 
माणसाला जेथपयेत जाता येणें राक्य आहे, तेथपर्यंत जाऊन पोहोंचावें 
असा माझा हेतू होता. परंतु, हे बर्फाचे डोगर माझ्या आड आले आणि 
मला थोडेसे बरेही वाटले. कारण, नाहीतर मी भलत्याच एकाद्या वेडाने 
झपाटलो असतो; आणि दक्षिण प्रव शोधून काढण्याची आशा घरून कोठें 
तरी गोठून गेलो असतो ! आतां एक इंचभरद्दी दक्षिणेकडे जातां येण्या- 
सारखे नव्हते ?' आणि म्हणून त्यानें आपले सूकाणू उत्तरेकड वळवले, 
विषुववृत्ताच्या पट्ट्यांत हिवाळा घालबावा असे त्यानें ठरविलें, अति दक्षिण- 
कडील समुद्र आता विचारांतून सोडून देणेंच भाग होतें. पण दक्षिण 
अटलांटिक समुद्रात, कांहीं संशोधन करता येणे राक्‍्य होते आणि म्हणून 
तो उत्तरेकडेच वळला, 


११ मार्चला ते एका नवीनच बेटावर आलि आगि त्याला त्यानीं 
डेव्हीस लन्ड असें नांव दिळे, बेटावर गेल्यावर, त्याला दिसून आलें की, 
येथले लोक चोरटे आहेत; आणि वस्तूंची देवघेव करतांना फार लबाड्या 


४ ९६ ५ 


कॅप्टन कुक्‌ 


करतात. त्यांच्याकडून ज्या वस्तू कुकच्या लोकांनीं विकत घेतल्या होत्या 
त्यासुद्धा ते खिश्यांतून काहून घेऊं लागले |! आणि ते केव्हां काढून घेतात, 
हेंही त्या खलाशांना कळेनासे झाठें ! शेवटीं त्यांना दिसून आलें की, 
ती तीच वस्तू हे लोक आपल्याला दोनदोनदां विकत आहेत ! बटाटे, केळी, 
आणि ऊंस यांची पिर्के या बेटावर बरींच दिसली, एके ठिकाणीं दग- 
डांच्या ढासळलेल्या चौथऱ्यावर कांहीं पुतळेही त्यांना दिसले. पण हे खाली 
रेललेले हाते; आणि त्यांचीं नाके तोंडे फुटलेली होतीं, त्यांतला एक पुतळा 
पंधरा फूट उंच होता आणि त्याच्या खांद्याचा माग सहा फूट रुंद होता. 
कुकचे लोक या ब्रेटावर बराच काळ हिंडत राहिले, परंतु, तेथल्या हाताळ 
लोकांनी त्यांना इतका उपद्रव दिला कीं, कांहीं छरे उडवल्याशिवाय आतां 
घडगत नाहीं, असे त्यांना दिस्‌ लागले, कारण, त्यांच्या हातांतल्या पिशव्या- 
सुद्धां ते पळवू लागले! गोळीबार करतांच, हे चोरटे चागले शुद्धीवर आले, 


एप्रिलच्या ७ तारखेला त्यांना एक नवे बेट लागळें आणि त्याला त्यांनीं 
हूडग्‌ आयलंड असें नांव दिले, या बेटावरचे लोकही मागच्याच जातीचे 
आहित, असें कुकला दिसून आठे, सगळा व्यवद्दार एन जिनसी होत होता, 
म्हणजे जिन्नस घ्यावा आणि जिनस द्यावा, असें चाललें होते. पण यांनी 
दिलेली जिन्नस ते बेटावरचे लोक ठेवून घेत; आगि बदला, त्यांच्या जब- 
ळचे मागितलेले दुसरे जिन्नस देण्याला ते काचकूच करीत ! शेवटीं बंदुकीचा 
दस्ता दाखवून त्यांना शुद्धीवर आणावे लागलें | स्पीनेश लोकांनीं हुडकून 
काढलेठें मेग्हाना बेट त्यांना आतां लागले, या बेटावरील माणसें अतिदाय 
बांधेसूद आणि फार सुस्वरूप दिसली, इतकां चांगली माणसें प्रथ्वीवर 
कोठेंही सांपडणार नाहीत, असे कुकरचे मत पडलें, परन्तु, एका लंगोटी- 
शिवाय त्यांच्यापाशी वस्र नव्हते, बायका एक कसला तरी धघडपा मांड्या- 
पर्येत गुंडाळीत, आणि खांद्यावरून दुसरा एक घडपा टाकीत, 


ज.प्र.७... 9 ९७ $ 


कप्टन्‌ कुक्‌ 


£* “| £५ / ५»  //* /* /*% /% २ /% /% /£२ / २ ९ /२ /0 /% /% ७ २ /९ / कि 


एप्रिलच्या २१ तारखेला ते ओताहिटी येथ आठे आगि दुसरे दिवशी 
माताबाई उपसागरात शिरले, पूर्वी १७६७ त या बेटावर एक राणी त्यांना 
भेटावयास आल्याचे वर्णन वर आलेच आहे. तीच आतां त्यांना पुन्हां 
एकदां भेटावयास आली, कुकनें तिची चांगली संभावना केली, कारण, 
हे भळे लोक पुन्हां आपल्याला भेटतील असें त्याला वाटेना, 


जून ४ ला, तिसऱ्या जॉर्जंचा वाढदिवस होता, त्या मुहूर्तानें कुकनें 
आपला मुक्काम हलविला, आणि येतां येता २० तारखेला ते एका मोठ्या 
बेटावर आले, तेथील लोकांना आपण मित्र आहो, असें त्यांनीं खुणांनी 
जाणविठें, परंतु, रानडुकराप्रमाणें ते त्यांच्या अंगावरच धावून येऊं लागल ! 
कुकच्या लोकांनीं दोनचार वायबार काढले, परंतु, येवढ्यानें ते बघतील 
असें दिसेना. शेवटीं या बेटाला सव्हेज आयलंड हें नांव देऊन कुक पुढें 
निघाला, राटरडम्‌ भेटावरून पुढें जाता जातां २१ जुलेला ते व्हिटसन्टाईड 
बेटापाशीं आले, पुढें मलिकोली बेटावरच्या एका बंदराला पोर्ट सँडविच हैं 
नांब देऊन कुक्‌ पुढें निघाला, 

ऑगस्टच्या ६ तारखेला, दूर अंतरावर त्यांना एक मोठा ज्वालामुखी 
दिसला, मोठा गडगडाट चाळू हाता आणि म्हणून, त्याच दिशेने कुक 
निघाला, रात्रींच्या वेळीं या ज्वालामुखीच्या तोंडांतून धुराचे आणि विस्त. 
वाचे लोळच्या लोळ बाहेर पडूं लागले, ढगांचा गडगडाट व्हावा; किंवा 
पुष्कळसे सरुंग एकदम उडावे, असे प्रचंड आवाज होऊं लागले आणि 
इतक्यांत एक पावसा'ची सरही आली, सारी हवा राखेने भरून गेली. 
वाळू आणि दगड हीं भाजल्यानें पीठ होऊन गेलेली होतीं. खलादशापिकी 
एका माणसार्ने शेजारच्या झऱ्यांतला दगड उचलला, तों त्याची बोटे 
भाजून निघाली ! १० आणि ११ तारखेस मोठमोठाले स्फोट होत होते. 
दर तीनचार मिनिटे झालीं कीं, एक स्फोट व्हावा असे चाललें होतें, 


भुईला मोठमोठाळे तडे गेळेळे दिसले; आणि त्यांतून गंधकाच्या वाफा 
बाहेर पडत होत्या, पण इतके असूनही थोड्याशा अंतरावर, अंजिराची 
झाडें लागलेली दिसली; आणि जवळच्याच टेकडीवर नारळांच्या झाडांची 
बनेंही उभी होती ! तिकडील लोकांना लोखंड या धातूची कल्पनाही नव्हती 
आणि वस्त दिलें तरी त्याचा उपयोग काय करावा, हें त्यांना कळत नाहींसें 
दिसर्ले | 

ऑक्टोबर १० ला त्यांना एक मोठें बेट लागलें, त्याला त्यांनीं नॉर्फाक 
आयलंड असें नांव दिलें, या बेटावरची झार्डे झडप न्यूझीलंडवरील जाती- 
चंच असलेलीं पाहून त्याला मोठें नवल वाटलें, शेवटी येतां येता, ते 
खरोखरच पुन्हां एकदां न्यूझीलंडमध्ये आलि. 

नोव्हंबेर १० ला कुकनें न्यूझीलंड बेट सोडलें, आणि जो सागराचा 
भाग अजून त्याने संशोधला नव्हता, त्याकडे जाण्याचे त्याने ठरविलें, 
लवकरच ते टेराडेल फ्यूगो या बेटावर येऊन पोहोचले, हॅ ब्रेट दक्षिण अमे- 
रिकेच्या अगदीं दक्षिण टोकाजवळ आहे. येथे पोचल्यावर आपण दक्षिण 
पॅसिफिकमधून पूर्णपणे बाहेर पडलो, असें त्यांना वाढू लागलें, यावेळी 
केप्टन्‌ कुकू हा थोड्याशा अभिमानाने म्हणाला कीं, “ आतां या दक्षिण 
पॅसिफिक महासागरांत शोधून काढावयाचे कांहीं राहिलं आहे, अर्से मला 
वाटत नाहीं; किंबा, आम्ही जे काय करून दाखवले आहे, त्याहून जास्त 
कोणाला कांहीं करतां आलें असतें असेही वाटत नाहीं, ' डिसेबर २८ 
ला केप फॉमला वळसा घालून, रेझोल्यूशन जहाज दक्षिण अटलांटिकमध्यें 
शिरले, जानेवारी १ ला त्यांनीं एका नव्याच बंदराला न्यू इअर्स हाबर हॅ 
नांव दिलें, केप साऊंडर्स , कंबरलंड बे, आइलळ ऑफ जॉर्जिया, अशी 
नांबे निरानिराळ्यो वाटेत भेटणाऱ्या बेटांना देत देत ते उत्तरेच्या रोखाने 
चाललेले होते, आतां, सव दक्षिण महासागर संशोधून झाला होता; आणि 


४ ९९ $ 


कॅप्टन्‌ कुक्‌ 

विषुवव्रत्ताचा पट्टाही त्यांनीं पुरा पाहिलेला होता; आणि म्हणून हातीं 
घेतलेलं काम खरोखरच संपले आहे, असे कुकला वाटूं लागळें, शिवाय, 
जह्वाजावरचीं अवजा€ व दोरखंडे हींद्दी इतकीं जीण झालीं होतीं की, तुर- 
पण्यारचें आगि गांठी मारण्याचे काम दिवसे दिवस वाढत चालठें होते, 
जवळची शिधासामुग्री संपत आली होती आणि जी उरली होती ती 
निःस्वत्व झाली होती, खलाशी लोक हे हाडाचे इंग्रज, आणि समुद्राच्या 
वाऱ्याला निर्ढावलेले म्हणूनच इतके दिवस टिकून राहिले; पण त्यांनाही 
आतां वाटूं लागलें की, दाताचे रोग बळावत जातील, अशा स्थितींत 
संशाधनाच्या कामांत त्यांना आणखी रात्रत ठेवणे प्रशस्त नाही, असें 
कुकला वाटूं लागलें, या सुदीधे काळांत त्यांची बतणूक इंग्लंडच्या कीतींला 
शोभशीच राहिलेली होती आणि कुकसारख अधिकारी लोक फार उदार 
आणि समंजस असल्याने, आपणही त्यांच्याशी त्याच थाटाने वागले 
पाहिजे अर्से हे खलाशी समजत असत, 


मार्च २२ ला ते केप ऑफ गुड होपला येऊन पोहोचले आणि तेथे 
कॅप्टन्‌ कुकला वर्दी लागली कीं, परतीच्या वाटेवर फनाचे अडव्हेंचर जहाज 
येथे येऊन लागलें होते. फर्नोने येथील अधिकाऱ्यापा्शी कुकसाठीं एक पत्र 
लिहून ठेवळे होते, यावरून फर्नाची काय दशा झाली असावी याची 
कल्पना कुकला चटकन्‌ आली, इंग्लंडांत पोचल्यावर फर्नोनें कुकला सगळी 
कच्ची हकीकत सांगितली, 


केप ऑफ गुड होप यांमा लवकरच सोडलें, कारण, सर्वानुमते असें 
ठरलें कीं, आतां इकडे तिकडे कोठें न फिरकतां सरळ घरींच जावें, सेंट 
हेळेना ब्रेट, असन्शन बेट येथें थोडा थोडा मुक्काम करीत १३ जुलेला ते 
अशोर्स बेटामध्यें आळे; आणि २९ जुलेला इंग्लंडच्या प्लिमाऊथ बेंदरांत 


१ १०० ३ 


कप्टन्‌ कुकू 
कुकच्या जहाजाने शेवटीं नांगर टाकला, २ वर्षे आणि १८ दिवस इतक्या 
प्रदीध काळपर्यत समुद्र-संशोधनार्चे हें काम चाललें होते, येवढ्या काळांत 
त्यांच्यापैकी फक्त चारच माणसें दगावली, आणि आजारीपणानें यांतला 
फक्त एकच मेला, कॅप्टन्‌ कुक म्हणाला, “ परमेश्वराच्या दयेमुळें हव सर्व 
झालें, ? 


कुकर्ने या आपल्या दुसऱ्या सफरीचा वृत्तांत संपावितांना उद्गार काढले 
आह्ित की, ' आमच्या सफरीचे मुख्य हेतू कितीसे सफल झाले आहित हें 
मीच सांगत बसर्णे बरोबर दिसणार नाहा, आम्ही जर एकादी नवी खंड- 
तुल्य भूमि शोधून काढली असती, तर जिज्ञासू लोकांना मोठें समाधान 
झालें असते, हे खरे, परंतु, आम्हांला अश्शी भूमि लागलीच नाहीं-- 
आणि आम्हीं शिकस्त केली असतांना सुद्धां ती आम्हांला लागली नाहीं, 
यावरून येवढे मात्र सिद्ध होते की, अशी भूमि असल्याचा जो समज 
अहि तो बरोबर नाही, तथापि, लोकमत या बाबीसबधानें काय होईल, 
ही गोष्ट जरी क्षणभर सोडून दिली, तरी दुसऱ्या एका बाबीसंबेंधानें मात्र 
आम्हांला पूर्ण समाधान वाटते. आम्हीं अनेक बेटे शोधून काढली; पण 
तितक्‍याच महत्वाचा दुसरा एक शोध आम्हीं लावला, तो हया कीं, जहाजावर 
बसून कितीही काळपर्यंत आपण समुद्रावर भटकावे, निरनिराळी हृवामानें 
भटावीं, निरनिराळ्या संकटांनी आपल्याला गांठावं आणि प्रसंगविरेषी 
आपण अगदीं थकून जावें, तरी स॒द्धां, आपणां दर्यावर्दी लोकांची प्रकृति 
खास टिकून राहते; आणि हा शोध कोणाही उदार मनाच्या माणसाला 
महत्वाचा वाटल्याशिवाय रहाणार नाही, दक्षिणकडील महासागरांतील 
एकादे विशाल खण्ड, आम्हांला कां सांपटडूं नये, या संबंधीचा वाद जेव्हां 
माणसें विसरून जातील, तेव्हाही मीं आतांचच सांगितलेला हा प्रकृती- 
संबंधीचा शोध सवांच्या ध्यानीं राहील अशी उमेद आहे,' 


४ १०९१ $ 


कॅप्टन कुक्‌ 


/९%७.०/१७७५९ ७०७०७७२ “९७३ ७/१/ १%.७/१ अर्क 


या दुसऱ्या सफरीत त्याने केलेल्या कामाची बेरीज अशी होते!- दक्षिण 
महासागरांत एक फार मोठें खंड आहे ही कल्पना त्यानें निरस्त केली, 


निदान जहाजानें तरी तेथे पो्होंचतां येत नाहीं येवढे तरी त्यानें निश्चित 
दाखवून दिळें, या प्रयत्नांत असतांना न्यू कॅलेडोनिया नांवार्चे एक स्वतंत्र 
बेट त्याने शोधून काढलें, हें बेट आकारानें लहान असलें तरी, तिकडल्या 
महासागरांत न्यूझलिंडच्या खालोखाल तेंच मोठें आहे. आस्ट्रेल्याच्या पूर्व 
किनाऱ्याच्या मध्यापासून पूर्वेकडे कांही अंतर गेल्यावर हें ब्रेट लागतें. त्याने 
जार्जया नावाचेंही आणखी एक बेट शोधून काढलें. आणि सॅम्डविच 
भूमिद्दी त्यानेच दाखवून दिली, ही भूमि दक्षिण पॉसेफिकच्या उंबरठ'यावर 
आहि, विषुवब्रत्तावरील समुद्रपट्टा त्याने दोन वेळां पाहिला आणि आधीच्या 
लोकांनीं लावलेल्या शोधांची स्थळें त्यानें यावेळीं निश्चित केलीं, आणि 
किती तरी नवीन स्थळें शोधून काढलीं, येवढें मात्र सांगितलें पाहिजे की, 
सत्तर वषीनी पुढें सर जेग्स ळा्क रास या दर्यावर्दीने असें दाखवून दिले 
कीं, कुक्‌ गेला होता, त्याच्याहीपेक्षां खालीं जातां येतें; तिकडे एक मोठें 
थोरले द्वीप आहे, आणि जहाजांतूनच तेर्थे पोहोंचतां येणें शक्य आहे ; 


४2 १०३ $! 


कॅप्टन कुक्‌ 

आणि आतां तर प्रत्यक्ष दक्षिण भ्रुवावरच माणसें पोचली असून, अनेक 
मोठमोठाल्या प्रदेशांचा शोध लागून चकला आहे, 

कॅप्टन कुक्‌ यार्ने केलेली तिसरी सफर ही अद्‌भुत गोष्टींनी भरलेली 
आहे; आणि या सफरीतच दोवटी त्याचा अंत झाला, कित्येक शतकेंपर्येत, 
युरोपांतील पंडितांची अशी एक कल्पना होती की, उत्तर ध्रुवाच्या बाजूला 
कोठें तरी, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक्‌ महासागर हे एकमेकांस 
मिळालेले असावे, स्कोटलंडमधून उत्तरेकडे बाहेर पडून, नोार्वेच्या उत्तर 
टोकाला वळसा घालून, युरोपेयन रशिया व सेब्रेरिया यांच्या किनाऱ्याने 
जर पुढें पुढे गेळें, तर पासेफिक्‌ महासागर पुढें कोठें तरी भेटला'च पाहिजे, 
किंवा इंग्लंडमधून बाहेर पडून, वायव्येच्या रोखानें पुढें जातां जातां, कन- 
डाच्या उत्तरेस जीं अनेक ल्हान मोठी बेटें आहेत, त्यांतून पश्चिमेकडे 
मार्ग काढतां काढतां अलास्का दीपकल्पाच्या उत्तरेस पोह्योंचता येईल; 
आणि तेथे कोठेंतरी, पासेिफिक महासागरात उतरावयास वाट सांपडेल, 
या दोन्हीं महासागरांची भेट विषुववृत्ताच्या दक्षिणेला पुष्कळच पर्यटन 
करावे तेव्हांच होतें हें आतांपर्यंत अनेकदां सिद्ध झालें होतें. पण ह्या 
प्रवास फार लांबीचा आहे हेही सिद्ध झालें होतें. याच्याऐवजीं वर 
सांगितलेली उत्तरेकडील शीत कटिबंधांतील वाट जर शोधून पाहिली, तर 
हे दोन महासागर कोठें तरी भेटलठेळे आढळतील आणि या कामीं, समुद्र- 
पर्यटन थोडें करावें लागेल, असा लोकांचा अंदाज होता, हा अंदाज बरोबर 
होता. परंतु, या वाटेने जाण्याचा प्रयत्न करण्याचें घाडस कोणी करावयाचें 
हा काय तो खरा अवघड प्रश्न होता. 


दोन अवाढव्य सफरी करून कुक्‌ परत आल्यानंतर, संशोधनाचें क्षेत्र 
आतां उत्तरेकडेच फक्त शिलक राहिले होते, आणि म्हणून ब्रिटिश सरका- 
रने इकडल्या सफरी'ची योजना हाती घेतली, नवी सफर म्हटली कीं, कुकरचे 


£ १०४ : 


कॅप्टन कुक्‌ 


डन “१५-८० ५८०५०४९ %-४४/४७४७.७४७४५०८॥९.७७७.७१७४७ ७.४७ ४५.७ 4२.८७ ४१५ 2९१५४४४०७५ ८९ “७.५७ ८७ ४९५ ४९२. / ७.४ २.४४. १७ ८ ४४. ८९०. २.७७ “७ ५८ २७.४../७ ४४०७४४७ 


नांव सगळ्यांच्या तोंडी चटकन्‌ यावें, हं स्वाभाविक होते; पण जाणते 
लोक म्हणाले कीं, या ग्रहस्थाचा आपण असा अंत पाहूं नये, त्यानें इतकी 
वर्षे समुद्रांत घालावेळीं आहेत, इतकीं «कटे सोसली अहेत, आणि इतके 
नवे नवे शोध लावले आहेत को, आतां त्यालाच पुन्हां ' उत्तरेकडे जा? 
म्हणणें अन्यायार्चे होईल. परंतु, हा विचार कितीही जरी वरोबर असला, 
तरी येवढी मोटी सफर हाती ध्यावयाची, तर त्याची सहछामसलत घेणें तरी 
अवबदइय'च होतें. आरमार खात्याच्या प्रमुस्राच्या घरी या कामासाठी तशांचची 
सभा भरली; आणि या विषयाची शाहानिशा हाऊं लागली, ब्रोलण्याच्या 
ओघांत कुक्‌ फार आवेशानें आपलें मत सांगू लागला; आणि ही सफर 
यरास्वी झाली तर कोणचे फायदे होतील, हेंही त्यानें अतिहाय सुरसपणानें 
सांगितलें, शेवटीं, तो आपण होऊनच म्हणाला कां, “ ही सफर जर येवढी 
वैभवाची हाणार आहे तर ती करून येण्याचें काम मी स्वत:च हाती घेईन. 
श्रोत्यांना जे हवें होतें, तेंच त्याच्या तोडांतून आलें | आणि मग ही माळ 
त्याच्याच गळ्यांत पडली ! ! 


हें काम केवळ संश्योधनाची होस आणि हिंमत ज्याचें अंगीं आहि, 
तोच करील, द्वँ जरी आरमारखात्याला खरें वाटत असलें, तरी आतां 
सरकारने येवढ्यावर्च हे काम भागवावें हें त्याला बरोबर वाटेना. 
मार्गे १७४५ त हडसनूर्वे मधून जो कोणी वाट शोधून काढील, त्याला 
२०००० पौडाचें बक्षीस देण्यांत येईळ असा ठराव पार्लमेन्टनें केला 
होता. त्याचें रूपांतर असें करण्यांत आलें कीं, जर एकाद्यार्ने अटलांटिक 
आणि पाौसैफिक महासागर यांच्यामधील जलमारगार्ने प्रवास केला, आणि 
तो २२" डिप्रीच्या उत्तरेकडे असला, तर त्याला हे २०००० पोंडाचे 
बक्षीस मिळेल; म्हणजे नवी भामे शोधून काढण्याची स्वयंभू ईषो जर 
कोणाच्या मनांत असेल, तर तिला आतां थोडें विलोभनही प्राप्त झालें, 


$ ९०५ $ 


कॅप्टन्‌ कुक्‌ 

“रेझो ल्यूशन' आणि डिस्कव्हरी हीं दान जह्यार्जे सुसज्ज करण्यांत आलीं. 
पहिलें जह्याज कप्टन्‌ कुक याच्या हातीं दिलें; आणि दुसरें कप्टन्‌ क्लाकं 
याच्या हातीं देण्यांत आलें, जहाजांची बाकीची तयारी आणि खलाकांची 
तयारी ही होतां होतां कांहीं महिने गेळे. पूर्वीपेक्षा आतां या जहाजांची, 
उपयुक्तता वाढविण्याचा मोठीच दक्षता आरमारी खात्यानें ठेवली, पासे- 
फिक्‌ महासागरांत आतांपर्येत, कुक यानें जे मित्र जोडले होते, त्यांना 
नजर म्हणून, युरोपांतील अनेक प्रकारचे पद्नू , पक्षी आणि तिकडच्या 
बागांत लावण्यासाठी इकडील नाना प्रकारचें बी बियाणे कुकनें बरोबर 
घेतळे, ब्रिटिश चॅनळ मधून बाहेर पडावयास, १७७६ च्या जुलेची १४ 
तारीख उगवली, वाटेंत कॅनरी बेटांत थोडासा मुक्काम करून आकटो- 
बरच्या १८ तारखेस कॅप्टन कुक हा केप ऑफ गुडू होप येथें आला, 
प्रिमाऊथ येथ कांहीं गुता निघाल्यामुळे डिस्‌कव्हरी जहाज थोडें मागाहून 
आलें, आपली ही सफर अनेक दृष्टीनी सफल व्हावी, असें कुकला वाटत 
असल्यामुळें, प्रत्येक मुक्कामाच्या जागी तेर्थांल लोकांच्या ओळखी करून 
घ्याव्या; तेथील पदापक्ष्यांची पाहाणी करावी, जरूर तर, आपल्या जवळचे 
पशुपक्षी आणि बीबियाणें तेथील लोकांना द्यावे, असा उपक्रम त्याने सुरू 
केला, केपटाऊन येर्थे मुक्काम असतांना, तेथें त्याने दोन खोंड, दोन 
कालवडी, रिंगरांच्या दोन नरमाद्या, दोन एडके, दोन मेंढ्या, असे अनेक 
पश्मू विकत घेतले, त्याच्या मनांत द्दे सारे म्यूझीलंडमधीलळ ओतहिटि येथील 
आपल्या मित्रांना द्यावयाचे होते. 


न्यूझीलंडला पोर्हेंचिपर्यंत विशेष कांहीं घडून आलें नाहीं, परंतु क्कीन 
चारळोाटी सामुद्रधुनींत त्यांचीं जहाजें येऊन लागल्याबरोबर, पूर्वी दान वेळां 
ता तेथे येऊन गेलेला असल्यामुळे, ओळखीचे झालेले आणि मित्र बन- 
लेले अनेक लोक आपापल्या होडग्यांत बसून त्याच्याकडे आले, मागें 


£: १०६ ! 


“०८०५..०-८००००.९००००.७००/५-०..०/००००--०.५००७००५९.७५.८०००००००० ८०५५८... ५८०.५५०००-०-८.००.-/०///2/:/2:2>>/>>>“>“:->/*>.“/.“>>.".“>>...->. > ळी डी ळी ल कलक 


[कदा फर्नो याच्या दुर्दैवी सफरीची थोडीशी हकीकत आलीच आहे. त्या 


फर्नोच्या लोकांना या लोकांनी मारलें हाते. तेव्हां त्यांना वाटलें की, त्याचा 
सूड उगवण्यासाठींच कुक द्दा पुन्हां आला असावा. परंतु, कुकचा तो 
हेतूच्च नार्ही, हें त्यांना लवकरच दिसून आले. या देशांतील लोकांत बरेच 
तट दिसून आलि, निरनिराळ्या अनेक जमाती तेथें असून, त्या एक- 
मेकांना अगदी पाण्यांत पाहतात, आणि कोणी कांही. आपली आगळीक 
केली, तर त्याचा सूड उगवल्याखेरीज त्यांना चन पडत नाहीं; या 
अविश्वासाच्या भावामुळे जो ता नेहमी सावध असल्यासारखा दिसतो; या 
देशांतील लोक अनेक बायका करतात; आणि मुलीची लमे फार लहानपणी 
हातात; आणि ज्या मुलीचें लग्न होत नाही, तिला सगळें जग ओस आहे 
असे वाटूं लागतें; लहान मोठी निरनिराळ्या तऱ्हेची शत्र वापरण्यांत हे 


५» १०७ ! 


कॅप्टन कुक 


७०५०८०५०५४००/७०० ०९७७ .००७००००००.००००४०७०४००००-७०००० /०-००/-७-७>०-०७-७-४-९०००९०५०००७००९५००००/९७०००४४४४०४४७०००००००००००-० ५०८० ..70. ४१०९१४००४१ क “००० ७ ७७७ 


लोक मोठे पटाईत आहेत, असें कुकला दिसून आळे, एकदां ते बिथरले 
आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले, म्हणजे ते डोळे गरागर 
फिरवू लागतात, त्यांच्या जिभा बाहेर लळलकळूं लागतात. आणि तोडे वेडी- 
विद्री दिसू लागतात, या देशांत नरमांस-भक्षणाची चाळ आहेच आहि 
अर्से या ख्स्स्ती लोकांना दिसून आले, 

फेब्र्आारी २५ ला त्यांनीं आपला मुक्काम न्यूर्झालंडमधून हालविंला, 
आणि ते ओताहिटीकडे निघाले, परंतु इतक्यांत पूर्वेचा वारा सुटला आणि 
तो इतके दिवस वहात राहिला की, उत्तरेकडील सफरीचा हंगाम आपल्या 
ह्वातून चाळला असे कुकला वाटू लागलें. जहाजावरचें पिण्याचे पाणी 
सपत आले, आणि गुरांचा 'चाराही फार थोडा उरला, म्हणून, फेंडठी 
आयलंडस्‌ या ब्रेटांकड ते निघाळे, आणि ओताहिटी बेटावर यावयास 
त्यांना ऑगस्ट महिना उगवला, कांहीं महिन्यापूर्वी स्पेन देशाचेंद्दी जहाज 
येर्थे येऊन लागलें होते, आणि ते निघून गेलें तरी येथें कांहीं स्पनिअर्डस्‌ 
या बेटावर दहा महिने राहिलेले होते. त्यांनीं सुद्धां आपल्याबरोबर, बकरी, 
डुकरे, कुत्रे, खोंड, कालवडी, हीं आणलेलींच होतीं. बेटावरील लोकांना 
हा सारा प्रकार नवीनच होता. कुकनंही आपल्याबरोबर असे कितीतरी 
पशु आणले होते, ते त्यानें आपल्या रानटी मित्रांना वाटून टाकले, 


डिसेंबर ९ ला सोसायटी आयलंडस्‌ सोडून, कुक उत्तरेच्या रोखाने 
निघाला, २२ अशावर गेल्यावर, त्याला लहान लहान अनेक बेटें लागलीं, 
तेथें थोडाथोडा मुक्काम करीत, तो उत्तर अमोरेकेच्या किनाऱ्याकडे चालूं 
लागला, मार्च महिन्याच्या ७ तारखेस हा किनारा त्यानें प्रत्यक्ष गांठला 
४९) अश्यावर असतांना या किनाऱ्यावर त्याला एक बंदर लागलें. आतां 
पर्येत, अनेक वादळें डोक्यावरून गेल्यामुळें त्याचें जहाज अगदीं खराब 
होऊन गेलं होतें, या बंदरांत शिरल्यावर, त्यानें जहाजाची दुरुस्ती केली. 


४१ १९०८ ३ 


कॅप्टन्‌ कुक 


०>“->/-2>/ “>>> ०८/८८/९०७०. -*->८०५ >>९*५/०/-८/-/-/.>€ >>>.“ >>-»>““-/-“ />>>-/>*.>>-€£-*/”-/*/"-८-८”>>.“ /»>”-“ >>>” >>> ८४०५८४५००५ -” >“ .>* >.” >” 27“: 


आणि सरपणार्‍चा आणि गोढ्या पाण्याचा पुरवठा जहाजावर करून घेतला. 
मे महिन्यांत तो अशाच एका बेटाला लागला. सर्पणे, चारा, पाणी 
घेण्यासाठीं त्याला ठिकठिकाणीं मुक्काम करावे लागत, आणि मुक्काम 
केल्यानंतर, त्या त्या ठिकाणच्या लोकाशीं मेत्री करणें आणि त्यांच्या चाली 
रीती पाहण ही कामेही तो करीत अस, या बेटांतील एका माणसाच्या 
घरांत तो गेला, तों तेथे एक बाई आपल्या पोराची हृजामत करीत वसली 
आहि, असें त्याला दिसळें ! एका काटकीच्या टोकाला शाक माशाचा दांत 
घट्ट बसवलेला हाता; आणि या दांतानें कॅस काढण्याचे काम चालले होते, 
आणि केस मऊ पडावें म्हणून, पाण्यांत बुचकळलेली एक चिंधी त्या 
पोराच्या डोक्यावर ती मधून मधून ठेर्वांत असे, वस्तऱ्यानें केस निघावे, 
तसेच या दातानेंही निघत होते; आणि पोर हूं कां चूं करीत नव्हतें ! 
मग कप्टन कुकनें हा नव्याच तऱ्हेचा वस्तरा आपल्यावरच लावून पाहिला, 
आणि तो फार चांगला चालतो, असे त्याला दिसून आलें. दाढी करण्या- 
चीही अशीच एक युक्ती तेथल्या लोकांनी काढलेली दिसली, एक शिंपला 
दाढीच्या केसांत खालीं घरावयाचा; आणि दुसऱ्या शिंपल्याच्या कंगोऱ्यार्ने 
दाढीवरून खालीं खरडावयाचें, दाढी फार हळूहळू होई; पण केस मात्र 
ऱचांगळे निघत, शेवटीं, कुकच्या जहाजावरील खलाशी असल्या हृजामती 
साठीं बेटावर जाऊं लागळे;, आणि जहाजावरील म्हाव्याच्या वस्तऱ्याची 
मजा पाहण्यासाठी ते रानटी लोक जहाजावर येऊं लागले ! 


जून महिन्यांच्या २० तारखेस आणखी एका बेटावर ते आले, तेथल्या 
राजाच्या भावाचे नांव फुताफाई असें होते, येर्थे सेवेची एक चम- 
त्कारिकच तऱ्हा त्यांना दिसून आली. फुताफाई अंथरुणावर पडला, तेव्हां 
शेजारीं बसलेल्या दोन बाया त्याच्या पाठीत बुक्क्या. मारूं लागल्या, बुक्‍या 
खातां खातां फुताफाईला शेबटीं झोंप लागलीं, बायका तशाच बसून 


४ १०९ $ 


“> ८७० > ० ७० .“” 2>2.”-/..»/“>“4“>/>./> >>>” ८४/१७/४०7० ५» १५-५८” /-./.-”८./ ././/.-.» /4“./>“>“€>“>”.>/> >>>.» > 2/न/>“ळ> र्न? २०००००५०%०० > ०७७ ०९ ०७०७०९०००० ७७ ०९०७ “».& 


होत्या, फुताफाई पुन्हा जागा होतोसा दिसला कीं, त्या पुन्हा बुक्क्या मारूं 
लागत. अशा प्रकारें राजबंधूच्ची सगळी रात्र मोठ्या सुखाने गेली ! 


या बेटावर कुक जास्त दिवस राहिला याचें कारण असे की, लवकरच 
तेथें ग्रहण दिसणार होतें. परन्तु, ग्रहण पहावयास लागणारी उपकरणें 
इतकीं नादुरुस्त झाली होतीं कीं, तो सोहळा त्यांना साधला नाहीं, परन्तु, 
या बेटाची शोभा केवळ अवर्णनीय होती. सृष्टीची वने आणि माणसांनी 
बनवलेलीं उपवर्न हर तऱ्हेच्या सौद्यानी सुशोभित झाली होतीं, केळीची 
वने, भाकरीच्या झाडाच्या राया आणि उसाचे मळे हे जिकडे पहावे तिकडे 
दिसत असत. परमग्तु, यांना पुढें जावयाचे होतें; या पॅरडली आयलंडज- 
मध्यें ते सुमार तीन महिने राहिलेले होते आणि यांच्या निरनिराळ्या 
बेटांतील लोकांची मेत्री त्यांनीं संपादन केली होती. लोक मध्यम उंचीचे 
खरे, परम्तु, अंगाने चांगळे मजबूत आणि बांधेसूद दिसठे, आश्चर्याची 
गोष्ट ही की, कांह कांही लोकांचे तोंडावळे थेट युरोपियन लोकांसारखे 
दिसले, कांही माणसें तर फारच सुस्वरूप दिसली, आणि कांहींचीं नाके तर 
: रोमन नासिका ? या वर्णनाला'च पात्र दिसली, विशेपतः स्त्रियांचा बांधा 
फारच डोलदार असून, त्यांच्या तोंडावरचीं छायाही मोठी रम्य दिसत 
असे, त्यांचे हात मात्र फारच बारीक होते; आणि हाताची बोटें त्माच 
फार नाजूक होतीं, या लोकांना मरणारचें फारच भय वाटत; आणि मृता- 
विषयीं त्यांना विलक्षण आदर वाटतो. दुःख प्रदर्शित करण्याची त्यांची 
पद्धति फारच भयंकर आहे. ते आपल्या दातांवर दगड मारून घेतात व 
माशाच्या दातानें डोक्याची रक्ते काढतात, याची भाषा न्यूझीलंडमधील 
लोकांच्या भाषेसारखीच आहि. 

हें बेट सोडून थोडे पुढें गेल्यावर, त्यांना ओताहिटी बेट दिस लागलें, 
कॅप्टन्‌ कुक याठा या बेटाची ओळख आधींच आंलिली होती, पाहिल्या 


$$ ११० : 


कृप्टन्‌ कुक्‌ 


अ »५ ७ २. अ% ९.७ /0. ४” (0 “> /% /£% 7१% /- १% रार 4/*% “५ *« “४ 7७ 7७ /0 च. & »/* '* /% ५ //% '% *५ '% ?% ७.४ के ४” च 'धयककन्यन्कल पेक हचक > 


दोनही सफरींच्या वेळी तो येथे आलेला होता, अर्थात्‌ त्याचे जुने मित्र 
त्याला येर्थे भेटले आणि त्यानें व जहाजावरच्या इतर लोकांनीं या ब्रेटावर 
बरेच दिवस मोजेने काढले, कॅप्टन्‌ कुकू स्वतः या बेटावर अगदी लुब्ध होऊन 
गेला होता, “' या बेटाच्या अभिय टापूइतका सुंदर प्रदेश साऱ्या दुनियेत 
कोठें सांपडणार नाही. येथल्या डोंगराचे तुटलेले कड उंच उंच आहित. 
आणि अगदी वरच्या कंगोऱ्यापर्यन्त, त्यांच्यावर खूप झाडझाडारा 
वाढलेला आहे, पुढें पसरलेले मैदान आणि शेजारच्या दऱ्या याही वनस्प- 
तीनी भरून गेलेल्या आहेत, या वनस्पतींची उन्मत्त वाढ पाहून मन थक्क 
हाऊन जातें. प्रत्येक दरीतून एक एक नदी वद्दात गेलली आहे आणि 
खोऱ्यांतील सपाटीवर लोकांनी आपली घरें मन मानेल तशीं बांधली 
आहित., जमीन इतकी सुपीक आहे की, लोकाना रोतकीचे कष्ट कांहींच 
पडत नाहीत. भाकरीची झाडें जिकडे तिकडे आपोआपच उगवतात. 
केळी आणि नारळी मात्र त्यांना लावाव्या लागतात, लोक मागील 
बेटांतल्या प्रमाणें बळकट दिसत नाहीत. कष्ट कसलेच पडत नसल्यामुळें 
ते बरेच आळशी बनलले असतात आणि त्यांच्या शरीराचे वळण नाजूक- 
पणाकडे ढळलेळें असतें. येथील पुरुष आपल्या बायकाना पशू समजूनच 
वागवतात, हें पाहून मात्र नवल वाटतें.” 


१७७७ च्या डिसेंबर ८ ला, कॅप्टन कुकू हा विषुववृत्त ओलाडून, 
उत्तरेकडील महासागरांत शिरला. इंग्लंडमधून तो निघाला, त्याला आतां 
सतरा महिने होऊन गेळे होते आणि ज्या कामासाठी ते निघाले होते, तें 
काम अजून सुरूच व्हावयाचें होते, अथात्‌ या उत्तरेकडील महासागरांत 
शिराबयाचें तर जहाजावर सर्व तऱ्हेची सिद्धता आहिना, याची पाहणी 
कुकूला करावी लागली, ३० तारखेला ते एका ब्रेटाला लागले आणि तेथें 
त्यांनीं सूर्य-ग्रहणाचा देखावा पाहिला, या ब्रेटावर त्यांनीं ख्रिसमस घाल- 


* १११४५ 


कॅप्टन कुक 


७०७७०७००००. 2५% ०७०७००९%०७०७०७००७७०७०७० ०७० ० 2९ 20.0 नन च ०-९०७७कन “7.” ७७१४०५०४१४ आ >*.००९-०>०४५/-/५०-./०५*-५->०-./ ५५-५१.” ०००००९” >*>“*.»._.“.>.>.>>“ 


विठेला असल्यामुळें त्यांनीं त्याला ख्रिमस आयलंड असंनांव दिल, या 
बेटावरील माणसें पाहून कुकूला मोठाच चमत्कार वाटला, कुकूर्च जहाज 
आणि त्यावरील सामानसुमान आणि माणसें यांकडे पाहून हीं माणसें 
भांबवल्यासारखीच झालीं. या सामानांपैकी एकही वस्तू त्यांना ओळखीची 
वाटली नाहीं आगि या माणसांच्यासारखीं माणसें त्यांनीं पूर्वी कधी पाहि- 
लाही नव्हतीं, फक्त लोखंड ही वस्तू त्यांच्या ओळखीची आहे, असें 
वाटलें, 

फेब्रुवारीच्या २ तारखेला ते उत्तरेच्या रोखार्ने चालल होते; तेव्हां 
त्याना अनेक लहान मोठीं बेटें लागलीं; जगाच्या भूगोलसानांत कुक यानें 
या प्रसंगीं मोठीच भर घातली असें म्हटलें पाहिजे, लहान लहान बेटांचे 
थबे त्यांना भेटत किंवा एकाद्या वेळी एकादे मोठें बेट भेटे, माच महि- 
न्याच्या ७ तारखेस, ज्या म्यू अल्बियन देशाचा किनारा गाठावा, असें 
त्याच्या मनांत होते, तो आतां दिसू लागला, उत्तर अमेरिकेच्या पाश्चिम 
किनाऱ्यावरील एका टापूला, सर फ्रेन्सिस ड्रेक यानें न्यू अल्बियन असें नांव 
दिलें होतें. बादळांत हेलकावे खातां खातां माचे २९ तारखेला, ते या 
किनाऱ्याच्या जवळ येऊन लागले, 

त्यांना पाहतांच, किनाऱ्यावरचे कांहीं लोक आपल्या होडग्यांत बसून 
त्यांच्याकडे आलि; आणि नानाप्रकारचे हातवारे करून आणि गाणीं 
गाऊन, त्यांनीं असे दाखविले की, आम्ही तुमचे मित्रच आहो, कुकूच्या 
लोकांनीं त्यांना खुणावले कीं तुम्हीं बोटींवर यावें, परंतु त्यांना विश्वास 
वाटेना, हळूहळू वस्तूंची देवधव सुरु झाली; आणि लोखडाच्या खिळ्यांना तर 
हे लोक भारीच भाळून गेळे, मग एका मागून दुसरे अशीं अनेक होडगीं तेथे 
आलीं, आणि त्यांतून आलेल्या लोकांनीं बरोबर आणलेली अस्वल, लांडगा 
खोंकड इत्यादि पद्मंचीं कातडी, बोटीवरील लोकांकडे विक्रीसाठी धाडली, 


४ ११२ ! 


कॅप्टन कुक्‌ 
हे लोक कांहीं वल्कल-वस्तही तयार करीत असत, आणि तागाची वस्त्र 
करणेंही त्याना माहित झालेलें दिसले, पण या सर्व मालाबरोबर, त्यानी 
माणसाच्या डोक्याच्या कवट्या आणि हात हे सुद्धा विकाऊ सामानांत*च 
आणले होते ! या हातावरच मास पुरतें निघालेळे नव्हत; यावरून कुकच्या 
लोकांनीं अंदाज केला की हे लोक नरमांसभक्षक असावे, आणि हा 
त्याचा अदाज अगर्दी खरा ठरला, शत्रुला मारल्यानेतर, त्यांची प्रेते 
वाया घाल्वार्वी, ही गोष्ट या रानटाना पसंत नसे. कुकच्या लोकांशीं ते 
फार मोकळेपणाने वागले. परंतु, मार्गे एका बेटावर, कुकला अनुभव 
आला होता, तोच येथेही आला, हेही लोक मोठे हाताळ होते. बोटीवर 
येण्याची परवानगी देतांच, ते भराभर वर चढठे, आणि खलाशाचचा डोळा 
चुकवून, जें हाताला लागेल तें त्यांनी लपवाबयास आरभ केला, त्यांच्या 
पाशी चांगलीं धारेचीं कांहीं काहीं हत्यारें असत. या हृत्यारानीं दोराला 
लाबलेल्या लोखंडाच्या मुद्या ते कापून घेऊ लागले, वस्तू लांबाविल्या- 
बरोबर जर या चोरट्यांना पकडले तरच ती परत मिळण्याचा संभव 
आहे असें दिसून आले, कारण थोडासा वेळ गेला की ते अकमेकावर आळ 
घेअं लागत आणि शेवटीं बस्तू कायमची नाहीशी हात असे, त्यांची 
व यांची बरी जानपठान झाली पण अपरिलच्या ४ तारखेला अक मोठेच 
प्रकरण निघाले, पाणी भरून आणण्यासाठी आणि लांकडें तोडून आण- 
ण्यासाठी यांचे कांहीं लोक किनाऱ्यावर गेळे होते, त्यांनी वतमान आणलें 
कीं हे सारे रानटी लोक दगड व काठ्या जमा करीत आहित. परंतु कांहीं 
वेळाने दिसून आलें कीं त्यांची अकमेकांत मारामारी सुरु हाणार आहे 
आणि त्यांसाठी ही तयारी होती, २६ तारखेला हवामान थोडे बदलले होतें 
तरी, कुकनें पुन्हां जहाजे हांकारली आणि वाटेंत लागलेल्या अका खाडीला 
किंग जार्ज सांड असें नांव दिलें. 


जवप्र....८ £ ११२ $ 


कॅप्टन कुक 


मे महिन्याच्या १ तारखेला ते पुढल्या अका बेटावर आले आणि 
तेथील पर्वताळा माऊंट फेअरवेदर असें नाव त्यांनी दिलें, १० तारखस 
अमेरिकेच्या मुख्य किनाऱ्याच्या अगदा जवळ ते येअून ठेपले, अका 
झाडाच्या वुंच्यापाशीं अक लहानसे टेकाड होतें. या टेकाडांत त्यार्नी अक 
बाटली पुरून ठेविली, या ब्राटळांत १७७२ सन असलेलीं इंग्लडांतील दोन 
नाणीं घाळून ठेविलली होती. २१ मे पर्यंत कुकचें जहाज केप अलिझा- 
ब्रेथ पर्यत येअन पोहोचले, या ठिकाणी त्याची अशी कल्पना झाली की 
अमेरिकासंडाचें पाश्चिम टोक आपण गांठलें आहे. परंतु लवकरच त्याची 
चूक त्यांच्या ध्यानांत आली, अत्तर अमेरेकेचें टॉक आणखी पुष्कळ'च 
पाश्चेभकडे गेलें आहे, येथून हडसन बे कडे जाणारा माग शोधून 
काढणे फार कठीण होते. १९ तारखेला डिस्कव्हरी जहाजाची 
आणे यांची पुन्हां भेट झाली, तेव्हां कॅप्टन क्लार्क यार्ने कुकळा 
कळविलें की, “ जवळच्या भूर्मावर काहीं रशियन-लोक केव्हां तरी येझन 
गेले असावे असा अंदाज आहे.' तेथील रानटी लोकांनीं अक लहानशी 
पेटी त्याच्या हवाली केली हाती. ती अघडून पाहतां रशियन भाषेत 
काहीतरी लिहून ठेवळेला असा कागद सांपडला, आगि त्यावर १७६६ 
असा सन दिला हाता, या रशियन ळेखात काय म्हटले आहे याची कल्पना 
अर्थातव त्यांना आली नाहीं, जुलेच्या २१ तारखेला कुक्‌ याला आपला 
प्रवास थांबबाबाच लागला, पुढें जातां जातां, आपण अजून अलास्काच्या 
आसपास आहो असे वाटत असतां, कदाचित्‌ आपण आशिया खंडाच्या 
पूर्ब टोकाला लागलो असलो पाहिज असे कुकला वाहूं लागलें, ऑगस्टच्या 
२९ तारखेला आशिया खंडाचा किनारा त्यांना स्वच्छ दिसू लागला, पण 
अमेरिकेचे पश्चिम टॉक आणि आरियाचें पूर्व टोंक याच्या अकंदर स्वरू- 
पांत त्यांना कसलाहि फरक दिसल! नाही, 


: ११४ : 


कॅप्टन कुक 


क आ क क वक कह क क का क डा ह क खहिआ4व46व मी युअर कनु ककथ ककमि हहममेखषष]) कया यिद या 


क क, 


हळू हळूं कुकला वाटूं लागलें कीं, हवामान बदलले आहे आणि इकडल्या 
टांपूत जलप्रवास करणें आतां सोपें जाणार नाहीं, अजून या दोन टोकांच्या 
मधून उत्तरेकडे जावयाचे काम शिल्लकच राहिलेले होतें, त्याचा मूळचा हेतु 
असा होता की, आक्‍्टिक समुद्रांत प्रवेश करून युरोप, आशिया आणि अमे- 
रिका यांचा संबध उत्तरेकडून जमवावा, परंतु हवामान पालटल्यामुळे अजूनहि 
उत्तरेकडे जाण्याचा आपला ब्रेत रहित करून कुक्‌ हा त्वरेने दाक्षिणिकडे वळला 
आणि सँडविच बेटांच्या रोखाने निघाला, ऑक्टोबरच्या २ तारस्त्रेस 
उनालास्का या बेटावर ते आळे आणि लवकरच त्यांनीं जहाजांच्या दुरु- 
स्तीला सुरवात केली, या ब्रेटावर एक तऱ्हेची बोरे सांपडतात. हीं खालीं 
म्हणजे स्कर्वी नावाचा दांताचा रोग नाहींसा होतो. म्हणून माणसें घाड- 
घाडून कुकर्ने या फळांची ओझीच्या ओझी गोळा करून ठेविली, तद्देशीय 
लोकांनीं काहीं नजराणा केला, त्यांतील वस्तूंबवरून असं दिसून आलें कीं, 
या लोकांची आणि कांही रशियन लोकाची गांठ पडलेली असाबी, १।२ 
दिवसांत ही मंडळी आपल्या रशियन मित्रांना धेऊनच आली, त्यांतील 
अकार्चे नाव इस्मिलोफ असें होतें. इस्मिलोफने त्यांना आपल्या राहुटीवर 
बोलाविले आणि त्यांच्या स्वागताचीहि त्यानें चागली तरतूद ठेविली. 
दुसरे दिवशी तो परत भेटीला आला. ब्रोलण्यावरून असें दिसलें कीं, 
त्याला इकडल्या भूप्र्ठांची माहिती चांगलीच आहि. रशियन लोकांनीं या 
भूमीवर पाय रोवण्याचे पुष्कळ प्रयत्न केळे असावे, परंतु तद्देशीय लोकांनीं 
त्यांना हांकून दि्ळें कारण हे लोक फार दगलबाज अहित असें त्यांचें मत 
झालें, दसऱ्या दिवशीं इस्मिलोफ परत गेला, पण १९ तारखेला तो पुन्हां 
परत आला, तेव्हां कॅप्टन्‌ कुकू यानें इंग्लंडच्या आरमार खात्याच्या प्रमु- 
खांना एक पत्र लिहून या इत्मिलोफच्या हवाली केळे, या उत्तरेकडील 
किनाऱ्याचा तयार केलेला एक नकाशाहि त्यानें या पत्राला जोडलेला होता. 


£ ११५ ! 


कॅप्टन कुक्‌ 


क ७ क४*चा? चक" च*” क” क? च” धा” घे?” क” क आट” ७४?" ३० ७87 घो?” ३७४४० ७७१ ७०” आ? आई" च” ७४” ४५” क्क कर” ७ 9” ४७४० कॉ” ८४? ८४? कॉ” आक” &”” ७४ जक” 


याच्यामागून जेबक इवॅनोविच सोपोस्लिकॉप या नांवाचा रशियन त्यांच्या 
भेटीला झाला आणि मग यांची व त्यांची बरीच येणीं जाणी सुरूं झाली, फर 
गोळा करण्यासाठीं उनालास्का आणि कामश्चाटका यांच्यामध्यें असलेल्या 
बेटावर अनेक रशियन लोकांनी आपला मुक्काम ठोकलेला असल्याचे 
त्यांना दिसून आले, 

ऑक्टोबर २६ ला ते या बेटांतून बाहेर पडले, कारण सँडविच बेटांत 
जाअन तेथें थडीच दिवस घालवावे असा त्यांचा बेत होता. तेथूनहि पुढे 
कामश्चाटकाला जावे असा त्यांचा इरादा हाता. सफर सुरु झाल्यावर 
त्यांना दिसून आलें कीं अभियीकडून नैत्रृत्येकडे पसरलेल्या सँडविच बेटांचा 
शोध आतांपर्यंत नीट लागलेला'च नाहीं या बेटावर माणसांची चांगली 
वस्ती हाती. जिकडे तिकडे अरण्ये पसरलेली दिसलीं आणि पाण्याचे प्रवाहहि 
बहात होते. बेटावरील लोकांनीं कप्टन्‌ कुकूच्या मंडळींचे मनापासून स्वागत 
केलें. फळें, मुळें, धान्ये इत्यादीची नवी भरती जहाजावर करणें आता 
प्राप्तच होते. ती करून घेझून १७७९ च्या जानेवारीच्या पहिल्या आठव- 
ड्यांत कुकूचें जहाज पुन्हां चाळूं लागळें, या सर्व बेटांचा पूर्ण शोध लाग- 
लेला पाहून कुकूला फार समाधान वाटलें. येथपर्येतची सारी हकिगत कुकूनें 
आपल्या हातानेंच लिहून ठेविली आहे. यापुढें घडलेला प्रकार हा अत्यंत 
दुःखकारक असून कुकूची आकांक्षा या ठिकाणी अकाअकीं खंडित झाली, 
तो प्रकार आतां व्णावयास हवा. 

विल्यम वाटमन्‌ हा कुकूचा गोलंदाज या बेटावर्च मरण पावला 
आणि तेथील राजाच्या विनंतीवरून त्याचा दफनविधी तेथेंच अरकण्यांत 
आला. कुकूची मंडळी केव्हां जाणार याची चौकशी बेटावरील लोक 
पुन्हा पुन्हा करीत असत. याचें कारण काय ? अशी इंका कांही 
कांहीं लोकांच्या मनांत येझन गेली, तेथील लोकांचा असा समज 


: ११६: 


कॅप्टन कुक्‌ 
झाला होता कीं हे लोक अकाद्या दुष्काळी देशांतून येथें आले असावे 
आणि पोट भरण्यापलीकडे त्यांचा कांहीं हेतू नसावा, त्यांचा असा समज 
हाणे स्वाभाविक होतें. जहाजावरील कांहीं खलाशी अतिशय रोडावून गेले 
होते; आणि पंगतील[ बसले म्हणजे वबखवखल्याप्रमाणें ते सारखे खात 
सुटतात हें त्यांनीं पाहिलें होतें. ते त्यांच्या पोटावर थापट्या मारून पहात 
आणि खुणा करून सुचवीत की येर्थे आल्यापासून तुम्ही बरेच जोगावलठेले 
दिसतां पण आतां तुम्ही येथून लवकर जावें हें बरें. कुकूच्या लोकांनी त्यांना 
सांगितलें कीं आपण अद्यांच निघणार आहों. त्या बरोबर राजेसाहेबांनी 
सगळीकडे जाहीर केलें कां चांगली चागली डुकरे आणि भाजीपाला घेअन 
सवानी लवकर यावें कारण पाहुणे मंडळी लवकरच जाणार अहित आणि 
आपण त्याचा पाहुणचार केला पाहिजे, 


कॅप्टन कुकू आणि क्लार्क यांना राजाने आपल्या मकाणावर बोलाविले. 
ते पाहतात तो जमिनीवर पुष्कळच बस्करें घातलेली होतीं, काथ्या पसरलेला 
हाता आणि वर तांबडी पिवळीं पिसे अंथरलेली होती. पलीकडे कांहीं 
अंतरावर भाज्यांचे ढीग पडलेल होते आगि एक डुकरांचा कळपहि होता, 
या राजानें भाजीपाल्याच्या या प्रचंड ढिगांचा आगि डुकरांचा कॅप्टन 
कुकला नजराणा केला. या वस्तूंची किमत इतकी मोठी होती कीं, कुकचा 
जीव अगदी दडपून गेला, नेटावरील लोकांचा आग्रह पडला कीं, क्लार्कने 
तेथेच रहावे. परंतु हें शक्‍य नाहीं असे क्लाकर्ने सांगतांच हे लोक कुकृकडे 
गेले आणि त्याला म्हणाले कीं, आपल्या मुलग्याला--- क्‍्लाक हा कुकचा 
मुलगा आहे असा त्यांचा समज झाला होता-- आपण आमच्यांतच 
ठेवून जावे. वेळ मारून नेण्यासाठी कुकनें सांगितलें कीं, तुमचा ह्या लोभ 
पाहून मला फार आनंद होतो; पण सध्यां या मुलाला दुसरीकडे फार मोठें 


११७ ! 


कप्टन्‌ कुक्‌ 
काम आहि. म्हणून मी त्याला घेऊन जातों. पुढल्या वर्षी मी परत थणार 
आहें, तेव्हां त्याला येथें ठेवून जाईन, एकंदरीनें पाहतां बेटावरील लोकांनीं 


यांचें आतिथ्य फारच चांगले केले, 


केब्रूवारीच्या ४ तारखेला सकाळीं कुकनें जहार्जे हांकारिली, थोडें पुढें 
गेल्यावर समुद्रावर वादळ झालें 
आणि जहाजें मूळ मुक्कामाला परत 
आलीं, पण आतां तदेशीयांच्या 
वर्तनात यांना फारच फरक पडलेला 
दिसला, लोकांची ती आतिथ्य-बाद्े 
एकाएकी नष्ट झाली, असें कां 
व्हावें याचें कारण कुकूच्या लोकांना 
कळेना, राजेसाहेब्रद्ि तेथून निघून 
गेले होते आगि कोणी कोणी सांगू 
लागले कॉ, त्या लोकांशीं कसे 
वागावे हे. ठरविण्यासाठीच राजा 
आपल्या सरदारांना भटावे म्हणून 
परत गेला आहे, परंतु लवकरच तो 
परत आला आणि कुकूच्य्‌ 
लोकांच्या मनांतील संशय नाहींसा 
झाला, तथापि ही त्यांची चूकच 
होती, बेटावर कांहीं तरी शिजत 
होतें. पाणी भरावयास गेलेल्या जहाजावरील लोकांचें आणि तद्देशीयांचें 
भाडण जुंपलें आगि क्लाकच्या कांही खलाशांनीं गोळीबार केला, इतक्यांत 


: ११८ : 


कॅप्टन कुक 
ब्रेटावरील लोकानी जहाजातील कांही माल लांब्रविल्याचें दिसून आलें 
आणि त्यांना पकडण्यासाठी कांही खलाक्ली त्यांच्या मागून धावले आगि 
सामान परत घेऊन आले; पण त्यांचे एक हाडगेंहि या लोकांनीं पकडून 
ठेवले, हाडग्याचा मालक तें परत मागू लागला, तेव्हां त्याच्या डोक्यावर 
एका खलाशारने वव्ह्याचा तडाखा दिला, त्याबरोबर बेटांतील लोकांनी 
खलाशावर दगडांचा वर्षाव सुरूं केला, त्यांचे तें रूप पाहून कॅप्टन कुकला 
वाटूं लागले की, आता या लोकांशी थोडें कडक रीतीर्ने वागळे पाहिजे, 
रात्रीच्या वेळी जहाजावर पुन्हा चोऱ्या झाल्या, कॅप्टन कुकची अशी 
पद्धाते होती की चोरीचा माळ परत मिळेपर्यंत कांही माणसें ओलिस 
घरून ठेवावी, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने येथली कांही माणसें घरून 
ठेविली, 
हत्यारबंद हाोझन आणि क्लाकला सावघ रहाण्याविषयीं सांगून कप्टन्‌ 
कुक्‌॒या चोरट्यांच्या शोधाला गेला, त्याच्या खेडेगांवात जाझन 
त्यानें राजाची गांठ घेतली, तेव्हां त्याला दिसून आले को राजाला 
चोरीची कसलीही वाता नाही. यावर कुकने राजाला आग्रह केला की 
तुम्ही बोटीवर चलावे, राजा गेलाही असता; परंतु त्याची पट्टराणी कानीक!- 
बारिआ हिने त्याला गळ घातली की तुम्ही ब्राटीवर जाझ नये, कुकनें 
आग्रह करावा आणि राणीने गयावया करून जाझ नका असें राजाला 
म्हणावें अर्से किती वेळ तरी चाललें होतें. दरम्यान राजाचे बरेचसे लोक 
कुकच्या भोंबती जमा झाले, कुकंचे लोक या गर्दीत पांगून अभे हेते. 
बरोबरच्या लेफ्ट्नंटला कांहींतरी आंदेश आला म्हणून त्यानें या सर्व लोकांना 
खुणावून गदीतून बाहेर काढळें आणि थोड्याशा लष्करी थाटाने रांगेने 
अभे केळे, राजेसाहेब अगदीं सरिन्न दिसत होते, आगि कॅप्टन कुकू 
आमच्याबरोबर चला म्हणून आग्रह करीतच होता, आतां राणीसाहेबांच्या 


: १९९ $ 


८४7 ४४०७५४ ४४/७४/४१७४ की 


कप्टन्‌ कुकू 


जोडीला राजाचे कांही सरदारही त्याला म्हणू लागले की, महाराज, आपण 
जाझ नये ! कुकच्या ध्यानांत आळे की आपण राजाला घेअझन जाअं 
लागलों तर येथ रक्तपात झाल्याशिवाय रहाणार नाही, म्हणून त्यानें ता 
मुद्दा सोडून दिला. 


राजाला घेझन जाण्यांत कुकचा हेतू काय हाता याची नीटशी कल्पना 
हात नाही. पण राजाच्या लोकाना खासच असें वाटलें असलें पाहिजे की 
जहाजावरील झालेली चोरी आणि मोडतोड यासाठीं कुक॒ हा आपल्या 
राजाला कैद करून नेत असावा; पण रक्तपाताशिवाय हें होणार नाही हें ककनें 
ओळखले आगि आपला ब्रेत त्याने सोडून दिला, येथेच हें प्रकरण संप- 
वून या बेटांतून कुक्‌ आणि त्याचे सारे लोक निघून गेळे असते तर कांही 
निराळाच अितिहास घडून आला असता, परंतु इतक्यांत अक चमत्कारिक 
प्रकार घडून आला. धरून ठेवलेल्या होडग्यांतील कांही लोक आपली 
हाडगीं घेझन निसटण्याच्या बेतांत अहित असें खलाशांना दिसून आलि. 
तेव्हां त्यांसी बंदूक चालविली आणि बेटावर्राल लोकांच्या सरदारांपैकीं 
अक सरदार मरण पावला, हें झाल्याबरोबर जिकडे तिकडे देगल सुरु झाली 
आणि आपल्याला हे लोक मारणार आहेत अशी त्या बेटावरील लोकांची 


कल्पन झाली. 


त्यांनीं आपलीं बायकापारें दूर घाडलीं आणि अंगाभोवती चटया 
गुंडाळल्या. यांचा अपयोग त्यांना चिलखतासारखा हात असे. त्यांनी 
हातांत भाळे घेतले आणि दगडांच्या राशी जमापैल्या, भाला आणि 
दगड हातांत घेझ्न अकजण केप्टन कुकच्या अंग्राव आला, कुकने 
त्याला दरडाविलें आणि तो ओकत नाहीं अर्से पाहून अक छरा त्याने त्याला 
मारला, त्या माणसाला कसलीच इजा झाली नाहीं, त्यामुळे ते लोक अक- 


४ ९२२०३४ 


कॅप्टन्‌ कुकू 
दमच शेफ!रून अठले, आणि कुकच्या बरोबर असलेल्या फिलिप्सवर 
एकानें भाला अगारला, फिलिप्सनें आपल्या बंदुकीच्या दस्त्याने त्याला ठोसा 
दिला, दरम्यान कुकनें दुसरी गोळी भरून बंदुक झाडली आणि त्यांच्या- 
पेकी अक जण पुढारी मरून पडला, मग मात्र त्या लोकांनीं दगडाचा 
वर्षावच सुरु केला. आणि कुकच्या लोकांनीं बंदुकीची फेर झाडली, आश्र- 
यांची गोष्ट ही कीं या फेरीनें ते लोक ब्रिलकुल गांगरले नाहीत, अलट 
बेदुकींत पुन्हां गोळ्या घालावयास यांना जो वेळ लागला तेवढ्यांत ते 
रानटी लोक आरोळ्या ठोकांत यांच्या अगावर धावून आले, चार खलाशी 
मरण पावले, तिघे इतके घायाळ झाले कीं ते मरणार असे दिसू लागले, 
या दंगलीत केप्टन कुक पाण्याच्या काठाशी अभा होता. ता जवळच्या 


छोकांना आणि दूर असलेल्या बोटीवरच्या लोकांना सांगत होता की तुम्ह 
: १९१ : 


कॅप्टन कुकू 


लवकर जवळ या पण गोळ्या मात्र झाडू नका, द्दी आज्ञा ता आपल्या 
लोकांना देत असता त्या लोकांनीं त्याच्या पाठीवर:जोराचा वार केला 
आणि कुक हा पाण्यांत पालथा पडला. तो पडल्याबरोबर शात्रुपक्षांत 
अकच आरोळी अठली आणि भोंबतालीं जमा होअन त्या रानटी लोकांनीं 
त्याचें प्रत पाण्यांतून बाहेर ओढले, त्यांनीं त्याची खांडोळी केलीं आगि 
त्याचे निरानेराळे अवयव त्यांनी वाटून घेतले, या ठिकाणीं कप्टन्‌ कुकची 
कथा अकाअकी'च संपली, मेलेल्या लोकांची मुंडकी, धर्डे, ह्वातपाय त्या 
लोकांच्या सरदारांनी आणि लोकांनीं आपापल्या योग्यतेनें वाटून घेतले, कांद्दी 
वेळाने अका विश्वासू माणसाने कॅप्टन कुकचे दोन हात आणि पावलें तुटून 
गेलेले दोन पाय हे जसेच्या तसे जहाजावरच्या लोकांना आणून दिले. हे 
बेटावरचे लोक नरमांसभक्षक सुद्धां असावेत अशी जह्ााजावरच्या लोकांची 
कल्पना झाली, 


कॅप्टन किंग्‌ या माणसानें पुढल्या सफरी'ची हकीगत लिहून ठेवलेली 
आहि. कुकू मेल्यावर कॅप्टन्‌ क्लाक याच्याकडेच सफरीचें पुढारीपण आलें. 
सँडावेच आयलंड्सचा सर्व शोध यानें पुरा केला, ते पुन्हां उत्तरेकडे गेले 
तेव्हां त्यांना दिसून आलें कीं अमेरिकेच्या अगदीं उत्तर टोकावरचें बर्फ 
वितळणें अगर्दी अशक्‍य आहे. म्हणून अभेरिकेचा उत्तर किनारा 
सोडून आशियाच्या उत्तर किनाऱ्यावरून एखादी वाट सांपडते कीं काय 
याचा शोध त्याने चालविला, परम्तु याह्दी कामांत यश येणार नाई हें 
पाहून क्ला्कनें खलाशांना कळविलें कीं आपण आतां घराकडे परत वळत 
आहोंत. कॅप्टन क्लाक हा हळू इळूं आजारी पडूं लागला १७७९ च्या 


चवही 


ऑगस्टच्या २२ तारखेपर्यंत त्याचा आजार वाढत जाऊन तोही मरण 
पाबला, तात्पर्य कुकच्या मागोमाग या सफरवाल्यांच्या मार्गे अपयरा 


कॅप्टन कुक 


“१०५०७४९०४१ 20 


५५ १७/१७५०५/४७४९४५९ /” ७४९१४८४७४१ .४6” “0 660,” 4600७ िकळ 80.“ च... 


४७ कक 


घांबत येऊं लागलें, शेवटीं दक्षिणिकडे येतां येतां फेब्ऑर्वारीच्या ५ तार- 
खेला ते सुमात्रा बेटावर येऊन पोचले. या सफरीत सँंडावेच आयलंडचा 
शोध लागला आगि आशिया व अरमारेका या दोन खंडाची टॉके अगदी 
जवळ जवळ येऊन भेटली आहेत हा ही अक नवाच शोध लागला, 


जहाजे इंग्लडांत परत आल्यानंतर कुकच्या मृत्यूमुळे देशांतील लोकांना 
किती दुःख झालें असेल याची कल्पनाच करावयास हवी, कुक मरण 
पावला तेव्हां तो केवळ ५१ वषोचाच होता. पण एवढ्या काळांत त्याने 
उष्णकटिबंधापासून शीत काटिबंधापर्यंतच सर्व समुद्र ओलांडलेले होते, 
शेकडो नवी बेटें पाहिलेली होती, न्यूर्झालंड आणि आस्ट्रिलिया ही 
विशाल भूपू्णे त्यानें इंग्रजांना मिळवून दिलीं होती. दक्षिण महासागरांत 
बर्फाच्या प्रचंड भिंती आड येईपर्यंत सर्व संकटांतून त्यानें सफर केली 
होती, आणि ब्रेहरेंगच्या सासुद्रधूनींतून उत्तर प्रुवाच्या सामुद्रधुनींत प्रवेशा 
होणे हें तर त्याला केवळ बर्फामुळेंच असाध्य झालें होते, परमेश्वराने 
निर्माण केलेल्या पण माणसांना अजून माहित न झालेल्या सृष्टीची शोभा 
पहात आणि परमेश्वराच्या कृतीचे कृतश॒ मनानें कौतुक करीत, सप्तसागरा- 
वर कित्येक बंषे फिरत राहून, कोठेतरी अचानक बळी गेलेला हा कॅप्टन 
कुकू आजवर होऊन गेलेल्या सर्व दर्यावदी संशोधकांचा राजाच म्हटला 
पाहिजे, 


कॅप्टन्‌ कुकूचे कुटुंब म्हणजे तो स्वतः, त्याची बायका आणि तीन मुलगे 
एवढच होतें. त्याचा स्वतःचा अंत कसा झाला हे आपण पाहिलेच आहे. 
बाकीची माणसेंही अशींच दुर्देवी ठरली, मोठा मुलगा एका वादळांत 
सांपड्डून मरण पावला, त्याचें हाव जों परत आणतात तों सगळ्यांत धाकटा 
भाऊ तापाने आधींच मरण पावलेला होता. दुसरा भाऊ थंडरर नांवाच्या 


“" *.../०./०."५.७.८५//०८-५/८५/.०५/१/८८"/८५ “/*"///./५/.५/.//.” ८५ /»/८.५५..५/./” »-”/.//१/ /.०./१/.५.५८"५.८/८५८*/५५// ०५...» /०८५५५/ “५५/४५/५४९१ ९५४ 


जहाजावर कुकूच्या मागून सहा महिन्यांनी मरण पावला, नवरा आणि तिघे 
मुलगे मेळेळे पाहून कुक्‌ बाईची प्रकृति एकदमच ढासळली आणि तीही 
लबकरःच मरण पावली, अशा प्रकारे या कुकू घराण्याचा अंत झाला, केंब्रिज 
येथें कुकचें स्मारक आहे. त्यावर पुढील लेख खोदला आहे. “' इंग्लंडच्या 
रायल नेव्हीवरील कॅप्टन जेम्स कुक्‌ यार्चे हँ स्मारक आहे. सध्यां असलेल्या 
आणि मार्गे होऊन गेलेल्या महान्‌ कौर्तिविंत नाविकातीलच हा एक 
होता. पॉसेफिक महासागरांत १७७९ च्या फेब्रुवारी ता. ९४ या 
दिवशीं ओही या बेटावरील लोकांनी त्याचा वध केला, या वेळी त्याला 
५१ चें वर्ष होतें, 


प्रकाशक-- ग. ल, ठोकळ, बी. ए., बी. टी, 
श्री लेखन वाचन भांडार, लक्ष्मी रोड, पुरणे २, 


मुद्रक--मा. ध. गुजर आयुर्विद्या मुद्रणालय, २६१/२ सदाशिव, पुण र